शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धनाथवाडीत घरटी डेंग्यूचा रुग्ण

By admin | Updated: September 21, 2016 00:00 IST

साथीचे थैमान : उपचार करण्यासही दवाखान्यांमध्ये पुरेना जागा; पालिकेने तातडीने उपाय करण्याची मागणी

वाई : शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. सिद्धनाथवाडीसह संपूर्ण शहरात प्रत्येक घरात डेंग्यूचे रुग्ण आहेत. सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यात रुग्णांना उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नाही. शहरातील सर्वच दवाखाने तुडुंब भरलेले आहेत. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, कचऱ्यातून मोकाट जनावरे बिनधास्त वावरताना दिसतायत. हे चित्र ‘स्वच्छ वाई, सुंदर वाई’त पाहावयास मिळते, ही गंभीर बाब आहे. आरोग्य विभाग यााबाबत अनभिज्ञ आहे. या विभागाकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. सरकारी दवाखान्यात लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. रुग्णांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. शासकीय दवाखान्यात डॉक्टरांची कमी असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. आरोग्य विभागाने त्वरित यावर उपाय करून साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी जोर धरत आहे. सिद्धनाथवाडीत गेल्या महिन्यापासून डेंग्यू साथीने थैमान घातले आहे. वाईचे माजी नगराध्यक्षही यातून सुटलेले नाहीत. नगरपालिका सध्या फक्त शोपीस बनली आहे. नगराध्यक्ष, नगरसेवकांना लोकांचे काहीही देणे-घेणे नाही. शहराच्या प्रत्येक प्रभागात अतिशय दयनीय अवस्था आहे. शहरातील गटारांची स्वच्छता वेळेवर होत नाही. त्यात कसल्याही पद्धतीची औषध फवारणी केली जात नाही. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे. शहरातील घन कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. उचललेला कचरा टाकावयाचा कुठे हा प्रश्न पालिका कर्मचाऱ्यांना पडला आहे. गणेश विसर्जनानंतर दोन दिवस कचरा उचलला नाही. वाहन नादुरुस्त व कचरा टाकण्यास जागाच नाही, असे कारण सांगितले जात होते. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत होत असल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)चिकनगुनियाही काढतोय डोके वरवाई तालुक्यात एक ते दोन महिन्यांपासून चिकनगुनिया व डेंग्यूचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य विभागातील डॉ. अजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘बाह्यरुग्ण कक्षेत डेंग्यूचे सहा ते आठ रुग्ण असतील तर चिकनगुनियासदृश्य तीस ते चाळीस रुग्ण आहेत. चारशे ते साडेचारशे रुग्ण आहेत. यामध्ये मुंबई-पुणेचे पन्नास टक्के रुग्ण आहेत. चिकनगुनियाची लक्षणेगंगापुरीत चिकनगुनिया साथीची लागण सुरू झाली असून आता धर्मपुरी, सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी अशा बऱ्याच भागांमध्ये याची लागण झालेली आहे. यामध्ये रुग्णाला ताप येणे, पूर्ण अंग दुखणे, गुडघे दुखी, जॉइंट दुखणे, अंगावर लालसर पुरळ उटणे, पायांना सूज येणे ही लक्षणे आढळतात. अस्वच्छ पाण्याच्या साठ्यामुळे जंतूपासून डास तयार होतो.डेंग्यूची लक्षणेडेंग्यूच्या रुग्णामध्ये अंगदुखी, ताप येणे, सलग तीन दिवस ताप येतो, डोके दुखणे, उलट्या, अपचन अशी लक्षणे दिसतात. यासाठी वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे. त्याबरोबर डाळिंब, पपईच्या पानाचा रस, किवी या फळांचे सेवन करणे गरजेचे आहे. जास्त दिवस ठेवलेल्या स्वच्छ पाण्याच्या साठ्यामुळे डेंग्यू होतो.