शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

कोरेगावातील गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:19 IST

साहील शहा ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : शहरावर पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्याने गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी वगळता अन्य पोलिस अभावानेच रस्त्यावर आढळतात. शहराची व्याप्ती पाहता आणि गुन्हेगारांची गुन्हे करण्याची नवनवीन पध्दती पाहता, त्याचा बिमोड करायचा झाल्यास शहरांतर्गत पोलिस चौक्या कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शहराच्या चारही ...

साहील शहा ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : शहरावर पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्याने गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी वगळता अन्य पोलिस अभावानेच रस्त्यावर आढळतात. शहराची व्याप्ती पाहता आणि गुन्हेगारांची गुन्हे करण्याची नवनवीन पध्दती पाहता, त्याचा बिमोड करायचा झाल्यास शहरांतर्गत पोलिस चौक्या कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शहराच्या चारही दिशांना चौक्या उभारल्यास शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.तालुका मुख्यालय असलेले कोरेगाव हे पश्चिम महाराष्टÑातील बाजारपेठेचे शहर. पूर्वीच्या काळात जिल्ह्यातील व्यापारावर कोरेगावची मोहर होती. कालांतराने शहराची ओळख पुसली गेली, मात्र राजकारणातील धगधगते शहर म्हणून ते आजही ओळखले जाते. शहरात ब्रिटीशकाळापासून पोलिस ठाणे असून, तेथे कर्मचारी संख्या मर्यादित आहे. गेल्या काही वर्षांत अधिकाºयांची संख्या आणि दर्जा वाढत गेला, कर्मचाºयांची संख्या मात्र त्या-त्या प्रमाणात वाढलीच नाही. पोलिस ठाण्यात सध्या एक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व सुमारे ६३-६५ कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी कोरेगाव शहराची जबाबदारी केवळ तीन हवालदार दर्जाच्या कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी हीच जबाबदारी नाईक दर्जाचे कर्मचारी सांभाळत होते.भांडणे-मारामाºयांसाठी विद्यार्थी कारणीभूत२५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर पूर्वी मिनी गोवा म्हणून ओळखले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या बंदीमुळे शहरातील सर्व वाईन शॉप्स, बिअर बार-परमीट रुम व देशी दारूची दुकाने बंद झाली आहेत. शहरात मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा, कन्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालये आहेत. त्यामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा-महाविद्यालये ही आजवर भांडणे व मारामारीची मुख्य कारणे बनली आहेत. तेथे होणारी भांडणे बाहेर जाऊन मोठे स्वरूप घेतात आणि त्यातून मारामारी आणि खुनी हल्ले होतात, हे आजवरचे चित्र आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी तक्रार घेऊन येणाºयांची तक्रारी दाखल करतात आणि त्यावर कायद्यातील तरतुदींप्रमाणे कार्यवाही होते, पुढे काहीच होत नाही आणि त्यातून गुन्हेगारी फोफावते, असा कोरेगावकरांचा अनुभव आहे.उपनिरीक्षकाची नेमणूक कराकोरेगाव शहरावर पूर्वी एक फौजदार आणि मोजकेच कर्मचारी शहरावर नियंत्रण ठेवून होते, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शहरात एक उपअधीक्षक, एक निरीक्षक, तीन उपनिरीक्षक व सुमारे ७० कर्मचारी वेगवेगळ्या कार्यालयात कार्यरत असताना, त्यांना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येत नाही, ही शोकांतिका आहे. शहरातील तीन बिटांसाठी आता एक उपनिरीक्षक व किमान पाच ते सहा कर्मचारी नेमावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.चौक्यांचे अस्तित्व नावालाचकोरेगावात ग्रामपंचायत असताना तत्कालीन पदाधिकाºयांनी आझाद चौक (भाजी मंडई), चौथाई परिसर-श्री भैरवनाथ मंदिर आणि सुभाषनगर (मॅफको कंपनी समोर) येथे पोलिस चौक्यांची उभारणी करून दिली होती. आझाद चौकात रोटरी क्लबने मोठी भूमिका बजावली होती. २००१ साली त्याचे उद्घाटन झाल्यावर काही दिवसांसाठी चौकीचा वापर झाला, त्यानंतर मात्र चौकीचा एक-एक भाग चोरीस जाऊ लागला आहे. पोलिसांचे शहरात अस्तित्व नसल्याने गुन्हेगारी बाळसे धरू लागली असून आलेख वाढत चालला आहे.