शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

महामार्गावरील बाजारपेठांना पुलांचा तडाखा!

By admin | Updated: October 17, 2016 00:54 IST

परिणामाबाबत उलटसुलट चर्चा : पाचवडमधील काम अंतिम टप्प्यात; गजबज असणाऱ्या ठिकाणी दिसतो शुकशुकाट

महेंद्र गायकवाड ल्ल पाचवड राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर असणाऱ्या व नेहमी वर्दळ असणाऱ्या लिंब, आनेवाडी व उडतारे याठिकाणी असलेल्या महामार्गालगतच्या बाजारपेठा उड्डाणपुलांमुळे पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. मुंबई व पुण्याहून ये-जा करणारे पर्यटक व वाहनचालक यांचे चहापाणी, जेवण व नाष्टा याकरिता हमखास थांबण्याचे ठिकाण म्हणून या बाजारपेठा प्रसिद्ध होत्या; परंतु या गावांच्या महामार्गावरील फाट्यांवर मोठे उड्डाणपूल झाल्याने येथील बाजारपेठांना त्याचा जबरदस्त तडाखा बसला आहे. नेहमी मोठी वर्दळ असणाऱ्या व कायम गजबजलेल्या या बाजारपेठांमध्ये आता मात्र चांगलाच शुकशुकाट पसरला आहे. वाई तालुक्यात अग्रेसर बाजारपेठ असलेल्या पाचवडमधील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. महामार्गाच्या दुतर्फा असणारी बाजारपेठ उड्डाणपुलांमुळे पूर्व-पश्चिम अशा दोन बाजूला विभागली जाणार आहे. महामार्गावरून प्रवास करणारे व खात्रीशीर व्यावसाय मिळवून देणारे प्रवासीच उड्डाणपुलामुळे याठिकाणी थांबणार नसल्याने येथील व्यावसायिकांची संपूर्ण भिस्त आता आजूबाजूच्या गावांमधून येणाऱ्या ग्राहकांवर राहणार आहे. लिंब, आनेवाडी व उडतारे ही वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेली गावे आहेत. ही गावे महामार्गाला जोडली गेली असून, या सर्व गावांच्या फाट्यावर निर्माण झालेल्या बाजारपेठा नुकत्याच बाळसे धरू लागल्या होत्या. लिंब फाट्याला तर गेल्या दोन-चार वर्षांपासून मोठे महत्त्व निर्माण झाले होते. कॉलेजमुळे येथील माळरानावरील जमिनींना अव्वाच्या सव्वा दर आला होता. हॉटेल्स, किराणा दुकान, स्टेशनरी व इतर व्यावसायिकांना वर्षभरापूर्वी याठिकाणी अच्छे दिन आले होते. मात्र, महामार्गाच्या सहापदरीकरणात येथे उड्डाणपूल झाला आणि लिंब फाट्यावरील बाजारपेठेची नाळच जणू तोडली गेली. अशीच स्थिती आनेवाडी व उडतारे फाट्यांची झाली आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी या फाट्यांवर मोठ्या आशेने छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू केले होते. उड्डाणपूल निर्माण होण्याअगोदर महामार्गाच्या बाजूने असणारे उद्योग चांगले तेजीत चालले होते. येथील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतीचा बागायती माल महामार्गावरून ये-जा करणारे पुणे-मुंबईचे लोक हातोहात घेत होते. हॉटेल चालकांबरोबरच आॅटोमोबाईल व टायर-ट्यूबचे व्यवसायही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करीत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या गावांच्या फाट्यावरील उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आणि येथील बाजारपेठांना अवकळा आली. पुणे-मुंबई व कोल्हापूर-सांगलीकडून येणारे पर्यटक व वाहनचालक आता या बाजारपेठांमध्ये न थांबता उड्डाणपूलांवरून पुढचा रस्ता धरत आहेत. अशा परिस्थितीमुळे अस्मानाला भिडलेले येथील जमिनीचे भाव आता कोलमडले असून, याठिकाणचे व्यावसायिक व्यवसाय मंदावल्याने हवालदिल झाले आहेत. बाजारपेठांवर व्यावसायिकांच्या नजरा.. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलांमुळे लिंब, आनेवाडी व उडतारे गावांच्या बाजारपेठांना तडाखा बसला असतानाच सध्या वाई तालुक्यातील पाचवड आणि भुर्इंज या महत्त्वाच्या बाजारपेठांमधील महामार्गावर उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. महामार्गावरील इतर बाजारपेठांना बसलेल्या तडाख्यामुळे पाचवडमधील प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अशा या दोन्ही बाजारपेठा उड्डाणपुलांनतर आपले अस्तित्व टिकविणार का? येथील व्यावसायिक व व्यापारी आपल्या व्यवसायांवर परिणाम होऊ नयेत, याकरिता कोणत्या उपाययोजना करणार? याबाबत या बाजारपेठांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. असे असलेतरी बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.