शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

भुकेल्यांसाठी धावतायेत आई प्रतिष्ठानचे शिलेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

पाचवड : वाई तालुक्यातील अमृतवाडी येथील आई प्रतिष्ठानचे शिलेदार आणि परिसरातील काही युवक लॉकडाऊन काळात एकत्र येऊन पाचवड, भुईंज ...

पाचवड : वाई तालुक्यातील अमृतवाडी येथील आई प्रतिष्ठानचे शिलेदार आणि परिसरातील काही युवक लॉकडाऊन काळात एकत्र येऊन पाचवड, भुईंज परिसरातील रुग्णालयांमधील रुग्ण, रुग्णांच्या नातेवाइकांना त्याशिवाय इतर अनेकांना स्वच्छ, सकस, परिपूर्ण भोजन दररोज जागेपोहोच करतात, तेही निरपेक्ष भावनेने आणि स्वयंप्रेरणेने हे सारंच चकित करणारं आणि भारावून टाकणार आहे.

केवळ रुग्णालयातच नव्हे तर महामार्गावरील ट्रकचालक, कष्टकरी, मजूर, निराधार, कातकरी वस्तीवरील लोक किंवा अगदी भिक्षेकरी.. असे कोणी जे-जे भुकेले, त्या त्या भुकेल्या जिवांना जागेपोहोच मोफत अन्नसेवेचा यज्ञ या युवकांकडून चालवला जात आहे.

सद्य:स्थितीतील या अंधारल्या दाही दिशांत काम करणारे हे सारे युवक म्हणजे प्रकाशाचे वारसदार. ‘आई फाउण्डेशन’च्या या उपक्रमाद्वारे केवळ भुकेल्यांनाच अन्न दिले जात नाही तर या महत्कार्यापलीकडे जाऊन परिसरातील निराधार, वयोवृद्ध महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे आणि औषधांचेदेखील मोफत वितरण केले जातेय. लॉकडाऊनमध्ये आलेल्या आर्थिक अडचणीमुळे औषधांपासून संबंधित गरजू वंचित राहू नये, याचाही त्यांनी विचार केलाय. ही कळकळ, तळमळ दाद देण्याजोगी.

अगदी पाचवड येथे बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस, होमगार्ड‌्सनादेखील सकाळ-संध्याकाळ नास्ता पोहोच केला जातोय. तसेच या उपक्रमातील दररोजच्या जेवणामध्ये चपाती, भाजी, भात, आमटी असतेच शिवाय रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या मातांसाठी साजूक तूप घातलेला इंद्रायणी तांदळाचा गीजगा भात आणि वरण असे भोजन पोहोचवले जात आहे. भल्या सकाळी सहा-साडेसहा वाजता हे सारेजण पाचवडमध्ये कामाला सुरुवात करतात. स्वच्छता आणि आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत जेवण बनवले जाते. हे बनवण्यासाठी ज्या आचारी मामांना बोलावले तेदेखील या युवकांची तळमळ पाहून कामाचा मेहनताना घेईनासे झालेत. सामान्य माणसाच्या अंगी असणारे कृतज्ञतेचे बळ दिसून येते ते असे. जेवण तयार झाल्यानंतर त्याचे पॅकिंग करून जिथून-जिथून मागणी तिथे तिथे पोहोच करायला गाडी रवाना होते.

या सर्व कामात त्यांना जे अनुभव येतायत ते त्यांचं बळ वाढवणारेच आहे. एकच उदाहरण सांगायचे तर अगदी बंगलोरहून इथपर्यंत उपाशी आलेले ट्रकचालक जेव्हा या उपक्रमाचा लाभ घेतात त्यावेळी डोळ्यात पाणी आणून या युवकांना धन्यवाद देतात. सर्वच काही बंद असल्याने काही सुस्थितील लोकदेखील जेव्हा त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेतात, तेव्हा या युवकांना आर्थिक मदत देऊ करतात; पण आर्थिक मदत ते स्वीकारतच नाहीत. त्यामुळे मग कोणी साहित्य रूपाने मदत करतो.

आनेवाडी टोलनाक्यापासून वेळे गावापर्यंत भुकेल्यांना अन्न पोहोचविण्यासाठी हे सर्वजण धावतायेत. स्वतःची पावलंही उमटू न देता मदतीची एकसे बढकर एक भव्य शिल्प साकारत पुढे चाललेल्या या आई प्रतिष्ठानच्या शिलेदारांचे परिसरात कौतुक होत आहे.