शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाबळेश्वरमधील घरांना झड्या, प्लास्टिक आच्छादन-शेगडी, कपडे वाळविण्यासाठी कोळशाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:45 IST

महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होताच संरक्षणासाठी स्थानिकांकडून घरांना प्लास्टिक व झड्या लावण्याचे काम सुरू केले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

महाबळेश्वमध्ये दिवसाला ४८२ मिलिमीटर अर्थात १९ इंचांपर्यंत पाऊस पडतो. जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांमध्ये तर महाबळेश्वरमध्ये सूर्याचं दर्शनच होत नाही. आता या नगरीचे स्वरूप हंगामी राहिले नसून बारमाही झाले आहे. येथे येणारे पर्यटक आता पावसाळ्यामध्ये देखील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.

येथील हॉटेल व्यावसायिक हंगाम संपताच जून महिन्यामध्ये पावसाळी नियोजनास सुरुवात करतात. ते प्रथम झड्या व प्लास्टिक, शेगडीसाठी, कपडे सुखविण्यासाठी लागणारा कोळसा आदींची खरेदी स्थानिक करतात. कारण तीन-चार महिने धुवाँधार कोसळणाऱ्या पावसापासून घरांचे, इमारतींचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने घराच्या छतावर प्लास्टिक कागद तसेच संपूर्ण इमारती प्लास्टिकने बंद करण्याची कामे वेगाने सुरू असतात.

आर्द्रता, थंडी व पावसाळी विषाणू येण्यापासून प्रतिबंध करणे हा एकमेव झड्या लावण्याचा उद्देश असतो. पूर्वीपासून गवत व कारवीच्या काड्यांनी झड्या लावल्या जात होत्या. आधुनिकतेकडे जाताना बाजारात गवताच्या झड्यांना आता विविध रंगी प्लास्टिक कागदाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विविध रंग व आकाराचे प्लास्टिक कागद बाजारात उपलब्ध आहेत. या कागदाने संपूर्ण इमारत सहजपणे आच्छादू जाऊ लागल्याने प्लास्टिक कागदांच्या वापरात वाढ झाली आहे.इमारतीच्या छतांसाठी प्लास्टिक कागदाचा वापर वाढला आहे. प्लास्टिक कागदासोबतच पारंपरिक झड्यांचा वापर आजही सुरूच आहे.पावसाळ्यात नौकाविहार बंद..महाबळेश्वर व पाचगणीची जीवनवाहिनी असलेल्या व पर्यटकांच्या पसंतीचे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक पावसाळ्यामध्ये काहीच दिवसांत दुथडी भरून वाहते. त्यामुळे नगरपालिका नौकाविहार बंद ठेवते तर हे पाणी महाबळेश्वर, पाचगणी या मुख्य रस्त्यावर आल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्पदेखील होते.