शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गुठाळेचा घनकचरा प्रकल्प देशाला दिशादर्शक ठरेल, केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 16:52 IST

आधुनिक काळात कचरा व पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. गावांची स्वच्छता राखण्यासाठी घरोघरी कचरा प्रकल्प राबविणे ही नावीन्यपूर्ण बाब आहे.

खंडाळा : ‘आधुनिक काळात कचरा व पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. गावांची स्वच्छता राखण्यासाठी घरोघरी कचरा प्रकल्प राबविणे ही नावीन्यपूर्ण बाब आहे. गुठाळेचा घनकचरा प्रकल्प देशाला दिशादर्शक ठरेल,’ असा विश्वास केंद्रीय जलजीवन व अन्नप्रकिया उद्योगमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला.

गुठाळे, ता. खंडाळा येथील ग्रामीण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पाणीपुरवठा अभियंता किरण सायमोते, सभापती अश्विनी पवार, गटविकास माणिकराव बिचकुले उपस्थित होते.

पटेल म्हणाले, ‘महिलांना छोटे उद्योग निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. अन्नप्रक्रिया उद्योगात ३५ टक्के फायदा होईल. ग्रामीण भागात महिलांना ग्रामपंचायत पातळीवर पाणी शुद्धतेचे प्रशिक्षण दिले जाईल. पाणी वाचवले तर गावांना फायदा होईल. गुठाळेच्या तलावाच्या पाण्याची व्यवस्था मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले जाईल.’

उदय कबुले म्हणाले, ‘गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी महिलांनी एकत्रित काम केले. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावच्या समस्या दूर करण्यासाठी काम करता आले याचे समाधान आहे. घनकचरा प्रकल्पामुळे गावचा देशात नावलौकिक वाढेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर