शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

बटाट्यासह कांद्यावरही अस्मानी संकट

By admin | Updated: December 19, 2014 00:32 IST

शेतकरी हवालदिल : वातावरणातील बदलाचा परिणाम

खटाव : वातावरणात होत असलेल्या बदलामुळे खटावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बटाटा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ज्वारी, हरभरा, गहू आदींसह बटाटा पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.बटाट्याच्या रोपावर पडलेल्या रोगामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे आर्थिक संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.खटाव तालुक्यात तसेच परिसरात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात केले जाते. बटाट्याच्या पिकाला यावर्षी चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकरी आनंदीत होता. बटाटा लागवड करताना शेतकरीऱ्यांनी बियाण्यांसाठी क्विंटलला तीन हजार पाचशे रुपये दराने बियाणे खरेदी करून बटाट्याची लागण केली आहे. अचानक पडणारा पाऊस, कोंदट हवामान तसेच थंडी बरोबरच सकाळी पडणारे धुके या सर्वाचा परिणाम बटाट्याच्या रोपांवर झालेला दिसतो. बहुतांश बटाट्याचे प्लॉटमध्ये बटाट्याची रोपे जागेवरच बसलेली आहेत. तर त्याची पाने सुकून गेलेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी आता बटाटा पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीच्या लगबगीत आहे. बटाटा बरोबरच कांदा उत्पादक शेतकरीही कांद्यावर पडत असलेल्या टाका रोगामुळे चिंतातूर झाला आहे. कांद्याची लागवड करताना शेतकरी तीन हजार रुपयांप्रमाणे बियाणे विकत घेऊन कांद्याची लागण केली; परंतु हवेतील होणारा बदल तसेच सकाळी पडणारे धुके यामुळे कांद्याच्या पातीवर टाका रोगाच्या प्रादूर्भावाने कांद्याची पात जागेवरच मुरगळून जात आहे. नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कांदा व बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक या हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे धोक्यात आली आहे. शेतकऱ्याला रोगापासून आपली पिके वाचविण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत आहे. या अस्मानी संकटामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानात असाच जर बदल होत राहिला तर गहू, हरभरा या पिकांवरही रोग पडण्याची भीती लागली आहे. (वार्ताहर) पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीकधी थंडी, कधी कडाक्याचे ऊन या बदलत्या हवामानामुळे या पिकावर रोग पडू लागला आहे. करपा व तुडतुडे रोगामुळे रोपांची वाढ झाली नाही, तसेच बटाट्याचीही वाढ झाली नाही. त्यामुळे तीस क्विंटल बटाट्याची लागण करूनही हाती अवघ्या तीस पोतींवर समाधान मानावे लागणार आहे. बटाट्याचे पीक वाचविण्यासाठी पाच-पाच वेळा औषधफवारणी करूनही बटाट्याच्या रोपावरील कीड नष्ट झाली नाही.बटाटा पिकातून उत्पन्न चांगले मिळते, हे जरी खरेअसले तरी बटाटा बी खरेदीपासून त्याची लागवड करून त्यात लागणारी मेहनत आदीसह एका एकराला चाळीस हजारांपर्यंत खर्च होतो. त्यामुळे हे पीक घेताना जेवढे कष्ट आहेत, त्यातच हा असा अचानक पडणारा रोगामुळे आम्हा शेतकरीऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. - किशोर डंगारे, शेतकरी