शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

भुकेल्यांसाठी धावतायेत आई प्रतिष्ठानचे शिलेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

पाचवड : वाई तालुक्यातील अमृतवाडी येथील आई प्रतिष्ठानचे शिलेदार आणि परिसरातील काही युवक लॉकडाऊन काळात एकत्र येऊन पाचवड, भुईंज ...

पाचवड : वाई तालुक्यातील अमृतवाडी येथील आई प्रतिष्ठानचे शिलेदार आणि परिसरातील काही युवक लॉकडाऊन काळात एकत्र येऊन पाचवड, भुईंज परिसरातील रुग्णालयांमधील रुग्ण, रुग्णांच्या नातेवाइकांना त्याशिवाय इतर अनेकांना स्वच्छ, सकस, परिपूर्ण भोजन दररोज जागेपोहोच करतात, तेही निरपेक्ष भावनेने आणि स्वयंप्रेरणेने हे सारंच चकित करणारं आणि भारावून टाकणार आहे.

केवळ रुग्णालयातच नव्हे तर महामार्गावरील ट्रकचालक, कष्टकरी, मजूर, निराधार, कातकरी वस्तीवरील लोक किंवा अगदी भिक्षेकरी.. असे कोणी जे-जे भुकेले, त्या त्या भुकेल्या जिवांना जागेपोहोच मोफत अन्नसेवेचा यज्ञ या युवकांकडून चालवला जात आहे.

सद्य:स्थितीतील या अंधारल्या दाही दिशांत काम करणारे हे सारे युवक म्हणजे प्रकाशाचे वारसदार. ‘आई फाउण्डेशन’च्या या उपक्रमाद्वारे केवळ भुकेल्यांनाच अन्न दिले जात नाही तर या महत्कार्यापलीकडे जाऊन परिसरातील निराधार, वयोवृद्ध महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे आणि औषधांचेदेखील मोफत वितरण केले जातेय. लॉकडाऊनमध्ये आलेल्या आर्थिक अडचणीमुळे औषधांपासून संबंधित गरजू वंचित राहू नये, याचाही त्यांनी विचार केलाय. ही कळकळ, तळमळ दाद देण्याजोगी.

अगदी पाचवड येथे बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस, होमगार्ड‌्सनादेखील सकाळ-संध्याकाळ नास्ता पोहोच केला जातोय. तसेच या उपक्रमातील दररोजच्या जेवणामध्ये चपाती, भाजी, भात, आमटी असतेच शिवाय रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या मातांसाठी साजूक तूप घातलेला इंद्रायणी तांदळाचा गीजगा भात आणि वरण असे भोजन पोहोचवले जात आहे. भल्या सकाळी सहा-साडेसहा वाजता हे सारेजण पाचवडमध्ये कामाला सुरुवात करतात. स्वच्छता आणि आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत जेवण बनवले जाते. हे बनवण्यासाठी ज्या आचारी मामांना बोलावले तेदेखील या युवकांची तळमळ पाहून कामाचा मेहनताना घेईनासे झालेत. सामान्य माणसाच्या अंगी असणारे कृतज्ञतेचे बळ दिसून येते ते असे. जेवण तयार झाल्यानंतर त्याचे पॅकिंग करून जिथून-जिथून मागणी तिथे तिथे पोहोच करायला गाडी रवाना होते.

या सर्व कामात त्यांना जे अनुभव येतायत ते त्यांचं बळ वाढवणारेच आहे. एकच उदाहरण सांगायचे तर अगदी बंगलोरहून इथपर्यंत उपाशी आलेले ट्रकचालक जेव्हा या उपक्रमाचा लाभ घेतात त्यावेळी डोळ्यात पाणी आणून या युवकांना धन्यवाद देतात. सर्वच काही बंद असल्याने काही सुस्थितील लोकदेखील जेव्हा त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेतात, तेव्हा या युवकांना आर्थिक मदत देऊ करतात; पण आर्थिक मदत ते स्वीकारतच नाहीत. त्यामुळे मग कोणी साहित्य रूपाने मदत करतो.

आनेवाडी टोलनाक्यापासून वेळे गावापर्यंत भुकेल्यांना अन्न पोहोचविण्यासाठी हे सर्वजण धावतायेत. स्वतःची पावलंही उमटू न देता मदतीची एकसे बढकर एक भव्य शिल्प साकारत पुढे चाललेल्या या आई प्रतिष्ठानच्या शिलेदारांचे परिसरात कौतुक होत आहे.