शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

स्वच्छतेसाठी राबले शेकडो हात; झाले हजारो तासांचे श्रमदान; सातारा जिल्ह्यात महाश्रमदान 

By नितीन काळेल | Updated: January 8, 2024 19:30 IST

हाती खोरी, घमेली अन् झाडू; १४९३ ग्रामपंचायती सहभागी 

सातारा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ ते १२ या वेळेत महाश्रमदान झाले. गावोगावी राबविलेल्या या अभियानात शेकडो हात राबले तसेच हजारो तासांचेही श्रमदान झाले. तर यामध्ये १ हजार ४९३ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. सर्वांच्या हाती झाडू, घमेले आणि खोरी दिसून आली. यातून शेकडो टन कचरा हद्दपार करण्यात आला.जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या संकल्पनेतून कचरा मुक्तीसाठी सोमवारी सकाळी ८ ते १२ हे चार तास स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात या मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. १ हजार ४९३ ग्रामपंचायतीत मोहीम राबवली गेली.यासाठी रविवारपासूनच सर्वांनी जोरदार तयारी केली होती. तसेच कचरा संकलनासाठी नियोजन केले होते. ट्रॅक्टर, घंटागाड्या, घमेली, खोरी, झाडू आणि मनुष्यबळाचे पुरेपूर नियोजन प्रत्येक गावात झाले होते. प्रत्येक ग्रामपंचायतीत मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गट सदस्या, युवक मंडळाचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी यांनीही स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.

गावागावात महा श्रमदान मोहिमेचे नेतृत्व गावातील सरपंच, ग्रामसेवक यांनी केले. रस्ते, गटारे, मोकळ्या जागा, बसस्थानक, पूल, शाळा आणि अंगणवाडी परिसर, ग्रामपंचायत कार्यालय आणि आरोग्य केंद्राचा परिसर, धार्मिकस्थळे, पर्यट स्थळे, नदी, नाले, तलाव, पानवट्याची ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. तर ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेमुळे गावेच्यागावे स्वच्छ झाली. स्वच्छतेमुळे झालेला बदल पाहून काही गावांनी आता महिन्यातून एकदा गावचा परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात महाश्रमदान झाले. यामध्ये हजारो हात राबले. यामुळे गावांतील कचरा हद्दपार झाला. जिल्ह्यात हे अभियान यशस्वी झाले आहे. गावातून कचरा कायमचा दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला सार्वजनिक स्वच्छतेचा उपक्रम राबवून स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवावे. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर