शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अत्याचाराची मालिका सुरू असताना गृहमंत्र्यांचे तोंड बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

सातारा : ‘महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. महिला, युवती, तरुणी, बालिकांवर अत्याचार नाहीत, असा एकही दिवस नाही. दररोज ...

सातारा : ‘महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. महिला, युवती, तरुणी, बालिकांवर अत्याचार नाहीत, असा एकही दिवस नाही. दररोज अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि दोन्ही गृहराज्यमंत्री शांत आहेत. त्यांना तोंड उघडायला वेळ नाही. सातारा जिल्ह्यात तर महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरू आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई तुमच्याच जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. महिलांवर अत्याचार होत असतानाही तुम्ही तोंड उघडत नाही. तुम्हाला तर गृहमंत्रिपदाचाच विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ या शनिवारी सातारा जिल्ह्यात आल्या होत्या. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

चित्रा वाघ म्हणाल्या, महाबळेश्वर येथे घडलेला सामूहिक अत्याचाराचा प्रकार गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातील फक्त दोनच नावे घेतली. यात नंतर नावे वाढली मात्र, ही नावे सुरुवातीलाच का घेतली नाहीत. यामध्ये एकूण १३ आरोपी असून त्यापैकी एक वकील आहे. हे दोघेही फरार आहेत. ज्यावेळी सुरुवातीला दोघांना अटक झाली त्यावेळी वकील असणारा पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मग त्यांची नावे पोलिसांनी एफआयआरमध्ये का घेतली नाहीत. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होतो आणि तिचे मूल दत्तक दिले जाते. यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आणि हे प्रकरण लपवले ते सर्व आरोपीच आहेत. येथे पूजा करताना जंगम आणि वकिलांना कोणी बोलावले? त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचे कॉल रेकॉर्डही चेक झाले पाहिजेत. बावळेकरांचा एक मुलगा वकील आहे, तो त्याच दिवशी पोलीस ठाण्यात हजर होता. मग त्याला अटक का केली नाही? वकील आणि पूजाअर्चा करणारा या दोघांना अटक करण्यापूर्वी ते दोघे सरकारी वकिलाकडे गेले होते. ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेत फोन केले आहेत, त्या सर्वांना सहआरोपी करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातील सरकार मुर्दाड आहे. त्यांच्या नाकात आता वेसण घालणे आवश्यक आहे. राज्यात विकृतीचे मनोबल वाढत आहे. तुम्हाला जर आमचे अश्रू खोटे वाटत असतील तर तसे सांगून टाका. आमदार नीलेश लंके महिला अधिकाऱ्यांना वाटेल तसे बोलतात. त्यांना असा अधिकार कोणी दिला?