शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

साठा झाला की पाणी जातेय वाया

By admin | Updated: December 19, 2014 00:22 IST

गोंदवले खुर्द : बंधाऱ्याचा पाया खचला; तत्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

गोंदवले : गोंदवले खुर्द, ता. माण येथील माणगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पाया खचत असून, पाणीसाठा झाल्यास खचलेल्या जागेतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. बंधारा कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर असून, पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गोंदवले खुर्दमध्ये माण नदीवर आठ वर्षांपूर्वी राज्य शासन अंगीकृत जिहे-कठापूर उपसा जलसिंचन कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सुमारे पस्तीस लाख खर्च करून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम मिहीर इंटरप्रायजेस सोलापूर यांनी पूर्ण केले आहे. बंधारा बांधण्याच्या ठिकाणी नदीपात्रात बहुतांश भाग खडकाळ असल्याने पाया काढताना या ठिकाणी जिलेटीन स्फोट करून ब्रोकरच्या साह्याने पाया खणावा लागला. या जिलेटीन स्फोटाने पाया खालचा खडकाळ भाग पूर्ण हादरला होता. यानंतर बंधारा बांधण्याचे काम संपल्यानंतर नदीला पूर आल्यावर इथे चांगला पाणीसाठा झाला. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. मात्र, काही दिवसांतच नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधारा रिकामा होऊ लागला. बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाणी, विहिरींची पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी समाधानी झाले. मात्र, हे समाधान फार दिवस टिकले नाही. नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधाऱ्याच्या पायातून अनेक दगड निसटून पाणी आणखी वाहू लागल्याने बंधारा रिकामा होऊ लागला. नदीपात्रात दक्षिण-उत्तर बंधारा असून, उत्तर बाजूच्या टेकडीमध्ये सुमारे दहा फूट आतपासून सिमेंट बांधकाम आहे. त्या बांधकामाच्या खालून तीन फूट खोल आणि वीस फूट लांब पाया खचला आहे. हा बंधारा लवकरच कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)लोखंडी दारांअभावी पाणी वाया बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी लोखंडी दारे आहेत. मात्र, ही दारे देखील इतरत्र पडलेली असतात. पावसाळ्याच्या दिवसांतसुद्धा अनेकवेळा दारे सापडत नाहीत. त्यामुळे ते पाणी अडविताना अडचण होते. पाटबंधारे विभागाने कितीही पाणी आडवायचा प्रयत्न केला तरी लोखंडी दारांअभावी पाणी वाहून जाते.माण नदीवरील सर्वच बंधाऱ्यांची कामे झाली असून, पाणीसाठा होण्यासाठी पाणी गळती थांबविणे महत्त्वाचे आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अर्जुन शेडगे, सरपंच