शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ऐतिहासिक झºयावर चक्क बांधकाम अजिंक्यतारा पायथ्यालगत प्रकार : इतिहासप्रेमींकडून नाराजी; पाण्याचा स्त्रोत मुजविल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:58 IST

सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याची प्रशासनाने दखल न घेतल्याने इतिहाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

किल्ले अजिंक्यताºयावर एकूण चार झरे आहेत. या झºयांना किल्ल्यावरील तळ्यातील पाणी पाझरून भूगर्भातून झºयात येते. त्यातील एक झरा हा मंगळाई मंदिराजवळ तर दुसरा मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला आहे. तिसरा झरा माची पेठेतील कोकणी वस्तीत आहे. चौथा झरा हा किल्ल्यावरील वनविभागाने केलेल्या रस्त्यामुळे बंद झाला आहे.सध्या अस्तित्वात असणाºया तीन झºयांपैकी मंगळाई मंदिराजवळील व माची पेठेतील या दोन झºयांना पाणी आहे. तर मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला असणाºया झºयाला पावसाळ्यात पाणी असते.

माची पेठेतील असणारा नागझरा हा मानवी वस्तीत असल्याने या शिवकालीन झºयावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, या झराला मुबलक पाणी असून देखील मानवी वस्तीमुळे या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी सध्या कोणीही वापरत नाही.माची पेठेतील नागझºयाचे पाणी पूर्वी जलमंदिरामध्ये पूजेसाठी वापरले जायचे. तसेच दुष्काळावेळी या झºयाला भरपूर पाणी असल्याने नागरिक या झºयातील पाणी पिण्यासाठी घेऊन जात होते. त्यामुळे दुष्काळात हा झरा वरदानी होता. तर बाकीचे झरे हे प्राण्यासाठी उपयोगी पडत होते. परंतु अलीकडे किल्ल्यावर वाढत जाणाºया मानवी वस्तीमुळे हे झरे नामशेषाच्या होणाच्या मार्गावर आहेत.

काही ठिकाणी झºयावर चक्क बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्याचा स्त्रोत शेजारीच असताना तो मुजविण्याचा घाट काहींना घातला आहे. पुरातत्व, बांधकाम आणि पालिका या सगळ्याच प्रशासनाचे या नैसर्गिक झºयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इतिहासप्रेमींकडून होत आहे. घराचे बांधकाम करण्यात आलेल्या झºयांमध्ये स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी आहे. परंतु याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. कांची कामकोटी शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे साताºयात मुक्कामासाठी आले असताना झºयाजवळ एक महिना झोपडी बांधून वास्तव्य केले होते. त्यावेळी त्यांना या झºयातील पाणी उपयोगी पडले होते.जागेसाठी वाट्टेल ते..जमिन खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी झोपडी टाकून लोक वास्तव्य करत आहेत. अजिंक्यतारा, बोगदा परिसरातील डोंगर भागामध्येही झोपड्या रातोरात उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे जागेसाठी पाण्याचे स्त्रोत मुजविण्यासही लोक मागे पुढे पाहात नाहीत.साताºयाचा इतिहास जगभर पोहोचला आहे. अजूनही ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे साताºयात पाहायला मिळतात. मात्र, पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे असे दुर्मीळ झरे कोनाड्यात पडत आहेत. - प्रा. सुभाष कदम (इतिहास प्रेमी)