शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

अहवालाच्या पुढं घोडं सरकेना!

By admin | Updated: December 25, 2014 00:14 IST

अवकाळी नुकसान : निसर्गाचा कोप सुरुच

सातारा : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील कऱ्हाड, जावळी, फलटण, खंडाळा या तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी प्राथमिक अहवालाच्या पुढं पंचनाम्याचं घोडं सरकेना, अशी स्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासन दरबारी सादर झाला असला तरी अद्याप त्याचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाही.नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १३३ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. एकट्या फलटण तालुक्यात ३८.३७ हेक्टर क्षेत्रातील ऐंशी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले व जावळी तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांचे ६.९0 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद सध्या शासन दरबारी झाली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यातही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यापैकी ११ ते १५ डिसेंबर या कालावधीतील नुकसानीच्या पंचनाम्यांची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे तयार आहे. जिल्ह्यातील एकूण ३४ गावांतील १ हजार १३१ शेतकऱ्यांचे ४३५.६९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये खंडाळा, फलटण, कऱ्हाड तालुक्यांचा समावेश आहे.पिकांच्या नुकसानीसाठी १०.४६ लाखांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. सातारा जिल्ह्यातील १६ गावांमधील १३३ शेतकऱ्यांना शासनाकडून उपलब्ध झाल्यास या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. मात्र, अनुदानाबाबत शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)