शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराची मालिका सुरू असताना गृहमंत्र्यांचे तोंड बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

सातारा : ‘महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. महिला, युवती, तरुणी, बालिकांवर अत्याचार नाहीत, असा एकही दिवस नाही. दररोज ...

सातारा : ‘महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. महिला, युवती, तरुणी, बालिकांवर अत्याचार नाहीत, असा एकही दिवस नाही. दररोज अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि दोन्ही गृहराज्यमंत्री शांत आहेत. त्यांना तोंड उघडायला वेळ नाही. सातारा जिल्ह्यात तर महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरू आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई तुमच्याच जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. महिलांवर अत्याचार होत असतानाही तुम्ही तोंड उघडत नाही. तुम्हाला तर गृहमंत्रिपदाचाच विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ या शनिवारी सातारा जिल्ह्यात आल्या होत्या. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

चित्रा वाघ म्हणाल्या, महाबळेश्वर येथे घडलेला सामूहिक अत्याचाराचा प्रकार गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातील फक्त दोनच नावे घेतली. यात नंतर नावे वाढली मात्र, ही नावे सुरुवातीलाच का घेतली नाहीत. यामध्ये एकूण १३ आरोपी असून त्यापैकी एक वकील आहे. हे दोघेही फरार आहेत. ज्यावेळी सुरुवातीला दोघांना अटक झाली त्यावेळी वकील असणारा पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मग त्यांची नावे पोलिसांनी एफआयआरमध्ये का घेतली नाहीत. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होतो आणि तिचे मूल दत्तक दिले जाते. यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आणि हे प्रकरण लपवले ते सर्व आरोपीच आहेत. येथे पूजा करताना जंगम आणि वकिलांना कोणी बोलावले? त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचे कॉल रेकॉर्डही चेक झाले पाहिजेत. बावळेकरांचा एक मुलगा वकील आहे, तो त्याच दिवशी पोलीस ठाण्यात हजर होता. मग त्याला अटक का केली नाही? वकील आणि पूजाअर्चा करणारा या दोघांना अटक करण्यापूर्वी ते दोघे सरकारी वकिलाकडे गेले होते. ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेत फोन केले आहेत, त्या सर्वांना सहआरोपी करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातील सरकार मुर्दाड आहे. त्यांच्या नाकात आता वेसण घालणे आवश्यक आहे. राज्यात विकृतीचे मनोबल वाढत आहे. तुम्हाला जर आमचे अश्रू खोटे वाटत असतील तर तसे सांगून टाका. आमदार नीलेश लंके महिला अधिकाऱ्यांना वाटेल तसे बोलतात. त्यांना असा अधिकार कोणी दिला?