शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

नकार पचविण्याची सवय... अच्छी हैं ! : तरुणांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:19 IST

साता-यातील विवेकवाहिनीच्या माध्यमातून तरुणाईला दोन दशकांपासून विविध स्तरांवर येणारे अपयश आणि नकार पचविण्यासाठी प्रशिक्षित दिले जात आहे. विवेक वाहिनीच्यावतीने जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमांतर्गत नकार पचविण्याचे शिकविले जाते. महिलांनाही नकार देण्याचा अधिकार आहे,

ठळक मुद्दे विवेकवाहिनीचा उपक्रम --या पार्श्वभूमीवर साताऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून विवेकवाहिनी तरुणांना नकार पचविण्याचे प्रशिक्षण देत आहे.त्यामुळे तरुण-तरुणी दोघांनीही स्पष्ट नाही म्हणायला आणि नकार पचवायला शिकलं पाहिजे.

प्रगती जाधव-पाटील।सातारा : नागपूर येथील शिक्षिकेवर किंवा मुंबईत तरुणीवर झालेला अ‍ॅसिड हल्ला हा एकतर्फी प्रेमापेक्षाही नकार पचवू न शकलेल्या पुरुषाने महिलेवर केलेला हल्ला असंच म्हणावं लागेल. नकार ऐकण्याची आणि तो पचविण्याची क्षमता कमी होत असल्याने अ‍ॅसिड हल्ल्याचे विकृत प्रयोग होत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून विवेकवाहिनी तरुणांना नकार पचविण्याचे प्रशिक्षण देत आहे.

साता-यातील विवेकवाहिनीच्या माध्यमातून तरुणाईला दोन दशकांपासून विविध स्तरांवर येणारे अपयश आणि नकार पचविण्यासाठी प्रशिक्षित दिले जात आहे. विवेक वाहिनीच्यावतीने जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमांतर्गत नकार पचविण्याचे शिकविले जाते. महिलांनाही नकार देण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या मताचा सन्मान करायला शिका, असं वारंवार तरुणांच्या मनावर बिंबविले जात आहे.

भविष्यात हे हल्ले होऊ नयेत, यासाठी तरुणांबरोबरच तरुणींनाच सक्षम आणि स्पष्टपणे मत मांडण्यासाठी आग्रही राहण्याचे शिकविले पाहिजे. यासाठी हे प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाहीत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पष्ट नाही म्हणायला शिका !मोबाईल नंबर मिळवून त्याद्वारे चॅटिंग आणि पुढं डेटिंग हा तरुणाईचा फंडा होऊ पाहत आहे. मुळातच एखाद्याविषयी शंका असेल तर त्यांच्याशी संवाद टाळणं उत्तम; पण अनेकदा स्पष्टपणे नाही म्हणण्याचं धाडस होत नसल्यामुळे नात्यात गोंधळ सुरू होतो. तरुण प्रेमाच्या हिशेबाने बोलत असतो तर तरुणी मैत्रीच्या रुपात उत्तरे देत असती. एखाद्या प्रश्नाच्या किंवा मिळालेल्या उत्तराच्या बाबत काहीही शंका वाटली तर स्पष्टपणे त्यांचे निरसन होणे आवश्यक आहे. ते नाही झालं तर क्लिष्टता वाढत जाते. त्यामुळे तरुण-तरुणी दोघांनीही स्पष्ट नाही म्हणायला आणि नकार पचवायला शिकलं पाहिजे.

संयुक्त कुटुंबांचा फायदामोठ्या शहरांमध्ये न्युक्लिअर कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळे पालकांचा आणि पाल्यांचा संवाद अल्प झालाय. आधुनिक गॅझेटमुळं जग जवळ आणि माणसं दुरावली गेलीत. ही अवस्था छोट्या शहरांमध्ये दिसत नाही. परिणामी मनात येणाऱ्या भावनांविषयी स्पष्टपणे बोलायला हक्काचा चुलत, मावस, बहीण भाऊ असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेर काहीही गडबडी करून आलेल्यांच्या चेहºयावरील हावभाव ओळखणारी पारखी नजर घराघरांमध्ये असते. आजी-आजोबांना काय केलं हे नाही कळत; पण काहीतरी झालंय ते तरी नक्कीच कळतं. महानगरांमध्ये ही पिकलेली पानं नसतात.

म्हणून साताऱ्यात  प्रमाण कमीसातारा जिल्हा आकाराच्या आणि लोकसंख्या घनतेच्या मानाने आकाराने लहान असा जिल्हा आहे. इथं पावलोपावली कोणीतरी ओळखीचा, पाहुणा, मित्र असे भेटत राहतात. शहर व परिसराची हद्द अतिविस्तीर्ण नसल्यामुळे येथे प्राणघातक हल्ला करण्याला तरुणाई धजत नाही. उलटपक्षी अनैतिक संबंधांतून खून करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; पण तरुणीवर प्राणघातक हल्ला करून तिचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न साता-यात झाला नाही.

 

महिलांना मालमत्ता समजायची आणि तिने नकार दिला तर तिला इजा पोहोचविण्याच्या मानसिकतेतून हे अ‍ॅसिड हल्ले होतात. विवेकवाहिनी विविध स्तरांवर तरुणांना याविषयी मार्गदर्शन करून ‘नकाराचा अर्थ नकारच असतो,’ हे तरुणांना समजावून सांगते. परिणामी मुलांमध्ये नकार पचविण्याची तयारी निर्माण होते.- डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsexual harassmentलैंगिक छळ