शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचा दिवस कृष्णेच्या स्वच्छतेसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:42 IST

वाई : तालुक्याची भाग्यरेषा असणाऱ्या कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सेवाकार्य ...

वाई : तालुक्याची भाग्यरेषा असणाऱ्या कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सेवाकार्य समिती पुढे आली असून, सुटीच्या दिवशी दर रविवारी सकाळी तीन तास कृष्णा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.कृष्णा नदीच्या स्वच्छतेत पालिका प्रशासनाबरोबर वाईकरांचा मोठा सहभाग असणे आवश्यक असताना कसलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वाईकरांनी स्वत:हून पुढे येऊन स्वच्छता मोहीम हाती घेतलीय. यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश आहे. कृष्णा नदी सेवाकार्य समितीचे मोजकेच कार्यकर्ते नदीच्या स्वच्छतेसाठी झटत असल्याचे पाहून अनेक वाईकर या मोहिमेत उत्स्फूर्त सहभागी झाले आहेत. त्यामुळे नदीच्या घाटावरील स्वच्छता होण्यास वेळ लागत नाही.दर रविवारी एकाच वेळी वाई शहर परिसरातील सर्वच घाट साफ करता येत नाहीत, त्यामुळे दर रविवारी एका घाटाची स्वच्छता हाती घेण्यात येत आहे.आतापर्यंत कित्येक ट्रॉल्या कचरा नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. भीमकुंड आळीतील बदामी तळ्यासाठी सेवाकार्य समितीचे सदस्य गेले दोन महिने त्या ठिकाणी काम करीत आहेत. गंगापुरी घाटापासून भद्रेश्वर मंदिरापर्यंत नदीपात्रात अनेक ऐतिहासिक कुंड दगडात कोरलेले आहेत. ते सर्व स्वच्छता मोहिमेमुळे वाईकरांना समजले आहेत. ते कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्यासाठी वाईकरांसह प्रशासनाचा सहभाग महत्त्वाचा आहे. पालिका प्रशासनाने नदीच्या स्वच्छतेविषयी ठोस भूमिका न घेतल्याने ऐतिहासिक, सांस्कृतिक वाई शहराची शान असणाºया कृष्णा नदीला स्वच्छ ठेवताना वाईकरांची दमछाक होत आहे.नदीत सोडले जाणाºया सांडपाण्याची व्यवस्था कायमस्वरुपी करण्यासाठीचे काम चालू झाले आहे. तरीही काही विघ्नसंतोषी लोकांकडून त्याला खीळ घालण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.महाबळेश्वरला उगम पावणाºया कृष्णा नदीवर लाखो लोकांची तहान भागविणारे मोठे प्रकल्प आहेत. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या धोम व बलकवडी धरणामुळे वाई, खंडाळा, फलटण, कोरेगावसह सांगली पर्यंतची शेती निव्वळ या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आलेली आहे. इतर तालुक्यातील लोकांचे संसार उभे करताना मात्र कृष्णामाईला त्याची किंमत मोजावी लागत आहे. तिच्यामुळे शेतीमध्ये जलक्रांती होऊन चार ते पाच तालुक्यांतील लोकांचे जीवनमान उंचावले आहे. धोमपासून कºहाडपर्यंत कृष्णा नदीपात्राच्या शेजारील वस्तीतून, शहरातून या गावातून येणारे सांडपाणी सरळ कृष्णा नदीत सोडण्यात येत असल्याने पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येऊन काठावरच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सेवाकार्य समिती कृष्णा स्वच्छतेसाठी पुरी पडू शकत नाही, यासाठी वाईकरांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. वाई शहरातील सेवाकार्य समितीसारख्या काही ठराविक संस्था जलपर्णी बिमोडासाठी उतरल्या असून, त्यांना काही प्रमाणात यश आले आहे.पालिका कशाची वाट पाहतंय?पालिका प्रशासन कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी ठोस भूमिका घेण्यासाठी कशाची वाट पाहतंय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सध्या तरी सेवाकार्य समितीची धडपड पाहून अनेकजण या कृष्णानदी स्वच्छता मोहिमेत उतरत आहेत.परंतु पालिकेकडून अद्याप कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. आठवड्यातून एकदा मिळणारी सुटीही वाईतील नागरिक नदी स्वच्छ करण्यासाठी घालवत आहेत. हे पालिकेला कस समजणार?