शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पालकमंत्र्यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करावा

By admin | Updated: June 29, 2014 00:28 IST

शंकर गोडसे : चप्पल उगारल्याप्रकरणी खुलेआम आव्हान

सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून प्रसंगी वर्ष-वर्ष कारावास भोगताना ज्या वेदना झाल्या नाहीत. त्यापेक्षाही मुंबई बाजार समितीच्या ‘एफएसआय’ विक्रीतून झालेल्या १३८ कोटी १० लाखांच्या भ्रष्टाचार उघडकीस आल्याने पोलीस तपास निप:क्षपातीपणे व्हावा, यासाठी मुंबई बाजार समितीचे संचालक आणि पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा रस्त्यावरून फिरू दिले जाणार नाही,’ असा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे. ऊस, कापूस यांच्या दराबाबत संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवल्यानेच आज शेतकऱ्यांना चार अंकी उसाला दर मिळत आहे. उरमोडी, जिहे-कठापूर, धोम-बलकवडी, नीरा-भीमा स्थिरीकरण या प्रकल्पांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राल्या शेती पाणी प्रश्नासाठी अनेकदा कारावास भोगला. आजवर २१० खटले माझ्यावर राज्यातील विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत.’‘पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण काढण्यासाठी विनंती करूनही अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या जमिनीसाठी मी धोमचे कार्यकारी अभियंता दिनकर मोरे यांच्यावर चप्पल उगारल्यानंतर त्याचे दु:ख मोरे यांना झाले नाही मग ही बाब शिंदे यांच्या जिव्हारी लागल्याने अधिकाऱ्यांच्या बैठकीत माझ्यावर फौजदारी खटला दाखल का केला नाही. अशा धमकी देतच ‘मोरेंनीच काय तुमच्यात दम असेल तर तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करा,’ त्याला भीक घालत नाही. विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील, त्यासाठी सज्ज राहा,’ असा इशारा गोडसे यांना दिला आहे. (प्रतिनिधी)