शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरीही थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या-मोठ्या हॉटेल्समधील ग्राहकांना चुलीवरच्या भाकरीने भुरळ घातली आहे. हॉटेल व्यवसायामध्ये भाकरीसह चुलीवरच्या जेवणाची क्रेझ ...

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या-मोठ्या हॉटेल्समधील ग्राहकांना चुलीवरच्या भाकरीने भुरळ घातली आहे. हॉटेल व्यवसायामध्ये भाकरीसह चुलीवरच्या जेवणाची क्रेझ वाढली असून त्यामुळे ग्रामीण व उपगनरातील महिलांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. मात्र, लॉकडाऊनच्या नियमामुळे हॉटेल बंद होत असल्याने या कामगार महिलांवर पुन्हा उपासमारीचे सावट येणार असल्याने महिलांची भाजी-भाकरीही आता थांबली आहे.

महामार्गावरील व उपनगर समजल्या जात असलेल्या शहराजवळच्या परिसरात नवनवीन हॉटेल्स सुरू आहेत. याठिकाणी गावरान किंवा घरगुती पद्धतीच्या जेवणासोबत विविध प्रकारच्या भाकरी बनविण्यासाठी महिलांच्या हाताला काम मिळत आहे. भाकरी बनविण्याचे घरगुती काम आता रोजगाराचे साधन बनल्यामुळे महिलांसाठी हे उपयोगी होते. या जेवणांना पसंती मिळत असल्यामुळे हॉटेलमध्ये आगाऊ नोंदणी केली, तरच ग्राहकांना जेवण उपलब्ध होत आहे. येथे खवय्यांना बनवून देण्याचे काम महिला करत होत्या.

पॉईंटर :

जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्या : १३८९

पोळी भाजी करणाऱ्या महिलांची संख्या : १२३२०

कोट :

१. हॉटेल व्यवसाय आधीच अडचणीत आला आहे. त्यात लॉकडाऊनच्या नियमांनी अधिक भर पडली आहे. महिन्याला चार हजार रुपये पगार देऊन भाकरी-चपाती करणाऱ्या महिलांना पगार देणंही अशक्य झालंय. त्यामुळे ऑर्डर आली की, कुटुंबातील महिला चपाती-भाकरी करून हॉटेलात पाठवतात.

– समीर थोरात, हॉटेल व्यावसायिक

२. गेली सात वर्षे मी ज्या हॉटेलात काम करत होते, त्यांनी आता काम बंद करायला सांगितलंय. हॉटेलात धंदा नाही आणि नुसतं थोड्या वेळाचं काम करून त्यांना मला पूर्ण पगार देणं शक्य नाही. मी सध्या घरीच आहे, अनेकांना सांगितलं घरकामाचीही चौकशी केली, पण कुठंही काम नाही.

- रेखा यादव, भाकरी करणाऱ्या

३. पूर्वी आमच्याकडे पोळी-भाकरी करण्यासह अन्य कामांसाठी तब्बल दहा महिला काम करत होत्या. आता मात्र अवघ्या दोघींनाच कामावर बोलवतो. उरलेल्या आठजणी मिळेल तिथे हंगामी रोजगार करून दोन वेळच्या अन्नाची सोय करतात. आमच्यासह त्यांच्यासाठी हा काळ कठीण आणि परीक्षेचा आहे.

- राजेंद्र घुले, हॉटेल व्यावसायिक.

चौकट :

वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक

मार्च २०२० पासून हाताला कामच मिळत नाही. कडक लॉकडाऊनच्या काळात हाताची सवय मोडायला नको म्हणून कम्युनिटी किचनमध्ये स्वयंसेवक म्हणून महिलांनी कामे केली. पुढं शिथिलता आल्यानंतर त्यांनी निम्म्याहून कमी पैशांवर काम सुरू करून पैसे कमाविण्याचा मार्ग अवलंबला, पण ग्राहकांची संख्या रोडावल्याने हॉटेलमालकांनी चपाती आणि भाकरीला तयार पराठ्याचाही मार्ग स्वीकारला. दिवाळीनंतर आत्ताशी कुठं सगळं जिथल्या तिथं होत नाही तोवर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं. आपल्या पगारात थोडीफार बचत आणि कर्ज काढून कुटुंबात एकेक वस्तू आणल्या खरं, पण आता त्या पुन्हा विकण्याची वेळ आल्याचं महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.