शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आधी धरण; मग अभयारण्य अन् आता

By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST

कुणीही यावे... गाव उठवून जावे! व्याघ्रप्रकल्प : लोकांच्या मानसिकतेच्या विचार करणार कोण? --...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे / अरुण पवार - कऱ्हाड/पाटण आधी कोयना धरण; मग अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प, यामुळे विस्थापनाचं भूतच जणू पाटण तालुक्याच्या मानगुटीवर बसले आहे. यापूर्वी सुमारे शंभर गावांचं विस्थापन झालंच आहे; पण आता आखणी ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने इथल्या लोकांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाची निर्मिती पाटण तालुक्यात झाली. त्यावेळी सुमारे ५० च्यावर गावांच्या जमिनी पाण्यात गेल्या. त्यांचे पुनर्वसन होताना मरणयातना सोसल्या. आजही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत नाहीत. त्यानंतर कोयना व चांदोली अभयारण्याची निर्मिती झाली; आणखी ६० गावे विस्थापित झाली. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय, त्यामुळे कोअर अन् बफर झोन तयार होऊ लागलेत. त्यामुळे सुमारे ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. खरंतर मनुष्य हा ‘समूहप्रिय’ प्राणी आहे. त्याला माणसांच्यात, आपल्या लोकांच्यात राहायला आवडते; पण पाटण तालुक्यातील शंभरवर गावांतील हजारो लोकांना आपल्या लोकांपासून दूर राहावे लागत आहे. ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत घडलो; त्या मातीशी, तिथल्या लोकांशी त्या तालुक्याशी लोकांची नाळ जोडलेली असते; पण धरण, अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प जणू लोकांची नाळच तोडण्याचा प्रयत्न करतंय की काय? अशी परिस्थिती आहे. कोयना अभयारण्यनिर्मितीच्या अगोदरही जंगलातील वन्यप्राणी जंगलातच राहत होते. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, कुरणे, पाणवठे जंगलातच होते. आतील ६० गावे आता उठवली. आता व्याघ्र प्रकल्प झाला. गवताची कुरणे नष्ट झाली. फक्त जंगले वाढली, जंगलात पिण्यासाठी पाणीही मिळेना, त्यामुळे रानडुकरे, गवे, बिबट्या, माकडे आदी रानटी प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत. याचा भयंकर त्रास आज पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. कधी मनुष्यावर हल्ला, तर कधी शेळ्या-मेंढ्यांचा बळी, अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. इतकेच काय; पण गहू, हरभरा, जोंधळा, मका, भात, नाचणी अशी पिके वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई अत्यंत तोकडी असून हजार-पाचशे रुपये हातावर पडत आहेत. (क्रमश:)खुंटीला टांगून ठेवल्यात बंदुका... ‘शिकार’ हा तर माणसाचा पूर्वीपासून चालत आलेला छंद अन् जगण्याचा भागही आहे. पूर्वी लोक शिकार करूनच आपली उपजीविका चालवित होते; पण आता वनविभागाने शिकार बंदीचा कायदा अधिक कडक राबवायला सुरुवात केल्याने शेती अन् स्वसंरक्षणासाठी परवाने असणाऱ्या बंदुका आता खुंटीला टांगून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंदूक आहे उशाला मारायचं कशाला? हा प्रश्न सुटत नाही. अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे ! कोयना व चांदोली अभयारण्यांचा विळखा तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. वन्यप्राणी अन् वनकर्मचाऱ्यांचा त्रास येथील लोकांना होत आहे. त्यामुळे लोक वैतागले आहेत. शेतातील पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत असून, उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे अनेक तरुण उद्योग, नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणेकडे वळाले आहेत. त्यामुळे निवी, कसणी सारख्या अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे लागलेली दिसतात. मी सध्या आमदार नाही. मात्र, माझ्या तालुक्यातील लोकांना वनकायदे व कोअर, बफर झोनचा त्रास होऊ नये म्हणून मी नेहमीच प्रयत्नरत आहे. पर्यावरण रक्षणाबरोबर माणसाचेही रक्षण करा, ही माझी भूमिका आहे. लोकांच्या न्याय मागण्यांसाठी मी लढा उभारला आहे. -विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार, पाटण