शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

एक भगदाड मुजविले तर दुसरीकडे पडले!

By admin | Updated: September 18, 2016 00:06 IST

आरळे पुलाची चाळण : पाच ब्रास खडीचा वापर झाल्याने वाहन चालकांमध्ये भीती; शशिकांत शिंदे यांच्याकडून पुलाची पाहणी

शिवथर : सातारा-लोणंद रस्त्यावरील आरळे-वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलावर तसेच पुलाच्या पायथ्याजवळ शुक्रवारी भगदाड पडले होते. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला. पाच ब्रास खडी टाकून खड्डे मुजविले; परंतु त्याच रात्री दुसऱ्या ठिकाणी पुलाला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे पुलाची चाळण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल चुकविण्यासाठी सातारा-लोणंद रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुलावर झाडे वाढल्या असून, झाडाच्या मुळ्या खोल्यावर गेल्या आहेत. पुलाच्या कडेला पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. सातारा-लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षे लागतील; परंतु काही दुर्घटना घडू नये, यासाठी पुलाचे फोटो काढून दुरुस्तीचा प्रस्ताव दोन दिवसांमध्ये देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी निधी मिळावा म्हणून मंत्रांशी लवकर चर्चा करणार आहे.त्यावेळी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, बबनराव साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एच. मोहिते, कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, शाखा अभियंता डी. पी. वंजारी, सी. व्ही. कांत, मिलिंद कुलकर्णी, अरविंद पाटील, विजय कदम, आबा कासकर, अनिल वाघमळे, वैभव कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुण्याच्या तज्ज्ञांना पाचारणउन्हाळा सुरू असल्याने पुलाची परिस्थिती जाणवली नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने भगदाड जाणवले. पुण्याचे तज्ज्ञ सोमवारी येणार असून, मंगळवार, बुधवारी काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.तीन महिन्यांपूर्वी कसली केली होती पाहणी?चौथी घटनाया पुलाच्या कडेला आजवर चारवेळा भगदाड पडले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तात्पुरती मलमपट्टी न करता पुलाचे चांगल्या पद्धतीने काम करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील यांनी केली आहे.विद्यार्थ्यांसाठी एसटीची धडपडहा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एसटीची फेरी कशी सुरू करायची, या संदर्भात सातारा आगारातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिवथर-बोरखळ, लिंब, कोरेगाव येथे जाऊन पाहणी केली असल्याचे सहायक वाहतूक अधीक्षक नौशाद तांबोळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.