शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

उद्योगात गुंडप्रवृती येत असेल तर मोडून काढू; पालकमंत्र्यांचा उद्योजकांना विश्वास 

By नितीन काळेल | Updated: December 21, 2023 21:19 IST

साताऱ्यात इंडस्ट्रियल एक्स्पोचे उद्घाटन...

सातारा : राज्य शासन उद्योजक आणि उद्योगांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे साताऱ्यातील एमआयडीसीतही नवीन उद्योग यावेत, प्रगती व्हावी यासाठी सर्वोताेपरी प्रयत्न केले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून ‘मास’चे प्रश्न मार्गी लावू. त्याचबरोबर येथील एमआयडीसीत गुंडप्रवृती येत असेल, प्रगतीला अडथळा होणार असेलतर ती मोडून काढू, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्योजकांना दिला.

सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन आॅफ सातारा (मास) आयोजित मास इंडस्ट्रियल एक्स्पोचे उद्घाटन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशिल भोसले, कूपर कार्पोरेशनचे अस्लम फरास, हिंदुस्थान फिडसचे अध्यक्ष नितीन माने, वसंतराव फडतरे, श्रीकांत पवार, युवराज पवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘सातारा एमआयडीसीला खूप जुनी परंपरा आहे. येथे मोठ्या आणि नामांकित कंपन्या आणि उद्योग होते. एमआयडीसीच्या जवळ उद्योग वाढवायचे असतील तर सुरुवातीला खूप विरोध होतोच. साताऱ्याच्या एमआयडीसी संदर्भात निगडी, वर्णे येथील शेतकऱ्यांचे काही गैरसमज असतील तर ते सोडवले पाहिजेत. उद्योगवाढीसाठी शासनही सकारात्मक असून सातारा तसेच जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण भेटू. त्यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.

मासचे अध्यक्ष मोहिते म्हणाले, मासची स्थापना १९९८७ साली उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आली. आपण आज उद्योगातून १३ हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहोत. हे शक्तीस्थान आपण अधोरेखित केलेले आहे. विद्याऱ्श्यांनी या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन उद्योजक व्हावे, अशी अपेक्षा आहे.

धैर्यशील भोसले यांनी साताऱ्यातील उत्पादने जागितक पातळीवर जाण्याचा हा प्रयत्न आहे असे सांगतानाच सातारा एमआयडीसीत ९०० उद्योजक चांगल्याप्रकारे काम करत असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

एमआयडीसीबाबत गैरसमज नको -आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा एमआयडीसबाबत आवाहन केले. ते म्हणाले, सातारा एमआयडीसी वाढविण्यासाठी मर्यादित पर्याय आहेत. तेच आपल्याला वापरावे लागणार आहेत. काहींची एमआयडीसी नको अशी धारणा आहे. पण, शासनाचीही धोरणे बदललीत. रेडीरेकनरपेक्षा चारपटीने जादा पैसे दिले जातात. त्यामुळे लोकांतील गैरसमज बदलावे लागणार आहेत. निगडी, वर्णे भागात एमआयडीसी वाढली पाहिजे. कारण, येथील महामार्गाची संलग्नता असल्याने त्याचा फायदा घेण्याची गरज आहे. एमआयडीसीसाठी बागायती जमिनी नको आहेत. ज्या पडीक आहेत, पाणी पोहोचत नाही ती जमीन द्यावी, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजेंनी केले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv Senaशिवसेना