शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आधी धरण; मग अभयारण्य अन् आता

By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST

कुणीही यावे... गाव उठवून जावे! व्याघ्रप्रकल्प : लोकांच्या मानसिकतेच्या विचार करणार कोण? --...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे / अरुण पवार - कऱ्हाड/पाटण आधी कोयना धरण; मग अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प, यामुळे विस्थापनाचं भूतच जणू पाटण तालुक्याच्या मानगुटीवर बसले आहे. यापूर्वी सुमारे शंभर गावांचं विस्थापन झालंच आहे; पण आता आखणी ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने इथल्या लोकांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाची निर्मिती पाटण तालुक्यात झाली. त्यावेळी सुमारे ५० च्यावर गावांच्या जमिनी पाण्यात गेल्या. त्यांचे पुनर्वसन होताना मरणयातना सोसल्या. आजही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत नाहीत. त्यानंतर कोयना व चांदोली अभयारण्याची निर्मिती झाली; आणखी ६० गावे विस्थापित झाली. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय, त्यामुळे कोअर अन् बफर झोन तयार होऊ लागलेत. त्यामुळे सुमारे ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. खरंतर मनुष्य हा ‘समूहप्रिय’ प्राणी आहे. त्याला माणसांच्यात, आपल्या लोकांच्यात राहायला आवडते; पण पाटण तालुक्यातील शंभरवर गावांतील हजारो लोकांना आपल्या लोकांपासून दूर राहावे लागत आहे. ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत घडलो; त्या मातीशी, तिथल्या लोकांशी त्या तालुक्याशी लोकांची नाळ जोडलेली असते; पण धरण, अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प जणू लोकांची नाळच तोडण्याचा प्रयत्न करतंय की काय? अशी परिस्थिती आहे. कोयना अभयारण्यनिर्मितीच्या अगोदरही जंगलातील वन्यप्राणी जंगलातच राहत होते. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, कुरणे, पाणवठे जंगलातच होते. आतील ६० गावे आता उठवली. आता व्याघ्र प्रकल्प झाला. गवताची कुरणे नष्ट झाली. फक्त जंगले वाढली, जंगलात पिण्यासाठी पाणीही मिळेना, त्यामुळे रानडुकरे, गवे, बिबट्या, माकडे आदी रानटी प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत. याचा भयंकर त्रास आज पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. कधी मनुष्यावर हल्ला, तर कधी शेळ्या-मेंढ्यांचा बळी, अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. इतकेच काय; पण गहू, हरभरा, जोंधळा, मका, भात, नाचणी अशी पिके वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई अत्यंत तोकडी असून हजार-पाचशे रुपये हातावर पडत आहेत. (क्रमश:)खुंटीला टांगून ठेवल्यात बंदुका... ‘शिकार’ हा तर माणसाचा पूर्वीपासून चालत आलेला छंद अन् जगण्याचा भागही आहे. पूर्वी लोक शिकार करूनच आपली उपजीविका चालवित होते; पण आता वनविभागाने शिकार बंदीचा कायदा अधिक कडक राबवायला सुरुवात केल्याने शेती अन् स्वसंरक्षणासाठी परवाने असणाऱ्या बंदुका आता खुंटीला टांगून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंदूक आहे उशाला मारायचं कशाला? हा प्रश्न सुटत नाही. अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे ! कोयना व चांदोली अभयारण्यांचा विळखा तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. वन्यप्राणी अन् वनकर्मचाऱ्यांचा त्रास येथील लोकांना होत आहे. त्यामुळे लोक वैतागले आहेत. शेतातील पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत असून, उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे अनेक तरुण उद्योग, नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणेकडे वळाले आहेत. त्यामुळे निवी, कसणी सारख्या अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे लागलेली दिसतात. मी सध्या आमदार नाही. मात्र, माझ्या तालुक्यातील लोकांना वनकायदे व कोअर, बफर झोनचा त्रास होऊ नये म्हणून मी नेहमीच प्रयत्नरत आहे. पर्यावरण रक्षणाबरोबर माणसाचेही रक्षण करा, ही माझी भूमिका आहे. लोकांच्या न्याय मागण्यांसाठी मी लढा उभारला आहे. -विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार, पाटण