शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

टपालाला यंदा शुभ दिवाळी

By admin | Updated: November 12, 2015 00:04 IST

ग्राहक आकर्षित : गतवर्षीच्या तुलनेत शुभेच्छा कार्डांत २५ टक्के वाढ

सातारा : टपाल व्यवस्थेची सुरुवात १७ व्या शतकात झाली असली तरी आजच्या मितीला या सेवेतही मोठ्या स्पर्धा सुरू आहेत. गत काही वर्षांत मोबाईल आल्यापासून या सेवेत मोठा परिणाम दिसून येत असला तरी यंदाच्या दिवाळीत शुभेच्छा कार्डांचे प्रमाण वाढल्याने पुन्हा एकदा ग्राहकांचा विश्वास टपाल खात्याकडे आकर्षित झाला असून, यंदाची दिवाळी टपाल खात्याला शुभ दिवाळीच झाली आहे.आधुनिक यांत्रिक युगात स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकला फार मोठं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे एखादा शुभेच्छा संदेश देण्यासाठी या सेवेचा मोठा वापर होतो, यामुळे टपाला सेवेला याचा मोठा फटका बसला आहे. परंतु सध्या दिवाळी सुरू असल्याने पोस्टाची आर्थिक आवक वाढली आहे. इंटरनेटच्या आधुनिक युगातही परंपरागत पोस्ट खात्याने आपल्या सेवेच्या बळावर ग्राहकांना आपल्याजवळ केल्याचे स्पष्ट या दिवाळीतील भेटकार्ड पाहिल्यावर होत आहे.पोस्ट खात्यातून मासिके, बँक, आरटीओ, एलआयसी तसेच विविध शासकीय कार्यालयांचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात; परंतु दिवाळीतील भाऊबीज, पाडवाची भेटवस्तू व शुभेच्छा कार्डासाठी खासगी सेवेपेक्षा पोस्ट आॅफिसला यंदाही मागणी वाढली आहे, त्यामुळे स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे आवाहन या खात्यासमोर असताना ग्राहकांना विश्वास देखील ठेवण्यात यशस्वी होत असल्याचे उदाहरण म्हणजेच यंदाच्या दिवाळीला नागरिकांनी दाखविलेला विश्वास म्हणावा लागेल. त्यामुळे ही दिवाळी सातारा पोस्ट कार्यालयासाठी शुभ दिवाळीच मानावी लागेल. (प्रतिनिधी)