शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्यासह कांद्यावरही अस्मानी संकट

By admin | Updated: December 19, 2014 00:32 IST

शेतकरी हवालदिल : वातावरणातील बदलाचा परिणाम

खटाव : वातावरणात होत असलेल्या बदलामुळे खटावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बटाटा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ज्वारी, हरभरा, गहू आदींसह बटाटा पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.बटाट्याच्या रोपावर पडलेल्या रोगामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे आर्थिक संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.खटाव तालुक्यात तसेच परिसरात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात केले जाते. बटाट्याच्या पिकाला यावर्षी चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकरी आनंदीत होता. बटाटा लागवड करताना शेतकरीऱ्यांनी बियाण्यांसाठी क्विंटलला तीन हजार पाचशे रुपये दराने बियाणे खरेदी करून बटाट्याची लागण केली आहे. अचानक पडणारा पाऊस, कोंदट हवामान तसेच थंडी बरोबरच सकाळी पडणारे धुके या सर्वाचा परिणाम बटाट्याच्या रोपांवर झालेला दिसतो. बहुतांश बटाट्याचे प्लॉटमध्ये बटाट्याची रोपे जागेवरच बसलेली आहेत. तर त्याची पाने सुकून गेलेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी आता बटाटा पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीच्या लगबगीत आहे. बटाटा बरोबरच कांदा उत्पादक शेतकरीही कांद्यावर पडत असलेल्या टाका रोगामुळे चिंतातूर झाला आहे. कांद्याची लागवड करताना शेतकरी तीन हजार रुपयांप्रमाणे बियाणे विकत घेऊन कांद्याची लागण केली; परंतु हवेतील होणारा बदल तसेच सकाळी पडणारे धुके यामुळे कांद्याच्या पातीवर टाका रोगाच्या प्रादूर्भावाने कांद्याची पात जागेवरच मुरगळून जात आहे. नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कांदा व बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक या हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमुळे धोक्यात आली आहे. शेतकऱ्याला रोगापासून आपली पिके वाचविण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत आहे. या अस्मानी संकटामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानात असाच जर बदल होत राहिला तर गहू, हरभरा या पिकांवरही रोग पडण्याची भीती लागली आहे. (वार्ताहर) पीक वाचविण्यासाठी औषधफवारणीकधी थंडी, कधी कडाक्याचे ऊन या बदलत्या हवामानामुळे या पिकावर रोग पडू लागला आहे. करपा व तुडतुडे रोगामुळे रोपांची वाढ झाली नाही, तसेच बटाट्याचीही वाढ झाली नाही. त्यामुळे तीस क्विंटल बटाट्याची लागण करूनही हाती अवघ्या तीस पोतींवर समाधान मानावे लागणार आहे. बटाट्याचे पीक वाचविण्यासाठी पाच-पाच वेळा औषधफवारणी करूनही बटाट्याच्या रोपावरील कीड नष्ट झाली नाही.बटाटा पिकातून उत्पन्न चांगले मिळते, हे जरी खरेअसले तरी बटाटा बी खरेदीपासून त्याची लागवड करून त्यात लागणारी मेहनत आदीसह एका एकराला चाळीस हजारांपर्यंत खर्च होतो. त्यामुळे हे पीक घेताना जेवढे कष्ट आहेत, त्यातच हा असा अचानक पडणारा रोगामुळे आम्हा शेतकरीऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. - किशोर डंगारे, शेतकरी