शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

हुश्श... रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: January 23, 2015 00:42 IST

आज मुदत संपली : रस्ता खोदण्याचे काम बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश; रस्ते खोदण्यास पुन्हा परवानगी नाही

सातारा : सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सध्या शहरात रस्ते खुदाई सुरू होती. मात्र, रस्ते खुदाईची मुदत शुक्रवारी पहाटे सहा वाजता संपल्याने शहरातील रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून शहरात सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिसूचनेनुसार रात्री दहा ते पहाटे सहापर्यंत रस्ते खुदाईसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न येत नव्हता; परंतु रात्री खोदलेले रस्ते दिवसा उजाड आणि भकास दिसत होते. तसेच रस्त्यांमध्ये चर काढल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही होत होती. रस्त्यामधील चर मुजविल्या असल्या तरी दगड आणि माती रस्त्यावरच पडलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. पुन्हा-पुन्हा रस्ते खोदण्यापेक्षा एकदाचेच काही ते काम करून घ्या, अशी सातारकरांची मानसिकता झाली होती. त्यामुळे अशा खडतर रस्त्यातूनही सातारकरांनी नाईलाजास्तव संयम ठेवला. या पुढील काळात आता चांगले आणि चकाचक रस्ते मिळणार असल्याने खड्ड्यांचेही स्वागत नागरिकांनी हसतमुखाने केले. (प्रतिनिधी)कोणत्याही परिस्थितीत पुन्हा रस्ते खोदता येणार नाहीत सातारा : नळ कनेक्शन असो किंवा इतर कोणतीही रस्त्यांची कामे असो, रस्त्यांच्या डांबरीकरणानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा रस्ते खोदू नयेत, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गुरूवारी दुपारी नगरपालिकेत आले होते. ते म्हणाले, जाहिरात फलक व स्वागत कमानींमुळे रस्त्यांना पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे डांबरीकरण झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रस्ते खुदाईला परवानगी दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही परिस्थितीत नवीन नळ कनेक्शन दिले जाणार नाही.’ पालिका जागा निश्चित करुन देईल अशाच ठिकाणी जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार आहे. तीन दिवसांपेक्षा अधिक काळासाठी जाहिरात ङ्खफलकांना परवानगी देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)३६ कनेक्शन जोडलीसुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामामध्ये आत्तापर्यंत ३६ नवीन कनेक्शन जोडण्यात आली आहेत. रस्ता खुदाईसाठी २२ जानेवारीची डेडलाईन असल्यामुळे रात्री दहा ते सकाळी सहापर्यंतच खुदाईची मुदत आहे. अजून १४ कनेक्शन जोडायची आहेत. त्यामुळे रात्रभर काम करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.