शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

काटामारी पारदर्शी कशी ?

By admin | Updated: March 16, 2015 23:38 IST

सदाभाऊ खोत : ‘सह्याद्री’च्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना जागा दाखवा

रहिमतपूर : ‘वजनकाटा, रिकव्हरी, मळी, बगॅस या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशात भ्रष्टाचार करणाऱ्या सह्याद्रीच्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना परिवर्तन घडवून त्यांची जागा दाखवून द्या,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. तर कारखान्यावर आलेल्या उसात काटामारी करणाऱ्यांचा कारभार पारदर्शक कसा? असा सवाल करीत कारखान्याच्या चुकीच्या वजनाच्या काही पावत्याच काँग्रेसचे धैर्यशिल कदम यांनी सादर केल्या. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे यशवंतराव चव्हाण शेतकरी सह्याद्री पॅनेलच्या सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानसिंगराव माने होते. सह्याद्री प्रतिष्ठानचे लालासाहेब यादव, कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमराव पाटील, एम. जी. थोरात, संपतराव इंगवले, वसंतराव जगदाळे, हिंदूराव चव्हाण, भीमराव घोरपडे, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, सुनील भोसले, अजित जगताप आदी उपस्थित होते.सदाभाऊ म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लुटारू कारखानदारीविरोधात लढा उभारल्यानेच ऊस उत्पादक सभासदांच्या घामाला योग्य दाम मिळू लागला आहे. सह्याद्रीत भ्रष्ट कारभाराच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी सहकार चळवळीची वाट लावली आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कृपेमुळे तुम्ही आहात. तुमचे कर्तृत्व काय असा सवालही त्यांनी केला.’ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका...धैर्यशिल कदम म्हणाले, ‘गेली ४० वर्षे सर्व सत्तास्थाने एकाच घरात दिसत आहेत. सह्याद्री कारखाना तर सत्ताधाऱ्यांनी राजकारणाचा अड्डा केला आहे. हे सर्व किती दिवस चालणार? म्हणून तर शेतकरी सभासदांच्या आग्रहास्तव आपण रिंंगणात उतरलो आहोत. मग कुठे आता सत्ताधाऱ्यांना कारखान्याचे दुसरे युनिट काढण्याचे शहाणपण सुचू लागले आहे. साखर संघाचे अध्यक्षपद भोगले, अनेक वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भोगत आहात. मग यापूर्वी दुसरे युनिट काढायला तुमचे हात कुणी बांधले होते का ? दुसरे युनिट काढण्यासाठी तांत्रिक अडचणी येतात त्याचं काय करणार हे जाहीर करा. उगाच शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका.