शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो वृक्षांची कत्तल करून ‘अग्निसंस्कार’

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

मांघर येथील घटना : धनिकांच्या बंगल्यांसाठी ‘ईएसझेड’मध्ये पुन्हा वृक्षतोड

महाबळेश्वर : परिसरातील शिंदोळा, मेटतळे, भेकवली, हरोशी या गावांतील विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना ताज्या असतानाच आता मांघर येथेही धनिकांच्या बंगल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते पेटवून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सुमारे आठवडाभर ही वृक्षतोड सुरू होती; परंतु तलाठी व ग्रामसेवकाने गांधारीची भूमिका घेतल्याने ती पूर्ण होऊ शकली. या वृक्षतोडीमुळे महाबळेश्वरात संतापाची लाट उसळली असून, वृक्षसंहार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.केंद्र शासनाने महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून जाहीर केले आहे. असे असूनही वारंवार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. वृक्षसंहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन गांधारीची भूमिका घेताना दिसत आहे. या भूमिकेमुळे वृक्षतोडीला एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, त्यातील मांघरचा प्रकार रविवारी उघडकीस आला.महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर मांघर गावातील गट क्र. १९ चा १ व फॉरेस्ट कम्पार्टमेंट ९२ लगत सुमारे २५ गुंठे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. ही मिळकत विकण्याचा मालकाचा विचार आहे. ही मिळकत एक स्थानिक राजकीय पुढारी घेणार असल्याची चर्चा आहे. या मिळकतीत जांभूळ, गेळा, भौमा, अंजन, हिरडा आदी वनौषधी व दुर्मिळ वृक्ष होते. त्यापैकी ९० टक्के वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. काही वृक्ष आजही या मिळकतीत शेवटची घटका मोजत आहेत. वृक्षांची कत्तल करून ते जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे झाडांची खोडेही जळाली आहेत. संबंधिताने वृक्ष तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सुमारे दीडशे ते दोनशे वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज रविवार असल्याने कोणत्याही खात्याकडून या प्रकाराची दखल घेतली गेलेली नाही. भेकवली येथील वृक्षतोड ज्या तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात झाली, त्याच तलाठ्याच्या क्षेत्रात हा भाग येत असल्याने या तलाठ्याच्या भूमिकेविषयी शहरातून शंका व्यक्त केली जात आहे. या तलाठ्यावर खातेअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाबळेश्वर व परिसरात होत असलेल्या विनापरवाना वृक्षतोडीकडे आमदार मकरंद पाटील यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांचे लक्ष वेधले होते. याच बैठकीत पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या बैठकीला आठ दिवस उलटत नाहीत तोच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीचा प्रकार समोर आल्याने पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)बंगलेही उभे राहिलेडोंगरउतारावर असलेल्या या जागेच्या लगत अशाच प्रकारे वृक्षतोड करून व मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून बंगले बांधण्याचे काम सुरू आहे. हे बंगले पुण्यातील व्यक्तींचे असल्याचे गावकरी सांगतात. दरम्यान, या बांधकामावर महसूल खात्याने कारवाई सुरू केली असल्याचेही वृत्त आहे. परंतु या ठिकाणी झालेली वृक्षतोड आणि उत्खननावर कारवाई होणार का, हे मात्र समजू शकले नाही. या बंगल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.