शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

गटसचिवांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू

By admin | Updated: June 11, 2014 00:56 IST

सातारा जिल्ह्यातील सर्वच गटसचिव सहभागी

कातरखटाव : राज्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या व्यवस्थापन खर्चासाठी पीक कर्ज वाटपाच्या एक टक्के रक्कम मिळावी, यासाठी राज्यातील गटसचिवांनी दि. ९ पासून लेखणी बंदआंदोलन सुरू केल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दूल उर्फ बंडा मुलाणी यांनी दिली. दरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्वच गटसचिव यामध्ये सहभागी झाले आहेत.मुलाणी म्हणाले, राज्याती ६८ लख २५ हजार शेतकऱ्यांना २२ हजार विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सुमारे २० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जाते. या कर्जवाटपात सोसायटीचे गटसचिव महत्त्वाची भुमिका बजावतात. शासनाच्या विविध योजना थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम गटसचिव करीत असताना शासन गटसचिवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील गटसचिवांनी १ फेब्रुवारी ते २७ मार्च २०१२ अखेर दोन महिने कामबंद आंदोलन केले होते. या दरम्यान सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या गावी आंदोलन केले होत तर २५ व २६ मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावरही ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने पीक कर्ज वाटपाच्या एक टक्के रक्कम संस्थेच्या व्यवस्थापनासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षे उलटूनही शासनाने याकडे कानाडोळा केल्याच्या निषेधार्थ दि. ५ जूनपासून संघटनेचे पदाधिकारी यांनी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आजपासून राज्यातील सर्वच गटसचिवांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. पीक कर्ज वाटपाच्या १ टक्के रक्कम संस्थेस मिळावी व राज्य शासनाने गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समित्यांना फायनान्सियल अधिकार देऊनल राज्यातील गटसचिवांना सेवा नियम जिल्हास्तरीय कमिटीमार्फत करून गावपातळीवर शासनाने नियंत्रण रहावे, यासाठी खटाव तालुक्यातील सर्व गटसचिवांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी