शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबास मारहाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.गीतांजली वारागडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भुर्इंज येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेमध्ये पोपट शेवते यांनी भुर्इंज येथील महालक्ष्मी मंदिरासाठी आणलेली वाळू माझे पती जितेंद्र वारागडे यांनी दुसरीकडे नेली असल्याचा आरोप केला. त्यावेळी माझ्या पतीने ही वाळू देवस्थान कमिटीच्या म्हणण्याप्रमाणे मंदिरासाठीच वापरलेली होती, असे सांगितले होते. हे मला माझ्या पतींनी घरी आल्यावर सांगितले. दि. १६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घरात जेवण करीत असताना तीन व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आले. त्यापैकी एकाने, ‘जितेंद्र वारागडे कुठे आहे, त्याला जिवंत ठेवत नाही.’ त्यावेळी मी त्यांना ‘घरात नाहीत,’ असे म्हटल्यावर त्यांनी माझ्याकडे माझ्या पतीचा मोबाईल नंबर मागितला. तो मी त्यांना दिला नाही. त्यावर त्या तिघांनी मला तसेच माझ्या सासू-सासरे व पतीला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच आम्हाला ‘सुधीर भोसले यांनी पाठविले आहे व तुमच्या पतीने मंदिरासाठी टाकलेली वाळू चोरली आहे,’ असे आरोप करीत शिवीगाळ केली. त्यानंतर माझ्या सासºयांना घरासमोरील ओट्यावर ओढत नेऊन त्या तिघांंनी सासू-सासरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली म्हणून मी माझ्या पतीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले. माझे पती व त्यांच्यासोबत संजय काळे असे तिथे आले व भांडणे सोडवायला लागले. त्यावेळी त्या तीन व्यक्तींनी काठीने माझ्या पतीच्या उजव्या हातावर व सासूच्या, संजय काळे आणि राजेंद्र वारागडे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारहाण केली. त्या तिघांपैकी एक व्यक्ती अंधारातून पळून गेला तर इतर दोघांना जमलेल्या लोकांनी थांबवून ठेवले. त्यावेळी त्या दोघांची नावे वैभव गजानन शेवते (वय २७), सचिन कांता शेवते (२८, दोघे रा. भुर्इंज) व पळून गेलेल्या व्यक्तीचे निम्या ऊर्फ निमेष बाजीराव जाधव, (रा. भुर्इंज) असे असल्याचे समजले. हे तिघेही दुचाकीवरून आले होते.काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच मारहाणीचा आरोपवैभव गजानन शेवते (वय २७, रा. भुर्इंज) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामसभेत झालेल्या वाळू चर्चेवरुन अजित वारागडे यांनी ‘आमच्या नदीकाठच्या क्षेत्रातून महालक्ष्मी मंदिरासाठी काढलेल्या वाळूपैकी इतर काही वाळू दुसरीकडे विकल्याबाबत’ जितेंद्र वारागडे यास विचारण्यास गेले असता तिथून मोटारसायकलवरून परत येत असताना जितेंद्र वारागडे याने आम्हाला मोटार सायकलवरून खाली पाडून मारहाण केली. तसेच जितेंद्र वारागडेसोबत त्याच्या घराशेजारील सात ते आठ जणांनीही तिघांना मारहाण केली. यामध्ये सचिन शेवते, निमेश जाधव जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली आहे.