शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबास मारहाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच्या पत्नी, आई व इतर लोकांना दारूच्या नशेत जबर मारहाण केली. हा हल्ला राष्ट्रवादी सभापतींचे पती सुधीर भोसले यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.गीतांजली वारागडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भुर्इंज येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेमध्ये पोपट शेवते यांनी भुर्इंज येथील महालक्ष्मी मंदिरासाठी आणलेली वाळू माझे पती जितेंद्र वारागडे यांनी दुसरीकडे नेली असल्याचा आरोप केला. त्यावेळी माझ्या पतीने ही वाळू देवस्थान कमिटीच्या म्हणण्याप्रमाणे मंदिरासाठीच वापरलेली होती, असे सांगितले होते. हे मला माझ्या पतींनी घरी आल्यावर सांगितले. दि. १६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घरात जेवण करीत असताना तीन व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आले. त्यापैकी एकाने, ‘जितेंद्र वारागडे कुठे आहे, त्याला जिवंत ठेवत नाही.’ त्यावेळी मी त्यांना ‘घरात नाहीत,’ असे म्हटल्यावर त्यांनी माझ्याकडे माझ्या पतीचा मोबाईल नंबर मागितला. तो मी त्यांना दिला नाही. त्यावर त्या तिघांनी मला तसेच माझ्या सासू-सासरे व पतीला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच आम्हाला ‘सुधीर भोसले यांनी पाठविले आहे व तुमच्या पतीने मंदिरासाठी टाकलेली वाळू चोरली आहे,’ असे आरोप करीत शिवीगाळ केली. त्यानंतर माझ्या सासºयांना घरासमोरील ओट्यावर ओढत नेऊन त्या तिघांंनी सासू-सासरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली म्हणून मी माझ्या पतीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले. माझे पती व त्यांच्यासोबत संजय काळे असे तिथे आले व भांडणे सोडवायला लागले. त्यावेळी त्या तीन व्यक्तींनी काठीने माझ्या पतीच्या उजव्या हातावर व सासूच्या, संजय काळे आणि राजेंद्र वारागडे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारहाण केली. त्या तिघांपैकी एक व्यक्ती अंधारातून पळून गेला तर इतर दोघांना जमलेल्या लोकांनी थांबवून ठेवले. त्यावेळी त्या दोघांची नावे वैभव गजानन शेवते (वय २७), सचिन कांता शेवते (२८, दोघे रा. भुर्इंज) व पळून गेलेल्या व्यक्तीचे निम्या ऊर्फ निमेष बाजीराव जाधव, (रा. भुर्इंज) असे असल्याचे समजले. हे तिघेही दुचाकीवरून आले होते.काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच मारहाणीचा आरोपवैभव गजानन शेवते (वय २७, रा. भुर्इंज) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामसभेत झालेल्या वाळू चर्चेवरुन अजित वारागडे यांनी ‘आमच्या नदीकाठच्या क्षेत्रातून महालक्ष्मी मंदिरासाठी काढलेल्या वाळूपैकी इतर काही वाळू दुसरीकडे विकल्याबाबत’ जितेंद्र वारागडे यास विचारण्यास गेले असता तिथून मोटारसायकलवरून परत येत असताना जितेंद्र वारागडे याने आम्हाला मोटार सायकलवरून खाली पाडून मारहाण केली. तसेच जितेंद्र वारागडेसोबत त्याच्या घराशेजारील सात ते आठ जणांनीही तिघांना मारहाण केली. यामध्ये सचिन शेवते, निमेश जाधव जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली आहे.