शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐतिहासिक झºयावर चक्क बांधकाम अजिंक्यतारा पायथ्यालगत प्रकार : इतिहासप्रेमींकडून नाराजी; पाण्याचा स्त्रोत मुजविल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:58 IST

सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याची प्रशासनाने दखल न घेतल्याने इतिहाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

किल्ले अजिंक्यताºयावर एकूण चार झरे आहेत. या झºयांना किल्ल्यावरील तळ्यातील पाणी पाझरून भूगर्भातून झºयात येते. त्यातील एक झरा हा मंगळाई मंदिराजवळ तर दुसरा मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला आहे. तिसरा झरा माची पेठेतील कोकणी वस्तीत आहे. चौथा झरा हा किल्ल्यावरील वनविभागाने केलेल्या रस्त्यामुळे बंद झाला आहे.सध्या अस्तित्वात असणाºया तीन झºयांपैकी मंगळाई मंदिराजवळील व माची पेठेतील या दोन झºयांना पाणी आहे. तर मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला असणाºया झºयाला पावसाळ्यात पाणी असते.

माची पेठेतील असणारा नागझरा हा मानवी वस्तीत असल्याने या शिवकालीन झºयावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, या झराला मुबलक पाणी असून देखील मानवी वस्तीमुळे या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी सध्या कोणीही वापरत नाही.माची पेठेतील नागझºयाचे पाणी पूर्वी जलमंदिरामध्ये पूजेसाठी वापरले जायचे. तसेच दुष्काळावेळी या झºयाला भरपूर पाणी असल्याने नागरिक या झºयातील पाणी पिण्यासाठी घेऊन जात होते. त्यामुळे दुष्काळात हा झरा वरदानी होता. तर बाकीचे झरे हे प्राण्यासाठी उपयोगी पडत होते. परंतु अलीकडे किल्ल्यावर वाढत जाणाºया मानवी वस्तीमुळे हे झरे नामशेषाच्या होणाच्या मार्गावर आहेत.

काही ठिकाणी झºयावर चक्क बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्याचा स्त्रोत शेजारीच असताना तो मुजविण्याचा घाट काहींना घातला आहे. पुरातत्व, बांधकाम आणि पालिका या सगळ्याच प्रशासनाचे या नैसर्गिक झºयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इतिहासप्रेमींकडून होत आहे. घराचे बांधकाम करण्यात आलेल्या झºयांमध्ये स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी आहे. परंतु याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. कांची कामकोटी शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे साताºयात मुक्कामासाठी आले असताना झºयाजवळ एक महिना झोपडी बांधून वास्तव्य केले होते. त्यावेळी त्यांना या झºयातील पाणी उपयोगी पडले होते.जागेसाठी वाट्टेल ते..जमिन खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी झोपडी टाकून लोक वास्तव्य करत आहेत. अजिंक्यतारा, बोगदा परिसरातील डोंगर भागामध्येही झोपड्या रातोरात उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे जागेसाठी पाण्याचे स्त्रोत मुजविण्यासही लोक मागे पुढे पाहात नाहीत.साताºयाचा इतिहास जगभर पोहोचला आहे. अजूनही ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे साताºयात पाहायला मिळतात. मात्र, पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे असे दुर्मीळ झरे कोनाड्यात पडत आहेत. - प्रा. सुभाष कदम (इतिहास प्रेमी)