शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मनोमिलनाचा कारभार म्हणजे बोरीचा बार

By admin | Updated: August 6, 2015 21:37 IST

सातारा पालिका सभा : खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीत काम करण्यावरून नगरसेवकांमध्ये तू-तू मै-मै

सातारा : पालिकेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच तब्बल अडीच तास चालली. या सभेत दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी एकमेकांची उणी-धुणी काढली. तसेच खासदारकी आणि आमदारकी निवडणुकीत काम न केलेल्यावर शंका आणि निष्ठा यावर चांगलीच चर्चा रंगली. विरोधी पक्षनेत्यांनी हे मनोमिलन म्हणजे बोरीचा बार असल्याची जळजळीत टीका केल्याने सभा वादळी ठरली.पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत ६२ विषय मंजूर झाले. गोखले हौद सुशोभीकरण विषयावरुन स्वीकृत नगरसेविका हेमांगी जोशी आणि नगरसेवक अविनाश कदम यांच्यात कलगीतुरा रंगला. हेमांंगी जोशी यांनी ‘हे काम खासदार फंडातून मंजूर झाले असताना विषयपत्रिकेवर हा विषय कसा आला? प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. नगरसेवकांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते. प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?’ असा सवाल उपस्थित केला. किशोर गोडबोले हे नगरसेवक असताना हे काम मंजूर झाले होते. परंतु हे काम करता येऊ नये यासाठी त्याठिकाणी अतिक्रमण केले त्याच संस्थेच्या शिफारशीवरुन काम करण्याचा घाट घातला जात आहे. हे सर्व कशासाठी ? हे काम खासदार फंड आणि पालिका या दोन्हीच्या माध्यामातून करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याला नगरसेवक अविनाश कदम यांनी आक्षेप घेतला. प्रभागातील सर्वांना कोणाला कोणाचा विरोध आहे हे माहीत आहे. मंंगळवार तळ्याचा प्रत्येकवेळी विषय सांगितला जातो. परंतु मी दरवेळी या कामासाठी खासदारांचा उल्लेख करतो. तळयातील कारंज्याचा विषय खासदारांनी सांगितल्यावर थांबवला. मनोमिलन असताना हे काय चालले आहे? मला तर हे षडयंत्र वाटत आहे. खासदारकीच्या निवडणुकीच्यावेळी मतभेद निर्माण झाले तरी आम्ही तेव्हा काम केलेच ना, असे नगरसेवक अविनाश कदम यांनी सांगताच त्यांच्या या वक्तव्यावर अ‍ॅड. बनकर यांनी आक्षेप घेतला. ‘म्हणजे आम्ही आमदारकीच्या निवडणुकीत काम केले नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का,’ असा प्रश्न त्यांनी विचारला. खासदारकी आणि आमदारकी निवडणुकीचा मुद्दा या निमित्ताने चर्चिला गेल्याने इतर नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या. (प्रतिनिधी)फुटका तलावरून रंगला वाद !नगरसेवक रविंद्र पवार आणि मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यात फुटका तलावावरून वाद रंगला. नगरेसवक पवार म्हणाले, फुटका तलावाशेजारी चंद्रशेखर चोरगे यांनी अतिक्रमण केले असून न्यायालयाने ते काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. परंतु पालिकेने नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांंवर, फुटपाथवर बसणाऱ्यांवर लगेच कारवाई होते. परंतु धनदांडग्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुुळे मुुख्याधिकाऱ्यांनी यावर खुलासा करावा अन्यथा त्यांच्या केबिनपुढे उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला. त्याला उत्तर देताना मुख्याधिकारी बापट म्हणाले, या प्रकरणातील जागा ही पालिकेच्या मालकीची नाही. न्यायालयात सुरु असलेल्या दाव्यात पालिका प्रतिवादी आहे. न्यायालयाने पाडून टाकावा असा आदेश दिलेला नाही. ज्या विभागाची जागा आहे त्या विभागाने पालिकेला जर सांगितले तर ते पाडता येईल. असे स्पष्टीकरण दिले.