शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हसूरचा जलस्वराज्य प्रकल्प ठरला आदर्श

By admin | Updated: February 15, 2015 23:40 IST

नेटके संयोजन : आठ वर्षांपासून अखंडितपणे नळ पाणीपुरवठा; शंभर टक्के नळांना मीटर

संदीप बावचे - शिरोळ -शासनाच्या योजनेचा पुरेपूर फायदा घेऊन गेली आठ वर्षे अविरतपणे शिरोळ तालुक्यातील हसूर येथे जलस्वराज्य प्रकल्प सुरू आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. शिवाय ग्रामीण भागातील शंभर टक्के नळांना मीटर असणारे तालुक्यातील हे पहिलेच गाव आहे. २००७-०८ साली हसूर येथे दहा टक्के लोकवर्गणीतून जलस्वराज्य प्रकल्पसाठी ६० लाख रुपयांचा निधी या योजनेतून खर्च करण्यात आला. नऊ गुंठे जागेवर पाण्याची टाकी, शुद्धिकरण यंत्रणा बसविण्यात आली. गावामध्ये वितरण व्यवस्था चांगल्या प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोनातून तीन इंची व दोन इंची पाईपलाईन टाकण्यात आली. पाण्याचे नेटके नियोजन करीत असताना, तीन विभागांमध्ये प्रत्येक नळाला किमान दीड तास पाणी सोडण्यात येते. शंभर टक्के नळांना मीटर बसवून तीन महिन्यांतून एकदा रिडिंग घेऊन एक हजार लिटरला सहा रुपयांप्रमाणे आकारणी केली जाते. सरासरी तीन महिन्यांसाठी दीडशे रुपये पाणी कर घेण्यात येतो. नियोजनामुळे पाणी कर वसुलीदेखील ९० टक्के होते. विशेष बाब म्हणजे पाणी शुद्धिकरणासाठी टीसीएल न वापरता इस्त्राईल देशातून आणलेल्या मशीनमधून औषधांचे प्रमाण टाकून शेवटच्या नळापर्यंत शुद्ध पाणी कसे मिळेल, याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांत अखंडितपणे नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. महावितरणचे वीज बिलदेखील वेळच्यावेळी जमा केले जाते.