शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

‘तौउते’ चक्रीवादळाने पेरणीपूर्व मशागतींना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:41 IST

वरकुटे-मलवडी : चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने सर्वांचीच धांदल उडाली आहे. माण पूर्व भागात पेरणीपूर्व मशागतींची लगबग सुरू ...

वरकुटे-मलवडी : चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने सर्वांचीच धांदल उडाली आहे. माण पूर्व भागात पेरणीपूर्व मशागतींची लगबग सुरू असतानाच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर मशागती सुरू होऊन नंतर पेरणी केली जाणार असल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.

शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून, कोरोनातील लॉकडाऊनमुळे शेतीच्या कामात अडथळे निर्माण होताना दिसत आहेत.

मे महिना संपत आल्याने शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागती करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवारात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली होती. मात्र, अरबी समुद्रात सुरू झालेल्या ‘तौउते’ चक्रीवादळामुळे वातावरण दूषित झाल्याने पेरणीपूर्व मशागतींना ब्रेक लागला आहे.

चक्रीवादळामुळे सर्वत्र पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा पसरला असून, शेतीची कामेही खोळंबली आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला नांगरट, रोटरची कामे झाली असली तरी सध्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतातील घाण काढणे, कुळवणी, सरी पाडण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले होते. मात्र, पावसामुळे ही कामे थांबली आहेत. मशागतींच्या कामासोबतच शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. कोरोनामुळे बाजारपेठांत निर्बंध आहेत. मात्र, शेतीच्या कामासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे शेती संबंधित दुकाने सुरू असल्याने, शेतकरी दुकानांवर गर्दी करीत आहेत.

कोरोना व लॉकडाऊनची स्थिती असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतीची कामे कशी पूर्ण करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. कोरोनामुळे मजूर मिळण्याची पंचाईत झाली असून, बी-बियाणांचाही तुटवडा पडण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने खरिपाच्या पेरण्यांसंदर्भात योग्य नियोजन केले असले तरीपण त्याची अंमलबजावणी कितपत होते हे महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य पद्धतीने नियोजन न झाल्यास आधीच कोरोना, लॉकडाऊन त्यातच खरीप वाया गेले, तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

(चौकट)

माण तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफ पेरण्या केल्या जातात. मात्र, अवकाळी पावसानंतर थोड्याच कालावधीत वादळी पावसाने सुरुवात केल्याने येथील शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागती थांबल्या आहेत. त्यातच वादळी पावसाला धरूनच मान्सून सुरू झाल्यास येथील पेरण्यांची परिस्थिती अवघड होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. एकूणच शेतकरी व कृषी विभागापुढे खरीप वाचविण्याचे मोठे संकट उभे आहे. सुरू असलेला वादळी पाऊस कितपत पडतोय आणि पेरणी होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी निसर्गाच्या अवकाळीपणासमोर शेतकरी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

फोटो :