शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला छावणी.. पण कधी?

By admin | Updated: April 15, 2016 00:42 IST

पावसाळ्यात देणार काय ?: शेतकऱ्यांचा संतप्त सवाल; १४ गावांच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय नाही..

सागर गुजर--सातारा  -लहरी राजा, प्रजा आंधळी...अधांतरी दरबार...उद्धवा अजबं तुझे सरकार...! असं म्हणण्याची वेळ सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावांवर येऊन ठेपली आहे. माण-खटाव तालुक्यांतील १४ गावांनी चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत, हे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले आहेत; पण मागेल त्याला छावणीची घोषणा करणारे शासन पावसाप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी कोरडी अनुभूती देणारे ठरले आहे.पावसाने पाठ फिरविली, उन्हाळी पाऊसही गायब आहे. त्यातच पावसाळा अजून दोन महिने लांब आहे, त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे. माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण या तालुक्यांसह पश्चिमेकडील वाई, पाटण या तालुक्यांतील काही गावे पाण्यासाठी दाहीदिशा फिरू लागली आहेत. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हे पाणी लोकांना पिण्यासाठी आहे, पण जनावरांच्या पिण्याचे हाल सुरू आहेत. त्यातच चाऱ्याच्या गंजी संपत आल्या आहेत. पाऊसच नसल्याने हिरवा चाराही उपलब्ध होत नाही, या परिस्थितीमध्ये शासनाने चारा छावण्या सुरू करून दुष्काळी जनतेला दिलासा देणे आवश्यक असताना शासन केवळ घोषणाबाजी करत असल्याचे चित्र समोर येत आहे. राजवडी, बिजवडी, जाशी, भालवडी, वडगाव, पांगरी, येळेवाडी, मार्डी, पिंगळी बु., अनभुलेवाडी, पाचवड, शेवरी, पळशी, जाधववाडी या १४ गावांमधील शेतकऱ्यांकडे अत्यल्प चारा उरला आहे. या गावांमध्ये पाण्याचेही दुर्भिक्ष आहे. विहिरींचे पाणी तळाला गेले आहे. जिवावर उदार होऊन लोक विहिरीत उतरतात. तळाशी असलेले पाणी खरडून घेऊन ते जनावरांना पाजले जात आहे. आता कुठे एप्रिल महिना सुरू आहे. मे महिना तोंडावर आहे. उन्हाची तीव्रता आणखी वाढून उरलेले पाणीही संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील ३५८ गावे ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीत मोडतात. या गावांमध्येही परिस्थिती बिकट आहे. चारा व पाण्याअभावी पशुधन विकण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. जिल्ह्यातील शंभूखेड, इंजबाब, पर्यंती, हवलदारवाडी, मार्डी, कारखेल, भाटकी, भालवडी, वरकुटे म्हसवड, रांजणी, पांगरी, वावरहिरे, कोळेवाडी, दहिवडी, उकिर्डे, महिमानगड, शिंदी बु., गजवडी, जाधववाडी, बिजवडी, पांगरी, बिदाल, बोडके, तोंडले, पाचवड, मलवडी, वेळेवाडी, वावरहिरे, मोही, जाशी, पळशी, दिवडी, पांढरवाडी, गारवडी, वारुगड, परकंदी, टाकेवाडी, पिंगळी खु., शेवरी, गोंदवले बु., वाघमोडेवाडी, मार्डी, राणंद, वडगाव, शिंगणापूर या गावांसह ४०६ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.शासनाचे केवळ २ टँकरजिल्ह्यामध्ये ७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी शासनाच्या मालकीचे केवळ २ टँकर आहेत, उर्वरित टँकर खासगी मालकीचे आहेत. माणमध्ये ५१, खटावमध्ये ६, कोरेगावमध्ये ६, खंडाळ्यात १, फलटणमध्ये ४, वाईत ४, पाटणमध्ये ३ टँकरने पाणीपुरवठा शासन एका बाजूला मागेल त्याला छावणी देण्याची घोषणा करते, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आदेशच मिळाले नसल्याने केवळ कागदपत्रांची जमवाजमव करत असल्याचे चित्र आहे. विधानसभा अधिवेशनातही मी चारा छावण्यांचा प्रश्न गांभीर्याने मांडला, तेव्हा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावणीला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाही शासन हाताची घडी, तोंडावर बोट घालून बसत असेल तर आम्हाला आमच्या मार्गाने उपाययोजना करावी लागेल.- जयकुमार गोरे, आमदार