शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

माणसं जंगलात.. अन् वन्यप्राणी वसाहतीत

By admin | Updated: July 21, 2016 23:34 IST

वावर वाढला : अनाकलनीय घटनांनी सारेच हैराण; खाद्याच्या शोधार्थ भटकंती

दशरथ ननावरे --खंडाळा  -सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत वन्यप्राण्यांबद्दल घडलेल्या घटना अनाकलनीय आहेत. मनुष्यवस्तीमध्ये वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर धोक्याची घंटा मानली जात आहे. आधुनिकीकरणामुळे डोंगर आणि जंगलभागात मानवाचे अतिक्रमण वन्यजीवांसाठी अडचण ठरत असल्याने वन्यप्राणी असुरक्षितच वाटत आहेत. त्यामुळे ‘उठ मानवा, जागा हो, पाणीमात्रावर दया कर’ अशा शिकवणीची गरज भासू लागली आहे.जिल्ह्यातील पाटण येथे जखमी अवस्थेत आढळलेला अजगर, कण्हेर येथे धरण परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर, गेल्या महिन्यात खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे लांडग्यांनी केलेला मेढ्यांच्या कळपावरील हल्ला आणि दोनच दिवसांपूर्वी अंदोरी येथे आढळून आलेले बिबट्याचे अस्तित्व या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन अडचणीत येत असल्याचे समोर आले आहे.जंगल परिसर आणि डोंगर कपारीपर्यंत मानवी वस्तीचे राहणीमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नैसर्गिक जंगलांची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतली आहे. साहजिकच जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना खाद्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे. भेकराचा पाठलाग करून जखमी झालेल्या अजगरावर अद्यापही कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. तर कण्हेर परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर हाही चिंतेचा विषय आहे.अंदोरी सारख्या दुष्काळी भागात पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन घडले. खंडाळा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या भोर, पुरंदर येथील डोंगरी भागातून हा बिबट्या आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी भरकटलेल्या या जीवाची होत असलेली वाताहत कोणामुळे घडतेय याचा मागोवा घेणे गरजेचे आहे.पश्चिम घाट परिसरात असणाऱ्या वन्यजीवांचे राहणीमान बदलू लागले आहे की काय? की माणसाच्या अतिक्रमणामुळे वनसंपदा नष्ट होऊ लागल्याने आणि त्यांना आवश्यक आहार मिळत नसल्याने वन्यप्राण्यांचा वसाहतींमध्ये वावर वाढत चालला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)वन्यजीवांचे वास्तव्य हे डोंगरभागातच असायला हवे. मात्र, अलीकडच्या काळात पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांची सवय बदलू लागल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात बिबट्याचे वास्तव्य निदर्शनास आले तो भाग नदीकाठचा आणि विशेषत: ऊसशेतीचा आहे. जंगलातील छोट्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याने शिकारीच्या शोधार्थ बिबट्या येऊ शकतो. ऊसशेतीच्या ठिकाणी भेकर, ससे आणि अन्य प्राणी आढळून येतात. बिबट्या एकटा असले तर चिंतेची बाब नाही. मात्र, त्यांची संख्या जास्त असल्यास ते याठिकाणी राहून पैदास वाढवू शकतात. असे अनेक ठिकाणी आढळून आले आहे.- रवींद्र पवार, प्राणीमित्रअंदोरी भाग हा नदीकाठी आहे. या ठिकाणी असलेल्या बिबट्याचा वावर हा नैसर्गिक वाटत नाही. बिबट्या अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी आला असावा, अशी दाट शक्यता आहे. आमचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा मिळाला नाही.- ए. व्ही. शिंदे, वनक्षेत्रपाल