शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शंभर वर्षांपूर्वीचे अतिक्रमण अखेर निघाले

By admin | Updated: December 9, 2014 00:26 IST

जनजागृतीपर फलक : आदर्श गावाच्या वाटचालीसाठी कोंडवेचे सुशोभीकरण

कोंडवे : ग्रामसंसद अभियानांतर्गत खासदार उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतलेल्या कोंडवे ग्रामस्थांनी सोमवारी एकेची दर्शन घडवत सुमारे शंभर वर्षांपूवीचे अतिक्रमण हटवून दलित रस्ता खुला केला आहे. तसेच गावात निर्मल अभियान यशस्वी व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीतर्फे रस्त्याच्या कडेला जनजागृती करणारे फलक लावले आहेत. सातारा-मेढा रस्त्यापासून एक नवीन रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर पन्नास फुटांवर एका ग्रामस्थांने रस्ता अडविला होता. संबंधित जागा आपलीच असल्याची त्याची भूमिका असल्याने ही जागा अनेक वर्षांपासून वादात होती. त्यामुळे ग्रामस्थांची मात्र चांगलीच गैरसोय होत होती. कोंडवे गाव देशात आदर्श बनविण्याचा ध्यास घेतलेले जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी पुढाकार घेत संबंधित अतिक्रमण केलेल्याशी चर्चा करत गावाच्या विकासात साथ देण्याचे आवाहन केले. रस्त्यावरीलअतिक्रमण हटविल्यास पर्यायाने अतिक्रमण केलेल्यांचा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात ग्रामपंचायतीतर्फे मोठ्या प्रमाणावर मदत केली जाईल, असेही आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर जागेची मोजणी करुन सोमवारी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटविल्यामुळे गावातील अरुंद रस्त्यावर ताण कमी होणार आहे. तसेच दलितांसाठी येण्या-जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळणार आहे. आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या कोंडवे ग्रामस्थांचीही साथ मिळत आहे. तलाठी कार्यालयाच्या बाहेरील बाजूस रंगरंगोटी केली असतानाच काही ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने घर परिसराची स्वच्छता करुन रंगरंगोटी करत आहेत. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे प्रबोधन करणारे घोषवाक्यांचे फलक तयार केले आहेत. ते फलक रस्त्याच्या कडेला लावले आहेत. (प्रतिनिधी)दाखल्यांचे वाटपप्रांताधिकारी मल्लिकार्जून माने, तहसीलदार राजेश चव्हाण यांनी नुकतीच कोंडवे गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांना नवीन शिधापत्रिका, रहिवासी, अधिवास आदी दाखल्यांचे वाटप केले.