शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्यासह कांद्यावरही अस्मानी संकट

By admin | Updated: December 19, 2014 00:32 IST

शेतकरी हवालदिल : वातावरणातील बदलाचा परिणाम

खटाव : वातावरणात होत असलेल्या बदलामुळे खटावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बटाटा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ज्वारी, हरभरा, गहू आदींसह बटाटा पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.बटाट्याच्या रोपावर पडलेल्या रोगामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे आर्थिक संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.खटाव तालुक्यात तसेच परिसरात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात केले जाते. बटाट्याच्या पिकाला यावर्षी चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकरी आनंदीत होता. बटाटा लागवड करताना शेतकरीऱ्यांनी बियाण्यांसाठी क्विंटलला तीन हजार पाचशे रुपये दराने बियाणे खरेदी करून बटाट्याची लागण केली आहे. अचानक पडणारा पाऊस, कोंदट हवामान तसेच थंडी बरोबरच सकाळी पडणारे धुके या सर्वाचा परिणाम बटाट्याच्या रोपांवर झालेला दिसतो. बहुतांश बटाट्याचे प्लॉटमध्ये बटाट्याची रोपे जागेवरच बसलेली आहेत. तर त्याची पाने सुकून गेलेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी आता बटाटा पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीच्या लगबगीत आहे. बटाटा बरोबरच कांदा उत्पादक शेतकरीही कांद्यावर पडत असलेल्या टाका रोगामुळे चिंतातूर झाला आहे. कांद्याची लागवड करताना शेतकरी तीन हजार रुपयांप्रमाणे बियाणे विकत घेऊन कांद्याची लागण केली; परंतु हवेतील होणारा बदल तसेच सकाळी पडणारे धुके यामुळे कांद्याच्या पातीवर टाका रोगाच्या प्रादूर्भावाने कांद्याची पात जागेवरच मुरगळून जात आहे. नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कांदा व बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक या हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे धोक्यात आली आहे. शेतकऱ्याला रोगापासून आपली पिके वाचविण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत आहे. या अस्मानी संकटामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानात असाच जर बदल होत राहिला तर गहू, हरभरा या पिकांवरही रोग पडण्याची भीती लागली आहे. (वार्ताहर) पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीकधी थंडी, कधी कडाक्याचे ऊन या बदलत्या हवामानामुळे या पिकावर रोग पडू लागला आहे. करपा व तुडतुडे रोगामुळे रोपांची वाढ झाली नाही, तसेच बटाट्याचीही वाढ झाली नाही. त्यामुळे तीस क्विंटल बटाट्याची लागण करूनही हाती अवघ्या तीस पोतींवर समाधान मानावे लागणार आहे. बटाट्याचे पीक वाचविण्यासाठी पाच-पाच वेळा औषधफवारणी करूनही बटाट्याच्या रोपावरील कीड नष्ट झाली नाही.बटाटा पिकातून उत्पन्न चांगले मिळते, हे जरी खरेअसले तरी बटाटा बी खरेदीपासून त्याची लागवड करून त्यात लागणारी मेहनत आदीसह एका एकराला चाळीस हजारांपर्यंत खर्च होतो. त्यामुळे हे पीक घेताना जेवढे कष्ट आहेत, त्यातच हा असा अचानक पडणारा रोगामुळे आम्हा शेतकरीऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. - किशोर डंगारे, शेतकरी