शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

ऐतिहासिक झºयावर चक्क बांधकाम अजिंक्यतारा पायथ्यालगत प्रकार : इतिहासप्रेमींकडून नाराजी; पाण्याचा स्त्रोत मुजविल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:58 IST

सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

सातारा : अजिंक्यताºयाच्या पायथ्याला कोकणी वस्तीत असणाºया शिवकालीन नागझºयावर चक्क घरे बांधली गेली असून, या झºयावरच अतिक्रमण झाल्याने बाराही पाणी असणारा हा झरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याची प्रशासनाने दखल न घेतल्याने इतिहाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

किल्ले अजिंक्यताºयावर एकूण चार झरे आहेत. या झºयांना किल्ल्यावरील तळ्यातील पाणी पाझरून भूगर्भातून झºयात येते. त्यातील एक झरा हा मंगळाई मंदिराजवळ तर दुसरा मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला आहे. तिसरा झरा माची पेठेतील कोकणी वस्तीत आहे. चौथा झरा हा किल्ल्यावरील वनविभागाने केलेल्या रस्त्यामुळे बंद झाला आहे.सध्या अस्तित्वात असणाºया तीन झºयांपैकी मंगळाई मंदिराजवळील व माची पेठेतील या दोन झºयांना पाणी आहे. तर मारुती मंदिराच्या खालच्या बाजूला असणाºया झºयाला पावसाळ्यात पाणी असते.

माची पेठेतील असणारा नागझरा हा मानवी वस्तीत असल्याने या शिवकालीन झºयावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, या झराला मुबलक पाणी असून देखील मानवी वस्तीमुळे या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी सध्या कोणीही वापरत नाही.माची पेठेतील नागझºयाचे पाणी पूर्वी जलमंदिरामध्ये पूजेसाठी वापरले जायचे. तसेच दुष्काळावेळी या झºयाला भरपूर पाणी असल्याने नागरिक या झºयातील पाणी पिण्यासाठी घेऊन जात होते. त्यामुळे दुष्काळात हा झरा वरदानी होता. तर बाकीचे झरे हे प्राण्यासाठी उपयोगी पडत होते. परंतु अलीकडे किल्ल्यावर वाढत जाणाºया मानवी वस्तीमुळे हे झरे नामशेषाच्या होणाच्या मार्गावर आहेत.

काही ठिकाणी झºयावर चक्क बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्याचा स्त्रोत शेजारीच असताना तो मुजविण्याचा घाट काहींना घातला आहे. पुरातत्व, बांधकाम आणि पालिका या सगळ्याच प्रशासनाचे या नैसर्गिक झºयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इतिहासप्रेमींकडून होत आहे. घराचे बांधकाम करण्यात आलेल्या झºयांमध्ये स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी आहे. परंतु याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. कांची कामकोटी शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे साताºयात मुक्कामासाठी आले असताना झºयाजवळ एक महिना झोपडी बांधून वास्तव्य केले होते. त्यावेळी त्यांना या झºयातील पाणी उपयोगी पडले होते.जागेसाठी वाट्टेल ते..जमिन खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी झोपडी टाकून लोक वास्तव्य करत आहेत. अजिंक्यतारा, बोगदा परिसरातील डोंगर भागामध्येही झोपड्या रातोरात उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे जागेसाठी पाण्याचे स्त्रोत मुजविण्यासही लोक मागे पुढे पाहात नाहीत.साताºयाचा इतिहास जगभर पोहोचला आहे. अजूनही ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे साताºयात पाहायला मिळतात. मात्र, पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे असे दुर्मीळ झरे कोनाड्यात पडत आहेत. - प्रा. सुभाष कदम (इतिहास प्रेमी)