शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आधी धरण; मग अभयारण्य अन् आता

By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST

कुणीही यावे... गाव उठवून जावे! व्याघ्रप्रकल्प : लोकांच्या मानसिकतेच्या विचार करणार कोण? --...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे / अरुण पवार - कऱ्हाड/पाटण आधी कोयना धरण; मग अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प, यामुळे विस्थापनाचं भूतच जणू पाटण तालुक्याच्या मानगुटीवर बसले आहे. यापूर्वी सुमारे शंभर गावांचं विस्थापन झालंच आहे; पण आता आखणी ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने इथल्या लोकांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाची निर्मिती पाटण तालुक्यात झाली. त्यावेळी सुमारे ५० च्यावर गावांच्या जमिनी पाण्यात गेल्या. त्यांचे पुनर्वसन होताना मरणयातना सोसल्या. आजही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत नाहीत. त्यानंतर कोयना व चांदोली अभयारण्याची निर्मिती झाली; आणखी ६० गावे विस्थापित झाली. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय, त्यामुळे कोअर अन् बफर झोन तयार होऊ लागलेत. त्यामुळे सुमारे ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. खरंतर मनुष्य हा ‘समूहप्रिय’ प्राणी आहे. त्याला माणसांच्यात, आपल्या लोकांच्यात राहायला आवडते; पण पाटण तालुक्यातील शंभरवर गावांतील हजारो लोकांना आपल्या लोकांपासून दूर राहावे लागत आहे. ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत घडलो; त्या मातीशी, तिथल्या लोकांशी त्या तालुक्याशी लोकांची नाळ जोडलेली असते; पण धरण, अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प जणू लोकांची नाळच तोडण्याचा प्रयत्न करतंय की काय? अशी परिस्थिती आहे. कोयना अभयारण्यनिर्मितीच्या अगोदरही जंगलातील वन्यप्राणी जंगलातच राहत होते. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, कुरणे, पाणवठे जंगलातच होते. आतील ६० गावे आता उठवली. आता व्याघ्र प्रकल्प झाला. गवताची कुरणे नष्ट झाली. फक्त जंगले वाढली, जंगलात पिण्यासाठी पाणीही मिळेना, त्यामुळे रानडुकरे, गवे, बिबट्या, माकडे आदी रानटी प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत. याचा भयंकर त्रास आज पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. कधी मनुष्यावर हल्ला, तर कधी शेळ्या-मेंढ्यांचा बळी, अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. इतकेच काय; पण गहू, हरभरा, जोंधळा, मका, भात, नाचणी अशी पिके वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई अत्यंत तोकडी असून हजार-पाचशे रुपये हातावर पडत आहेत. (क्रमश:)खुंटीला टांगून ठेवल्यात बंदुका... ‘शिकार’ हा तर माणसाचा पूर्वीपासून चालत आलेला छंद अन् जगण्याचा भागही आहे. पूर्वी लोक शिकार करूनच आपली उपजीविका चालवित होते; पण आता वनविभागाने शिकार बंदीचा कायदा अधिक कडक राबवायला सुरुवात केल्याने शेती अन् स्वसंरक्षणासाठी परवाने असणाऱ्या बंदुका आता खुंटीला टांगून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंदूक आहे उशाला मारायचं कशाला? हा प्रश्न सुटत नाही. अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे ! कोयना व चांदोली अभयारण्यांचा विळखा तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. वन्यप्राणी अन् वनकर्मचाऱ्यांचा त्रास येथील लोकांना होत आहे. त्यामुळे लोक वैतागले आहेत. शेतातील पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत असून, उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे अनेक तरुण उद्योग, नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणेकडे वळाले आहेत. त्यामुळे निवी, कसणी सारख्या अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे लागलेली दिसतात. मी सध्या आमदार नाही. मात्र, माझ्या तालुक्यातील लोकांना वनकायदे व कोअर, बफर झोनचा त्रास होऊ नये म्हणून मी नेहमीच प्रयत्नरत आहे. पर्यावरण रक्षणाबरोबर माणसाचेही रक्षण करा, ही माझी भूमिका आहे. लोकांच्या न्याय मागण्यांसाठी मी लढा उभारला आहे. -विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार, पाटण