शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

सिद्धनाथवाडीत घरटी डेंग्यूचा रुग्ण

By admin | Updated: September 21, 2016 00:00 IST

साथीचे थैमान : उपचार करण्यासही दवाखान्यांमध्ये पुरेना जागा; पालिकेने तातडीने उपाय करण्याची मागणी

वाई : शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. सिद्धनाथवाडीसह संपूर्ण शहरात प्रत्येक घरात डेंग्यूचे रुग्ण आहेत. सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यात रुग्णांना उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नाही. शहरातील सर्वच दवाखाने तुडुंब भरलेले आहेत. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, कचऱ्यातून मोकाट जनावरे बिनधास्त वावरताना दिसतायत. हे चित्र ‘स्वच्छ वाई, सुंदर वाई’त पाहावयास मिळते, ही गंभीर बाब आहे. आरोग्य विभाग यााबाबत अनभिज्ञ आहे. या विभागाकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. सरकारी दवाखान्यात लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. रुग्णांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. शासकीय दवाखान्यात डॉक्टरांची कमी असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. आरोग्य विभागाने त्वरित यावर उपाय करून साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी जोर धरत आहे. सिद्धनाथवाडीत गेल्या महिन्यापासून डेंग्यू साथीने थैमान घातले आहे. वाईचे माजी नगराध्यक्षही यातून सुटलेले नाहीत. नगरपालिका सध्या फक्त शोपीस बनली आहे. नगराध्यक्ष, नगरसेवकांना लोकांचे काहीही देणे-घेणे नाही. शहराच्या प्रत्येक प्रभागात अतिशय दयनीय अवस्था आहे. शहरातील गटारांची स्वच्छता वेळेवर होत नाही. त्यात कसल्याही पद्धतीची औषध फवारणी केली जात नाही. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे. शहरातील घन कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. उचललेला कचरा टाकावयाचा कुठे हा प्रश्न पालिका कर्मचाऱ्यांना पडला आहे. गणेश विसर्जनानंतर दोन दिवस कचरा उचलला नाही. वाहन नादुरुस्त व कचरा टाकण्यास जागाच नाही, असे कारण सांगितले जात होते. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत होत असल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)चिकनगुनियाही काढतोय डोके वरवाई तालुक्यात एक ते दोन महिन्यांपासून चिकनगुनिया व डेंग्यूचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य विभागातील डॉ. अजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘बाह्यरुग्ण कक्षेत डेंग्यूचे सहा ते आठ रुग्ण असतील तर चिकनगुनियासदृश्य तीस ते चाळीस रुग्ण आहेत. चारशे ते साडेचारशे रुग्ण आहेत. यामध्ये मुंबई-पुणेचे पन्नास टक्के रुग्ण आहेत. चिकनगुनियाची लक्षणेगंगापुरीत चिकनगुनिया साथीची लागण सुरू झाली असून आता धर्मपुरी, सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी अशा बऱ्याच भागांमध्ये याची लागण झालेली आहे. यामध्ये रुग्णाला ताप येणे, पूर्ण अंग दुखणे, गुडघे दुखी, जॉइंट दुखणे, अंगावर लालसर पुरळ उटणे, पायांना सूज येणे ही लक्षणे आढळतात. अस्वच्छ पाण्याच्या साठ्यामुळे जंतूपासून डास तयार होतो.डेंग्यूची लक्षणेडेंग्यूच्या रुग्णामध्ये अंगदुखी, ताप येणे, सलग तीन दिवस ताप येतो, डोके दुखणे, उलट्या, अपचन अशी लक्षणे दिसतात. यासाठी वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे. त्याबरोबर डाळिंब, पपईच्या पानाचा रस, किवी या फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. जास्त दिवस ठेवलेल्या स्वच्छ पाण्याच्या साठ्यामुळे डेंग्यू होतो.