शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शामगावच्या पाणीप्रश्नी पालकमंत्री सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

कऱ्हाड तालुक्यातील शामगाव हे गाव पूर्वीपासून दुष्काळी आहे. येथील सर्व शेती पावसावर अवलंबून आहे. येथे खरीप हंगाम कसाबसा घेतला ...

कऱ्हाड तालुक्यातील शामगाव हे गाव पूर्वीपासून दुष्काळी आहे. येथील सर्व शेती पावसावर अवलंबून आहे. येथे खरीप हंगाम कसाबसा घेतला जातो, तर रब्बी हंगाम शाश्वत नाही. इतर कालावधीत शेती पडून असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसाबसा चालला आहे. येथील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गत दोन वर्षांपासून पाण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्यासाठीचा पाठपुरावाही सुरू आहे. या प्रश्नासंदर्भातच शामगावच्या सुमारे शंभर शेतकऱ्यांनी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आपण टेंभू योजनेतुन शामगावचा पाणीप्रश्न सोडविणार असल्याची सकारात्मक भूमिका दाखवून मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यावेळी शिवाजी पाटील, भीमराव डांगे, शंकर पोळ, बंडा पोळ, प्रकाश लावंड, दिलीप पोळ, विश्वास पोळ, प्रदीप पोळ, सुनील गायकवाड, बापुराव पोळ, रवी पोळ, राहुल यादव, बाजीराव मोहिते, सुरेश चव्हाण, अधिकराव पोळ, सुनील पोळ, महेश पोळ, बाबूराव पोळ, आदी शेतकरी उपस्थित होते.

फोटो : १३केआरडी०२

कॅप्शन : शामगाव, ता. कऱ्हाड येथील पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.