शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर तेच पालिका निवडणुकीत नेतृत्व करतील : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 15:58 IST

Shivendrasinghraja Bhosale Satara- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेत आम्ही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. इथून पुढे देखील रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, असे सूतोवाच आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील, असा बॉम्बगोळाच आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टाकला.

ठळक मुद्दे शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर तेच पालिका निवडणुकीत नेतृत्व करतील : शशिकांत शिंदेजिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सुतोवाच

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेत आम्ही पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. इथून पुढे देखील रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, असे सूतोवाच आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील, असा बॉम्बगोळाच आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टाकला.येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी जनता दरबार आयोजित केला होता, यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, विजय कुंभार, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, 'पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडन्यावर सुरुवातीपासूनच भर दिलेला आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. दोन्हीमधील माझे राजकारण सुरूच राहणार आहे. माझ्या विचारांचे लोक जर एकत्र येऊन पक्षासाठी काम करत असतील तर मला देखील पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? त्याचा कोणाला त्रास होत असेल तर मी काय करू शकणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यावर आम्ही भर दिला आहे; परंतु ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल.'जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळे दिवसेंदिवस जनता दरबाराला प्रतिसाद वाढत आहे आजच्या जनता दरबारामध्ये ८१ तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि तात्काळ या तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला, असेदेखील आमदार शिंदे म्हणाले.सदाभाऊंचा ट्रॅक चुकलायज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय अनेकांना महत्त्व प्राप्त होत नाही. सदाभाऊ अशा भूमिकेतूनच टीका करत आहेत. वास्तविक ते शेतकऱ्यांचे नेते आहेत. केंद्र शासन शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायला निघाले आहे. त्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनीच पाठिंबा द्यायला हवा होता. सदाभाऊ यांचा ट्रॅक चुकला आहे.केंद्र शासन आंदोलनाला जुमानत नाहीपेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. दर पंधरा दिवसाला हे दर वाढत असून सामान्य नागरिकांची कुचंबणा होताना पाहायला मिळते. हे दर वाढत राहणार, अशी सवय लागून गेलेली आहे. केंद्र शासन आंदोलनांना जुमानत नाही, अशी परिस्थिती आहे. 

जिल्हा बँकेला जावळीतून ठोकला शड्डूशिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पक्षाची ताकद टिकून ठेवायची असेल तर मला काम करावेच लागेल. कोणाला वाईट वाटते म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडायची का? काही दिवसांनी विधानपरिषद, डीपीडीसीची निवडणूक लागेल, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तरच या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढणार आहे.- शशिकांत शिंदे, आमदार

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसर