शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राजकीय नेत्यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर... तो गावात येणार नाही... आरोग्य यंत्रणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:33 IST

कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.

ठळक मुद्देयातून सुटका करण्यासाठी होम क्वारंटाईन असतानासुद्धा हातावर शिक्का न मारण्यासाठी आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागातील डॉक्टर यांना या कामात स्थानिक नेते व पदाधिकारी हस्तक्षेप करून अडचणी वाढवत आहेत. .

खटाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यातूनही अनेकजण पुणे, मुंबईहून स्वगृही परतले आहेत. त्यांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी थांबण्यास सांगितले जाते; पण अनेक तरुण विविध कारणं देऊन शिक्का न मारण्याची विनंती करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे आई आजारी आहे. बाहेर जाता येणार नाही.

कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.

खटावला याला अपवाद ठरला आहे. अनोळखी लोकांचा वावर वाढला असल्यामुळे स्थानिकांच्या मनात मात्र भीतीचे वातावरण दिसून येत आहे. आरोग्य विभाग आता डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. त्यांना आशा सेविका, अंगणवाडी सेविकाचे चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे. कोणत्याही घरात अनोळखी तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीवर त्या बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणी आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र्रात जाऊन तपासणी करून घेण्यासाठी तगादा लावत आहेत. परंतु त्यांच्याही हातावर तुरी देण्याचे काम काही महाभाग करत आहेत.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे बंधनकारक आहे. हा शिक्का मारला तर मोकळेपणाने फिरण्यावर निर्बंधे येतील, यातून सुटका करण्यासाठी होम क्वारंटाईन असतानासुद्धा हातावर शिक्का न मारण्यासाठी आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागातील डॉक्टर यांना या कामात स्थानिक नेते व पदाधिकारी हस्तक्षेप करून अडचणी वाढवत आहेत..शासकीय नियमांचे कठोर पालन व्हावेवास्तविक, ग्रामीण भागात अजून कोरोनाने शिरकाव झालेला नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना घरातच बसवले तर त्यांच्यामुळे इतरांना धोका पोहोचणार नाही. मात्र कारवाई करण्यात आरोग्य विभागापुढे अडचणी येत आहेत. राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने मात्र तो लवकरच गावात यायला कमी करणार नाही, अशी प्रतिक्रिया सध्या शासनाने लावलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणा-या सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे

टॅग्स :Medicalवैद्यकीयPoliticsराजकारणCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या