शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

अत्याचाराची मालिका सुरू असताना गृहमंत्र्यांचे तोंड बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

सातारा : ‘महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. महिला, युवती, तरुणी, बालिकांवर अत्याचार नाहीत, असा एकही दिवस नाही. दररोज ...

सातारा : ‘महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. महिला, युवती, तरुणी, बालिकांवर अत्याचार नाहीत, असा एकही दिवस नाही. दररोज अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि दोन्ही गृहराज्यमंत्री शांत आहेत. त्यांना तोंड उघडायला वेळ नाही. सातारा जिल्ह्यात तर महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरू आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई तुमच्याच जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. महिलांवर अत्याचार होत असतानाही तुम्ही तोंड उघडत नाही. तुम्हाला तर गृहमंत्रिपदाचाच विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ या शनिवारी सातारा जिल्ह्यात आल्या होत्या. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

चित्रा वाघ म्हणाल्या, महाबळेश्वर येथे घडलेला सामूहिक अत्याचाराचा प्रकार गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातील फक्त दोनच नावे घेतली. यात नंतर नावे वाढली मात्र, ही नावे सुरुवातीलाच का घेतली नाहीत. यामध्ये एकूण १३ आरोपी असून त्यापैकी एक वकील आहे. हे दोघेही फरार आहेत. ज्यावेळी सुरुवातीला दोघांना अटक झाली त्यावेळी वकील असणारा पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मग त्यांची नावे पोलिसांनी एफआयआरमध्ये का घेतली नाहीत. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होतो आणि तिचे मूल दत्तक दिले जाते. यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आणि हे प्रकरण लपवले ते सर्व आरोपीच आहेत. येथे पूजा करताना जंगम आणि वकिलांना कोणी बोलावले? त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचे कॉल रेकॉर्डही चेक झाले पाहिजेत. बावळेकरांचा एक मुलगा वकील आहे, तो त्याच दिवशी पोलीस ठाण्यात हजर होता. मग त्याला अटक का केली नाही? वकील आणि पूजाअर्चा करणारा या दोघांना अटक करण्यापूर्वी ते दोघे सरकारी वकिलाकडे गेले होते. ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेत फोन केले आहेत, त्या सर्वांना सहआरोपी करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातील सरकार मुर्दाड आहे. त्यांच्या नाकात आता वेसण घालणे आवश्यक आहे. राज्यात विकृतीचे मनोबल वाढत आहे. तुम्हाला जर आमचे अश्रू खोटे वाटत असतील तर तसे सांगून टाका. आमदार नीलेश लंके महिला अधिकाऱ्यांना वाटेल तसे बोलतात. त्यांना असा अधिकार कोणी दिला?