शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

माणसं जंगलात.. अन् वन्यप्राणी वसाहतीत

By admin | Updated: July 21, 2016 23:34 IST

वावर वाढला : अनाकलनीय घटनांनी सारेच हैराण; खाद्याच्या शोधार्थ भटकंती

दशरथ ननावरे --खंडाळा  -सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत वन्यप्राण्यांबद्दल घडलेल्या घटना अनाकलनीय आहेत. मनुष्यवस्तीमध्ये वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर धोक्याची घंटा मानली जात आहे. आधुनिकीकरणामुळे डोंगर आणि जंगलभागात मानवाचे अतिक्रमण वन्यजीवांसाठी अडचण ठरत असल्याने वन्यप्राणी असुरक्षितच वाटत आहेत. त्यामुळे ‘उठ मानवा, जागा हो, पाणीमात्रावर दया कर’ अशा शिकवणीची गरज भासू लागली आहे.जिल्ह्यातील पाटण येथे जखमी अवस्थेत आढळलेला अजगर, कण्हेर येथे धरण परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर, गेल्या महिन्यात खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे लांडग्यांनी केलेला मेढ्यांच्या कळपावरील हल्ला आणि दोनच दिवसांपूर्वी अंदोरी येथे आढळून आलेले बिबट्याचे अस्तित्व या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन अडचणीत येत असल्याचे समोर आले आहे.जंगल परिसर आणि डोंगर कपारीपर्यंत मानवी वस्तीचे राहणीमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नैसर्गिक जंगलांची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतली आहे. साहजिकच जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना खाद्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे. भेकराचा पाठलाग करून जखमी झालेल्या अजगरावर अद्यापही कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. तर कण्हेर परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर हाही चिंतेचा विषय आहे.अंदोरी सारख्या दुष्काळी भागात पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन घडले. खंडाळा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या भोर, पुरंदर येथील डोंगरी भागातून हा बिबट्या आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी भरकटलेल्या या जीवाची होत असलेली वाताहत कोणामुळे घडतेय याचा मागोवा घेणे गरजेचे आहे.पश्चिम घाट परिसरात असणाऱ्या वन्यजीवांचे राहणीमान बदलू लागले आहे की काय? की माणसाच्या अतिक्रमणामुळे वनसंपदा नष्ट होऊ लागल्याने आणि त्यांना आवश्यक आहार मिळत नसल्याने वन्यप्राण्यांचा वसाहतींमध्ये वावर वाढत चालला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)वन्यजीवांचे वास्तव्य हे डोंगरभागातच असायला हवे. मात्र, अलीकडच्या काळात पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांची सवय बदलू लागल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात बिबट्याचे वास्तव्य निदर्शनास आले तो भाग नदीकाठचा आणि विशेषत: ऊसशेतीचा आहे. जंगलातील छोट्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याने शिकारीच्या शोधार्थ बिबट्या येऊ शकतो. ऊसशेतीच्या ठिकाणी भेकर, ससे आणि अन्य प्राणी आढळून येतात. बिबट्या एकटा असले तर चिंतेची बाब नाही. मात्र, त्यांची संख्या जास्त असल्यास ते याठिकाणी राहून पैदास वाढवू शकतात. असे अनेक ठिकाणी आढळून आले आहे.- रवींद्र पवार, प्राणीमित्रअंदोरी भाग हा नदीकाठी आहे. या ठिकाणी असलेल्या बिबट्याचा वावर हा नैसर्गिक वाटत नाही. बिबट्या अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी आला असावा, अशी दाट शक्यता आहे. आमचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा मिळाला नाही.- ए. व्ही. शिंदे, वनक्षेत्रपाल