शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कसेही वाटप करा, मते फिरणार नाहीत

By admin | Updated: November 2, 2016 23:34 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : नेत्यांमुळे आघाडीत विघ्न

 सांगली : राष्ट्रवादीचे मतदार कधीच आमिषाला बळी पडणार नाहीत. त्यामुळे कारमधून वाटप करा किंवा हेलिकॉप्टरमधून करा, राष्ट्रवादीची मते फिरणार नाहीत, असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी कार्यालयातील बैठकीत व्यक्त केले. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधानपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त सांगलीत सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी आ. जयंत पाटील, आ. शशिकांत पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते. नाईक-निंबाळकर म्हणाले की, वाटपावर मते फिरतील, असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यांनी मतदारांना गाडीतून किंवा हेलिकॉप्टरमधून वाटप केले तरी राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. राज्यातील कॉँग्रेसची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न काही नेतेमंडळी करीत आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ या मतदारसंघात अधिक आहे. पक्षाचे सदस्य कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. जयंत पाटील म्हणाले की, आमचे सदस्य कॉँग्रेसविरोधात लढून निवडून आल्याने ते काँग्रेस नेत्यांकडे कधीच जाणार नाहीत. कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याचा प्रकार काँग्रेसकडून होत आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्यात कोणतीही अडचण नाही. सदस्य राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम आहेत. आ. शिंदे म्हणाले की, कॉँग्रेसने आघाडीच्या चर्चेवेळी हटवादी भूमिका घेतली. वास्तविक एका व्यक्तीच्या अहंपणामुळेच आघाडी होऊ शकली नाही. पक्ष संपला तरी चालेल, पण मित्रपक्षाला सहजासहजी काही मिळू द्यायचे नाही, अशा भावनेतून काँग्रेसचे हे लोक काम करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अशा नेत्यांची जागा राष्ट्रवादीचे मतदार दाखवून देतील. एकूण सहा विधानपरिषदेच्या जागांपैकी हक्काच्या पाच जागा राष्ट्रवादीच्या असताना कॉँग्रेसच्या नेत्यांनी तीन जागांसाठी हट्ट धरला. त्यामुळेच आघाडी झाली नाही. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, दिनकर चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, ताजुद्दीन तांबोळी, राहुल पवार, सागर घोडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) पाहुणचार : कोणाचाही घ्या... शशिकांत शिंदे म्हणाले की, मतदारांनी पाहुणचार कोणाचाही घ्यावा, मात्र पाहुणचार देताना शेखर गोरेंना द्यावा. जयंत पाटील यांनी ठरविले तर ते कोणाचाही ‘कार्यक्रम’ करू शकतात. त्यांनी तो करावा, पण त्यांनीही पाहुणचार गोरे यांच्याकडून घ्यावा. जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत धनशक्तीविरोधात लढा असल्याचे मत मांडले. कोणी कितीजणांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला, तरी राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.