शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

करणीच्या बाहुल्यांना अंनिस घालणार हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:28 IST

सातारा : हिरव्यागार वनराजाला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाºया प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकलेआहे. शनिवारी (दि. ३० डिसेंबर) वाई तालुक्यातील मांढरगडा वर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्या जाणार आहेत.मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा दि. १, २ व ३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. इथे पशुबळी ...

सातारा : हिरव्यागार वनराजाला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाºया प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकलेआहे. शनिवारी (दि. ३० डिसेंबर) वाई तालुक्यातील मांढरगडावर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्या जाणार आहेत.मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा दि. १, २ व ३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. इथे पशुबळी अथवा लिंबू, बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे हा या कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील मांढरदेवगडावर असे प्रकार होताना सर्रासपणे दिसतात.मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस बरीचशी झाडे आहेत. त्या झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून खिळे ठोकले जातात. अशा अघोरी प्रथा करून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्त प्रमाणात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. तरी या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे. असे अघोरी प्रकार होत असतील तरत्याला प्रतिबंध करण्याचाअधिकार पोलिसांना आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेता येऊ शकतो.या पार्श्वभूमीवर अंनिसतर्फे वाई पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले असून, ३० डिसेंबर रोजी करणीच्या नावाने झाडांना ठोकलेल्या बाहुल्या काढण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.मांढरदेव परिसरात नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी आधीच स्पष्ट केले आहे. आता तरीही असा अघोरी प्रकार होत असेल तर पोलिसांनाच संबंधितांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना आखावी अशी मागणी होत आहे.दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट यांची ३०० लोकांची प्रशिक्षित टीम येथे २४ तास असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व विभागांचा या यात्रेदरम्यान योग्य तो समन्वय राहावा, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने एकूण सोळा वॉकीटॉकी संचही दिले जाणार आहेत. देवस्थान विश्वस्थांमार्फत नियंत्रण कक्ष स्थापने, पशुहत्या बंदीबाबत सर्वत्र फलक लावण्यात येणार असून, यात्रेनिमित्त मांढरगडावर साफसफाईसाठी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.हिरवी झाडे घायाळहिरव्या झाडांना खिळे ठोकून करणीच्या काळ्या बाहुल्या लावल्या जातात. हा प्रकार अतिशय अघोरी आहे. तसेच तो भय उत्पन्न करणाराही आहे. हिरवीगार वनराई घायाळ होत आहे.