शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

बाधित रुग्णांकडून ‘होम क्वारंटाइन’ला पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST

सातारा : जिल्ह्यात कोरानाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर, घराघरात अख्खं कुटुंब पाझिटिव्ह येऊ लागले आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती ...

सातारा : जिल्ह्यात कोरानाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर, घराघरात अख्खं कुटुंब पाझिटिव्ह येऊ लागले आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती झाली असून, अनेक जण रुग्णालयात जाण्याऐवजी होम क्वारंटाइन होणे पसंत करत आहेत. मात्र, या रुग्णांवर कोणाचेही लक्ष नसून, ना रुग्णावर उपचार केले जात आहेत, ना प्रशासनाचा ताळमेळ बसत. अशी सारीच भयावह स्थिती आहे. अनेक बाधित रुग्णांकडून यंदा होम क्वारंटाइनला पसंती मिळत असल्याने, उपचाराचा हा वेगळा ट्रेंड सुरू झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. कोविड जम्बो रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खावलीमधील कोरोना सेंटर आता हाऊस फुल्ल होऊ लागली आहेत. गतवर्षीचा अनुभव अनेकांच्या पाठीशी असल्यामुळे या वर्षी अनेक जण होम क्वारंटाइन होणे पसंत करत आहेत. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशा रुग्णांना हाॅस्पिटलची गरज भासत आहे, परंतु ज्यांना साैम्य लक्षणे आहेत, असे रुग्ण स्वत:हून होम क्वारंटाइन होत आहेत, परंतु प्रशासनाकडून या रुग्णांची कसलीही दखल घेतली जात नाही. केवळ पाॅझिटिव्ह मेसेज दिल्यानंतर प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही कोरोना बाधितांच्या नातेवाइकांमधून केला जात आहे. या रुग्णांना सौम्य लक्षणे असली, तरी त्यांना औषधोपचाराची खरी गरज आहे. वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा हातात वेळ आहे. तोपर्यंत तरी प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. होम क्वारंटाइन असलेल्या बाधित रुग्णांची मानसिक स्थिती बिघडली आहे. अनेक जण चिंतातुर झाले आहेत. एकीकडे रुग्णालयात बेड शिल्लक नसताना दुसरीकडे आपणहून लोक होम क्वारंटाइन होत असतील, तर त्यांच्या मदतीला प्रशासनाने धावले पाहिजे. गत वर्षीसारख्या यंदा प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

चाैकट : बांबू गेले...कंटेन्मेंट झोनही नाही!

शहरात गत वर्षी गल्लोगल्ली बांबूने रस्ते अडवले गेले होते, तर ज्या इमारतीमध्ये बाधित रुग्ण आढळून येईल, तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जात होता, परंतु यंदा याउलट परिस्थिती आहे. गतवर्षीपेक्षा यंदा कोरोनाचा रुग्णवाढीचा वेग प्रचंड आहे. असे असतानाही प्रशासनाकडून गतवर्षीसारख्या कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. सर्व काही नागरिकांवरच सोपविले गेले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत आहेत.