शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महाबळेश्वरमधील घरांना झड्या, प्लास्टिक आच्छादन-शेगडी, कपडे वाळविण्यासाठी कोळशाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:45 IST

महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होताच संरक्षणासाठी स्थानिकांकडून घरांना प्लास्टिक व झड्या लावण्याचे काम सुरू केले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

महाबळेश्वमध्ये दिवसाला ४८२ मिलिमीटर अर्थात १९ इंचांपर्यंत पाऊस पडतो. जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांमध्ये तर महाबळेश्वरमध्ये सूर्याचं दर्शनच होत नाही. आता या नगरीचे स्वरूप हंगामी राहिले नसून बारमाही झाले आहे. येथे येणारे पर्यटक आता पावसाळ्यामध्ये देखील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.

येथील हॉटेल व्यावसायिक हंगाम संपताच जून महिन्यामध्ये पावसाळी नियोजनास सुरुवात करतात. ते प्रथम झड्या व प्लास्टिक, शेगडीसाठी, कपडे सुखविण्यासाठी लागणारा कोळसा आदींची खरेदी स्थानिक करतात. कारण तीन-चार महिने धुवाँधार कोसळणाऱ्या पावसापासून घरांचे, इमारतींचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने घराच्या छतावर प्लास्टिक कागद तसेच संपूर्ण इमारती प्लास्टिकने बंद करण्याची कामे वेगाने सुरू असतात.

आर्द्रता, थंडी व पावसाळी विषाणू येण्यापासून प्रतिबंध करणे हा एकमेव झड्या लावण्याचा उद्देश असतो. पूर्वीपासून गवत व कारवीच्या काड्यांनी झड्या लावल्या जात होत्या. आधुनिकतेकडे जाताना बाजारात गवताच्या झड्यांना आता विविध रंगी प्लास्टिक कागदाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विविध रंग व आकाराचे प्लास्टिक कागद बाजारात उपलब्ध आहेत. या कागदाने संपूर्ण इमारत सहजपणे आच्छादू जाऊ लागल्याने प्लास्टिक कागदांच्या वापरात वाढ झाली आहे.इमारतीच्या छतांसाठी प्लास्टिक कागदाचा वापर वाढला आहे. प्लास्टिक कागदासोबतच पारंपरिक झड्यांचा वापर आजही सुरूच आहे.पावसाळ्यात नौकाविहार बंद..महाबळेश्वर व पाचगणीची जीवनवाहिनी असलेल्या व पर्यटकांच्या पसंतीचे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक पावसाळ्यामध्ये काहीच दिवसांत दुथडी भरून वाहते. त्यामुळे नगरपालिका नौकाविहार बंद ठेवते तर हे पाणी महाबळेश्वर, पाचगणी या मुख्य रस्त्यावर आल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्पदेखील होते.