शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

शेकडो वृक्षांची कत्तल करून ‘अग्निसंस्कार’

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

मांघर येथील घटना : धनिकांच्या बंगल्यांसाठी ‘ईएसझेड’मध्ये पुन्हा वृक्षतोड

महाबळेश्वर : परिसरातील शिंदोळा, मेटतळे, भेकवली, हरोशी या गावांतील विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना ताज्या असतानाच आता मांघर येथेही धनिकांच्या बंगल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते पेटवून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सुमारे आठवडाभर ही वृक्षतोड सुरू होती; परंतु तलाठी व ग्रामसेवकाने गांधारीची भूमिका घेतल्याने ती पूर्ण होऊ शकली. या वृक्षतोडीमुळे महाबळेश्वरात संतापाची लाट उसळली असून, वृक्षसंहार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.केंद्र शासनाने महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून जाहीर केले आहे. असे असूनही वारंवार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. वृक्षसंहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन गांधारीची भूमिका घेताना दिसत आहे. या भूमिकेमुळे वृक्षतोडीला एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, त्यातील मांघरचा प्रकार रविवारी उघडकीस आला.महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर मांघर गावातील गट क्र. १९ चा १ व फॉरेस्ट कम्पार्टमेंट ९२ लगत सुमारे २५ गुंठे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. ही मिळकत विकण्याचा मालकाचा विचार आहे. ही मिळकत एक स्थानिक राजकीय पुढारी घेणार असल्याची चर्चा आहे. या मिळकतीत जांभूळ, गेळा, भौमा, अंजन, हिरडा आदी वनौषधी व दुर्मिळ वृक्ष होते. त्यापैकी ९० टक्के वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. काही वृक्ष आजही या मिळकतीत शेवटची घटका मोजत आहेत. वृक्षांची कत्तल करून ते जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे झाडांची खोडेही जळाली आहेत. संबंधिताने वृक्ष तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सुमारे दीडशे ते दोनशे वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज रविवार असल्याने कोणत्याही खात्याकडून या प्रकाराची दखल घेतली गेलेली नाही. भेकवली येथील वृक्षतोड ज्या तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात झाली, त्याच तलाठ्याच्या क्षेत्रात हा भाग येत असल्याने या तलाठ्याच्या भूमिकेविषयी शहरातून शंका व्यक्त केली जात आहे. या तलाठ्यावर खातेअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाबळेश्वर व परिसरात होत असलेल्या विनापरवाना वृक्षतोडीकडे आमदार मकरंद पाटील यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांचे लक्ष वेधले होते. याच बैठकीत पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या बैठकीला आठ दिवस उलटत नाहीत तोच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीचा प्रकार समोर आल्याने पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)बंगलेही उभे राहिलेडोंगरउतारावर असलेल्या या जागेच्या लगत अशाच प्रकारे वृक्षतोड करून व मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून बंगले बांधण्याचे काम सुरू आहे. हे बंगले पुण्यातील व्यक्तींचे असल्याचे गावकरी सांगतात. दरम्यान, या बांधकामावर महसूल खात्याने कारवाई सुरू केली असल्याचेही वृत्त आहे. परंतु या ठिकाणी झालेली वृक्षतोड आणि उत्खननावर कारवाई होणार का, हे मात्र समजू शकले नाही. या बंगल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.