शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

त्यांनी सही न केल्याने कर्जमाफी परत गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 23:56 IST

इंद्रजित मोहिते : टेंभू येथे आयोजित ‘कृष्णा’ संघर्ष दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

कऱ्हाड : पाच वर्षापूर्वी आमच्या संचालक मंडळाने शासनाच्या कर्जमाफीच्या योजनेत कारखान्याच्या जलसिंचन योजनांचा समावेश केला. त्याद्वारे तब्बल ८ कोटी रुपयांची कर्जमाफीही मिळाली. परंतु विद्यमान अध्यक्षांनी संबंधीत कागदपत्रावर सही न केल्यामुळे मिळालेली कर्जमाफी परत गेली. याला सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. यासह अनेक बाबींमधून सभासदांचे अर्थिक नुकसान या मंडळींनी केले आहे. अशी टीका डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.टेंभू, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येवू घातलेल्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते अयोजीत संघर्ष दौऱ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय चरेगावकर होते. कारखान्याच्या माजी संचालिका वर्षाराणी पाटील, भास्कर पाटील, सयाजीराव पाटील, अधिकराव नलवडे, अशोक जाधव, राजाराम बाबर, शेरेचे दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कुंभार, संदिप भुसारी, युवराज भोईटे, नागराज शिंदे, मधुकर पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुहास महाडीक यांची उपस्थिती होती. डॉ. मोहिते म्हणाले, कारखान्याच्या टेंभू जलसिंचन योजनेची पाच वर्षापूर्वी अत्यंत भक्कम परिस्थिती होती. मागील पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना अडचणीत आली आहे. गेल्या पाच वर्षात सभासदांना २५० ते २७५ रुपयांनी सरासरीपेक्षा ऊसदर कमी मिळाला आहे. विद्यमान अध्यक्ष कारखान्यात सगळेच विक्रमी आहे असे सांगतात. तर मग इतरांपेक्षा दर का कमी मिळत आहे. याचा खुलासा का करत नाहीत. पाच वर्षापूर्वी सहवीजनिर्मितीसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प कारखान्यात उभारल्यामुळे सध्या कामगारांचे पगार तरी देणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले. सुहास महाडीक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) सभासदांच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षसत्ताधाऱ्यांनी पाच वर्षात प्रत्येक गोष्ट ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे केली. त्यामुळे सभासदांच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी सभासदांच्या संसाराची थट्टा केली आहे. येत्या निवडणूकीत सभासद सत्ताधाऱ्यांचा प्रगतीऐवजी चाललेला ढोंगी कारभार उधळून लावतील व सभासदांची मालकी अबाधीत राखण्यासाठी यशवंतराव मोहितेंच्या विचाराला साथ देतील, असा विश्वास मोहीते यांनी व्यक्त केला.