शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साठा झाला की पाणी जातेय वाया

By admin | Updated: December 19, 2014 00:22 IST

गोंदवले खुर्द : बंधाऱ्याचा पाया खचला; तत्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

गोंदवले : गोंदवले खुर्द, ता. माण येथील माणगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पाया खचत असून, पाणीसाठा झाल्यास खचलेल्या जागेतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. बंधारा कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर असून, पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गोंदवले खुर्दमध्ये माण नदीवर आठ वर्षांपूर्वी राज्य शासन अंगीकृत जिहे-कठापूर उपसा जलसिंचन कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सुमारे पस्तीस लाख खर्च करून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम मिहीर इंटरप्रायजेस सोलापूर यांनी पूर्ण केले आहे. बंधारा बांधण्याच्या ठिकाणी नदीपात्रात बहुतांश भाग खडकाळ असल्याने पाया काढताना या ठिकाणी जिलेटीन स्फोट करून ब्रोकरच्या साह्याने पाया खणावा लागला. या जिलेटीन स्फोटाने पाया खालचा खडकाळ भाग पूर्ण हादरला होता. यानंतर बंधारा बांधण्याचे काम संपल्यानंतर नदीला पूर आल्यावर इथे चांगला पाणीसाठा झाला. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. मात्र, काही दिवसांतच नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधारा रिकामा होऊ लागला. बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाणी, विहिरींची पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी समाधानी झाले. मात्र, हे समाधान फार दिवस टिकले नाही. नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधाऱ्याच्या पायातून अनेक दगड निसटून पाणी आणखी वाहू लागल्याने बंधारा रिकामा होऊ लागला. नदीपात्रात दक्षिण-उत्तर बंधारा असून, उत्तर बाजूच्या टेकडीमध्ये सुमारे दहा फूट आतपासून सिमेंट बांधकाम आहे. त्या बांधकामाच्या खालून तीन फूट खोल आणि वीस फूट लांब पाया खचला आहे. हा बंधारा लवकरच कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)लोखंडी दारांअभावी पाणी वाया बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी लोखंडी दारे आहेत. मात्र, ही दारे देखील इतरत्र पडलेली असतात. पावसाळ्याच्या दिवसांतसुद्धा अनेकवेळा दारे सापडत नाहीत. त्यामुळे ते पाणी अडविताना अडचण होते. पाटबंधारे विभागाने कितीही पाणी आडवायचा प्रयत्न केला तरी लोखंडी दारांअभावी पाणी वाहून जाते.माण नदीवरील सर्वच बंधाऱ्यांची कामे झाली असून, पाणीसाठा होण्यासाठी पाणी गळती थांबविणे महत्त्वाचे आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अर्जुन शेडगे, सरपंच