शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एक भगदाड मुजविले तर दुसरीकडे पडले!

By admin | Updated: September 18, 2016 00:06 IST

आरळे पुलाची चाळण : पाच ब्रास खडीचा वापर झाल्याने वाहन चालकांमध्ये भीती; शशिकांत शिंदे यांच्याकडून पुलाची पाहणी

शिवथर : सातारा-लोणंद रस्त्यावरील आरळे-वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलावर तसेच पुलाच्या पायथ्याजवळ शुक्रवारी भगदाड पडले होते. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला. पाच ब्रास खडी टाकून खड्डे मुजविले; परंतु त्याच रात्री दुसऱ्या ठिकाणी पुलाला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे पुलाची चाळण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल चुकविण्यासाठी सातारा-लोणंद रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुलावर झाडे वाढल्या असून, झाडाच्या मुळ्या खोल्यावर गेल्या आहेत. पुलाच्या कडेला पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. सातारा-लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षे लागतील; परंतु काही दुर्घटना घडू नये, यासाठी पुलाचे फोटो काढून दुरुस्तीचा प्रस्ताव दोन दिवसांमध्ये देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी निधी मिळावा म्हणून मंत्रांशी लवकर चर्चा करणार आहे.त्यावेळी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, बबनराव साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एच. मोहिते, कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, शाखा अभियंता डी. पी. वंजारी, सी. व्ही. कांत, मिलिंद कुलकर्णी, अरविंद पाटील, विजय कदम, आबा कासकर, अनिल वाघमळे, वैभव कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुण्याच्या तज्ज्ञांना पाचारणउन्हाळा सुरू असल्याने पुलाची परिस्थिती जाणवली नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने भगदाड जाणवले. पुण्याचे तज्ज्ञ सोमवारी येणार असून, मंगळवार, बुधवारी काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.तीन महिन्यांपूर्वी कसली केली होती पाहणी?चौथी घटनाया पुलाच्या कडेला आजवर चारवेळा भगदाड पडले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तात्पुरती मलमपट्टी न करता पुलाचे चांगल्या पद्धतीने काम करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील यांनी केली आहे.विद्यार्थ्यांसाठी एसटीची धडपडहा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एसटीची फेरी कशी सुरू करायची, या संदर्भात सातारा आगारातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिवथर-बोरखळ, लिंब, कोरेगाव येथे जाऊन पाहणी केली असल्याचे सहायक वाहतूक अधीक्षक नौशाद तांबोळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.