शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

परस्परांच्या अधिवासातील अतिक्रमण ठरतेय त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 13:54 IST

मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो.

प्रगती जाधव-पाटील

सातारा : शहरीकरणाच्या वाढत्या व्यापात मानवाने जाणते-अजाणतेपणी वन्यप्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे, या उद्देशाने डोंगर उतारावर बांधलेल्या घरांमधून नाचणारा मोर विलोभनीय तर वावरणारा बिबट्या भयावह वाटू लागला आहे. परस्परांच्या अधिवासात सुरू असलेले अतिक्रमण त्रासदायक असले तरीही त्याची सवय करून घेऊन मानव आणि बिबट्या संघर्ष टाळणे महत्त्वाचे आहे.

वनक्षेत्रालगत वास्तव्य करणाऱ्या शहरातील अनेकांनी बिबट्याला पाहिले असल्याच दावा केला आहे. विनाकारण वन्यप्राण्यांना डिवचून त्यांना हल्ला करण्यासाठी निमंत्रण देण्याचे प्रकार सुरू असतात. तीन वर्षांपूर्वी वणवा लागला म्हणून शाहूपुरीत पिल्लांसह बिबट्या एका ओघळीत बसला होता. बिबट्या तिथे आहे याची चाहुल लागल्यानंतर झुंडीने लोक तिथे पोहोचले. त्याला हुसकावण्यासाठी काहींनी दगड धोंडेही त्याच्या दिशेने भिरकावले. असुरक्षितता जाणवल्यानंतर बिबट्याने एका नागरिकावर हल्ला चढवला. हा अपवाद वगळता बिबट्याने मानवी वस्तीत येऊन हल्ला चढविल्याचा जिल्ह्यात कुठेही ऐकिवात नाही.

उघड्यावरचा कचराही देतोय आमंत्रण

- अनेकदा वन्यप्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केल्याने त्यांना शिकारीला प्राणीच मिळत नाहीत. आपली भूक भागविण्यासाठी बिबटे भक्ष्य शोधत मानवी वस्तीकडे येतात.- ज्या भागांमध्ये उघड्यावर कचरा टाकला जातो तिथे श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो.- वनक्षेत्रात झगडून शिकार मिळविण्यापेक्षा कचऱ्यातून अन्न शोधणाऱ्या श्वानांची शिकार करणे त्याला कमी त्रासाचे वाटते. ग्रामीण भागातही उघड्यावर बांधलेल्या शेळ्या आणि गायी म्हशींवर हल्ला होतो.

अशी आहे नुकसानभरपाई

बिबट्याला संवर्धन आणि संरक्षण दिल्यानंतर त्याच्या हल्ल्यात कोणी जखमी, अपंग किंवा मृत्यूमुखी पडले तरीही त्याला नुकसानभरपाई देण्याचे कायद्यात नमूद करण्यात आले आहे. या अंतर्गत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना १५ लाख रूपयांची भरपाई शासनाकडून तातडीने देण्यात येते. हल्ल्यात कायमस्वरूपी अपंग झालेल्यांना ५ लाख रूपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना १.२५ लाख रूपयांची मदत केली जाते. सातारा जिल्ह्यात गत महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही जिल्ह्यातील एकमेव घटना आहे.

त्यांचाही विचार व्हावा!

आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याची धमक मानवात आहे. मात्र, मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो. बऱ्याचदा याच काळात पिल्लांच्या अन्नासाठी बाहेर पडलेल्या मादी बिबट्यावर विषप्रयोग, त्यांची शिकार किंवा मग पिंजऱ्यातून अन्यत्र हलविले जाते. मादी बिबट्याशिवाय या पिल्लांना अन्नासाठीही तडफडत बसावे लागते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या