शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दर निच्चांकी तर लागवड उच्चांकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

आदर्की : फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले; पण कारखान्याकडून हमीभाव व वेळेत बिले मिळत नसल्याने शेतकरी ...

आदर्की : फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले; पण कारखान्याकडून हमीभाव व वेळेत बिले मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. आता लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे दर निच्चांकी आहेत; पण आगामी काळात भाजीपाल्यास दर मिळेल, या आशेवर आदर्की परिसरात टोमॅटोचे पंचवीस लाख रोपांची लागवड केल्याने दर निच्चांकी, तरीही लागवड उच्चांकी झाली आहे.

फलटण पश्चिम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती, त्यावेळी एक ते दोन लाख रोपांची लागवड होत असे. त्यावेळी मे-जूनमध्ये टोमॅटो पिकांना टँकरने पाणी घालावे लागत होते. दहा वर्षांपूर्वी धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे ओढ्यात सोडून पाझर तलाव, बंधारे भरू लागल्याने कालव्या लगतच्या गावात भूगर्भातील पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने बागायती शेत्रात वाढ होऊन प्रारंभी शेतकरी ऊस शेतीकडे वळला; पण साखर कारखाने हमीभाव वेळेत निश्चित करत नाहीत व उसाची बिले वेळेत देत नसल्याने शेतकरी नगदी पिकाकडे वळला. तो शेवगा, टोमॅटो, गवारी, कोबी, प्लॉवर, मिरची आदी भाजीपाला घेऊ लागला.

कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहेत, त्यामुळे तो तोट्यात गेला आहे; पण आगामी पावसाळी हंगामात टोमॅटो पिकास कायम दर मिळ्तो, या आशेवर आदर्की परिसरात पंचवीस लाख रोपांची लागवड झाली आहे.

चौकट..

टोमॅटोला किलोला आठ ते दहा रुपये दर

यावर्षी नोकऱ्या गमावलेले तरुण मोठ्या प्रमाणात शेती करू लागले. शेतकऱ्यांनी रोपे, ओषधे, खते, काठी, सुतळी यावर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता टोमॅटोला प्रतिकिलो आठ ते दहा रुपये दर आहे; पण खर्च वजा जाता शेतकऱ्यास काही मिळत नाही, त्यामुळे दर निच्चांकी, तर लागवड उच्चांकी झाल्याचे चित्र आदर्की परिसरात दिसत आहे.

१७आदर्की

फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले; पण कारखान्याकडून हमीभाव व वेळेत बिले मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे.