शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आधी धरण; मग अभयारण्य अन् आता

By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST

कुणीही यावे... गाव उठवून जावे! व्याघ्रप्रकल्प : लोकांच्या मानसिकतेच्या विचार करणार कोण? --...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे / अरुण पवार - कऱ्हाड/पाटण आधी कोयना धरण; मग अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प, यामुळे विस्थापनाचं भूतच जणू पाटण तालुक्याच्या मानगुटीवर बसले आहे. यापूर्वी सुमारे शंभर गावांचं विस्थापन झालंच आहे; पण आता आखणी ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने इथल्या लोकांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाची निर्मिती पाटण तालुक्यात झाली. त्यावेळी सुमारे ५० च्यावर गावांच्या जमिनी पाण्यात गेल्या. त्यांचे पुनर्वसन होताना मरणयातना सोसल्या. आजही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत नाहीत. त्यानंतर कोयना व चांदोली अभयारण्याची निर्मिती झाली; आणखी ६० गावे विस्थापित झाली. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय, त्यामुळे कोअर अन् बफर झोन तयार होऊ लागलेत. त्यामुळे सुमारे ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. खरंतर मनुष्य हा ‘समूहप्रिय’ प्राणी आहे. त्याला माणसांच्यात, आपल्या लोकांच्यात राहायला आवडते; पण पाटण तालुक्यातील शंभरवर गावांतील हजारो लोकांना आपल्या लोकांपासून दूर राहावे लागत आहे. ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत घडलो; त्या मातीशी, तिथल्या लोकांशी त्या तालुक्याशी लोकांची नाळ जोडलेली असते; पण धरण, अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प जणू लोकांची नाळच तोडण्याचा प्रयत्न करतंय की काय? अशी परिस्थिती आहे. कोयना अभयारण्यनिर्मितीच्या अगोदरही जंगलातील वन्यप्राणी जंगलातच राहत होते. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, कुरणे, पाणवठे जंगलातच होते. आतील ६० गावे आता उठवली. आता व्याघ्र प्रकल्प झाला. गवताची कुरणे नष्ट झाली. फक्त जंगले वाढली, जंगलात पिण्यासाठी पाणीही मिळेना, त्यामुळे रानडुकरे, गवे, बिबट्या, माकडे आदी रानटी प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत. याचा भयंकर त्रास आज पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. कधी मनुष्यावर हल्ला, तर कधी शेळ्या-मेंढ्यांचा बळी, अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. इतकेच काय; पण गहू, हरभरा, जोंधळा, मका, भात, नाचणी अशी पिके वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई अत्यंत तोकडी असून हजार-पाचशे रुपये हातावर पडत आहेत. (क्रमश:)खुंटीला टांगून ठेवल्यात बंदुका... ‘शिकार’ हा तर माणसाचा पूर्वीपासून चालत आलेला छंद अन् जगण्याचा भागही आहे. पूर्वी लोक शिकार करूनच आपली उपजीविका चालवित होते; पण आता वनविभागाने शिकार बंदीचा कायदा अधिक कडक राबवायला सुरुवात केल्याने शेती अन् स्वसंरक्षणासाठी परवाने असणाऱ्या बंदुका आता खुंटीला टांगून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंदूक आहे उशाला मारायचं कशाला? हा प्रश्न सुटत नाही. अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे ! कोयना व चांदोली अभयारण्यांचा विळखा तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. वन्यप्राणी अन् वनकर्मचाऱ्यांचा त्रास येथील लोकांना होत आहे. त्यामुळे लोक वैतागले आहेत. शेतातील पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत असून, उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे अनेक तरुण उद्योग, नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणेकडे वळाले आहेत. त्यामुळे निवी, कसणी सारख्या अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे लागलेली दिसतात. मी सध्या आमदार नाही. मात्र, माझ्या तालुक्यातील लोकांना वनकायदे व कोअर, बफर झोनचा त्रास होऊ नये म्हणून मी नेहमीच प्रयत्नरत आहे. पर्यावरण रक्षणाबरोबर माणसाचेही रक्षण करा, ही माझी भूमिका आहे. लोकांच्या न्याय मागण्यांसाठी मी लढा उभारला आहे. -विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार, पाटण