शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

परस्परांच्या अधिवासातील अतिक्रमण ठरतेय त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 13:54 IST

मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो.

प्रगती जाधव-पाटील

सातारा : शहरीकरणाच्या वाढत्या व्यापात मानवाने जाणते-अजाणतेपणी वन्यप्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे, या उद्देशाने डोंगर उतारावर बांधलेल्या घरांमधून नाचणारा मोर विलोभनीय तर वावरणारा बिबट्या भयावह वाटू लागला आहे. परस्परांच्या अधिवासात सुरू असलेले अतिक्रमण त्रासदायक असले तरीही त्याची सवय करून घेऊन मानव आणि बिबट्या संघर्ष टाळणे महत्त्वाचे आहे.

वनक्षेत्रालगत वास्तव्य करणाऱ्या शहरातील अनेकांनी बिबट्याला पाहिले असल्याच दावा केला आहे. विनाकारण वन्यप्राण्यांना डिवचून त्यांना हल्ला करण्यासाठी निमंत्रण देण्याचे प्रकार सुरू असतात. तीन वर्षांपूर्वी वणवा लागला म्हणून शाहूपुरीत पिल्लांसह बिबट्या एका ओघळीत बसला होता. बिबट्या तिथे आहे याची चाहुल लागल्यानंतर झुंडीने लोक तिथे पोहोचले. त्याला हुसकावण्यासाठी काहींनी दगड धोंडेही त्याच्या दिशेने भिरकावले. असुरक्षितता जाणवल्यानंतर बिबट्याने एका नागरिकावर हल्ला चढवला. हा अपवाद वगळता बिबट्याने मानवी वस्तीत येऊन हल्ला चढविल्याचा जिल्ह्यात कुठेही ऐकिवात नाही.

उघड्यावरचा कचराही देतोय आमंत्रण

- अनेकदा वन्यप्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केल्याने त्यांना शिकारीला प्राणीच मिळत नाहीत. आपली भूक भागविण्यासाठी बिबटे भक्ष्य शोधत मानवी वस्तीकडे येतात.- ज्या भागांमध्ये उघड्यावर कचरा टाकला जातो तिथे श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो.- वनक्षेत्रात झगडून शिकार मिळविण्यापेक्षा कचऱ्यातून अन्न शोधणाऱ्या श्वानांची शिकार करणे त्याला कमी त्रासाचे वाटते. ग्रामीण भागातही उघड्यावर बांधलेल्या शेळ्या आणि गायी म्हशींवर हल्ला होतो.

अशी आहे नुकसानभरपाई

बिबट्याला संवर्धन आणि संरक्षण दिल्यानंतर त्याच्या हल्ल्यात कोणी जखमी, अपंग किंवा मृत्यूमुखी पडले तरीही त्याला नुकसानभरपाई देण्याचे कायद्यात नमूद करण्यात आले आहे. या अंतर्गत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना १५ लाख रूपयांची भरपाई शासनाकडून तातडीने देण्यात येते. हल्ल्यात कायमस्वरूपी अपंग झालेल्यांना ५ लाख रूपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना १.२५ लाख रूपयांची मदत केली जाते. सातारा जिल्ह्यात गत महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही जिल्ह्यातील एकमेव घटना आहे.

त्यांचाही विचार व्हावा!

आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याची धमक मानवात आहे. मात्र, मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो. बऱ्याचदा याच काळात पिल्लांच्या अन्नासाठी बाहेर पडलेल्या मादी बिबट्यावर विषप्रयोग, त्यांची शिकार किंवा मग पिंजऱ्यातून अन्यत्र हलविले जाते. मादी बिबट्याशिवाय या पिल्लांना अन्नासाठीही तडफडत बसावे लागते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या