शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबास मारहाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.गीतांजली वारागडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भुर्इंज येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेमध्ये पोपट शेवते यांनी भुर्इंज येथील महालक्ष्मी मंदिरासाठी आणलेली वाळू माझे पती जितेंद्र वारागडे यांनी दुसरीकडे नेली असल्याचा आरोप केला. त्यावेळी माझ्या पतीने ही वाळू देवस्थान कमिटीच्या म्हणण्याप्रमाणे मंदिरासाठीच वापरलेली होती, असे सांगितले होते. हे मला माझ्या पतींनी घरी आल्यावर सांगितले. दि. १६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घरात जेवण करीत असताना तीन व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आले. त्यापैकी एकाने, ‘जितेंद्र वारागडे कुठे आहे, त्याला जिवंत ठेवत नाही.’ त्यावेळी मी त्यांना ‘घरात नाहीत,’ असे म्हटल्यावर त्यांनी माझ्याकडे माझ्या पतीचा मोबाईल नंबर मागितला. तो मी त्यांना दिला नाही. त्यावर त्या तिघांनी मला तसेच माझ्या सासू-सासरे व पतीला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच आम्हाला ‘सुधीर भोसले यांनी पाठविले आहे व तुमच्या पतीने मंदिरासाठी टाकलेली वाळू चोरली आहे,’ असे आरोप करीत शिवीगाळ केली. त्यानंतर माझ्या सासºयांना घरासमोरील ओट्यावर ओढत नेऊन त्या तिघांंनी सासू-सासरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली म्हणून मी माझ्या पतीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले. माझे पती व त्यांच्यासोबत संजय काळे असे तिथे आले व भांडणे सोडवायला लागले. त्यावेळी त्या तीन व्यक्तींनी काठीने माझ्या पतीच्या उजव्या हातावर व सासूच्या, संजय काळे आणि राजेंद्र वारागडे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारहाण केली. त्या तिघांपैकी एक व्यक्ती अंधारातून पळून गेला तर इतर दोघांना जमलेल्या लोकांनी थांबवून ठेवले. त्यावेळी त्या दोघांची नावे वैभव गजानन शेवते (वय २७), सचिन कांता शेवते (२८, दोघे रा. भुर्इंज) व पळून गेलेल्या व्यक्तीचे निम्या ऊर्फ निमेष बाजीराव जाधव, (रा. भुर्इंज) असे असल्याचे समजले. हे तिघेही दुचाकीवरून आले होते.काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच मारहाणीचा आरोपवैभव गजानन शेवते (वय २७, रा. भुर्इंज) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामसभेत झालेल्या वाळू चर्चेवरुन अजित वारागडे यांनी ‘आमच्या नदीकाठच्या क्षेत्रातून महालक्ष्मी मंदिरासाठी काढलेल्या वाळूपैकी इतर काही वाळू दुसरीकडे विकल्याबाबत’ जितेंद्र वारागडे यास विचारण्यास गेले असता तिथून मोटारसायकलवरून परत येत असताना जितेंद्र वारागडे याने आम्हाला मोटार सायकलवरून खाली पाडून मारहाण केली. तसेच जितेंद्र वारागडेसोबत त्याच्या घराशेजारील सात ते आठ जणांनीही तिघांना मारहाण केली. यामध्ये सचिन शेवते, निमेश जाधव जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली आहे.