शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ...!गोरगरीब रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 15:11 IST

कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ असं उरातलं दु:ख घेऊन कष्टानं उभं राहणारे गोरगरीब लोक रस्त्यावर आले. आमची उपासमार थांबवा...अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला घातली.

ठळक मुद्दे हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ...!गोरगरीब रस्त्यावरजिल्हाधिकारी कार्यालयापुढे वाजला बँड-बाजा

सातारा : कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ असं उरातलं दु:ख घेऊन कष्टानं उभं राहणारे गोरगरीब लोक रस्त्यावर आले. आमची उपासमार थांबवा...अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला घातली.अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ रिक्षा युनियनच्यावतीने रिक्षा, चालक व मालक यांना कोरोना संकट काळात शासनाने तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कोरोना संकटकाळात शासनाने वेळोवेळी केलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

एका बाजूला उपासमारीशी सामना करत असताना दुसऱ्या बाजूला बँका, सोसायट्या, सहकारी बँका तसेच सर्व फायनान्स कंपन्या कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावत आहे. या व्यावसायिकांना कर्ज हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी, तसेच कर्जाचे व्याज माफ करावे, परिवहन विभागातील कर माफ करावा, कोरोनामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर त्याचे सर्व कर्ज माफ करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, शहर अध्यक्ष शशिकांत खरात सहभागी झाले.बँड बेन्झो चालक व कलाकार संघटनेच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोकराव जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे, खटावचे उपसभापती आनंदराव भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड-बाजा आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २५0 ते ३00 बँड बेन्जो पथके कार्यरत आहे. प्रत्येक पथकात २0 ते २५ कलाकार काम करतात. प्रत्येक जिल्ह्यात ६ हजार ते ७ हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाने रोजीरोटीस महाग झालेल्या या व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी करण्यात आली.यात्रेतील खेळणी, पाळणे व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ८00 कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. या कामगारांकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेच साधन नसल्याने खेळणी व पाळणे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासाठी बाळासाहेब सातपुते, सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.व्यावसायिकांची वरात जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातकोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. विवाह सोहळे बंद झालेल्या बँडबाजा व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कलाकारांच्या हाताला आता काम राहिलेले नाही. या व्यवसायांनी बँड-बाजा वाजवतच आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. प्रशासनाने आमच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी