शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

‘म्हैसाळ’ योजनेच्या पाण्यासाठी घेराओ

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

मालगावमध्ये आंदोलन : शेतकरी अचानकपणे रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ

मालगाव : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाखा अभियंत्याला घेराओ घालत मालगाव (ता. मिरज) येथील संतप्त शेतकऱ्यांनी भर उन्हात मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. शेतकऱ्यांनी अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. दीड तास रस्ता रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलिसांनीच शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी केल्याने बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडून वीस दिवस झाले तरी बेकायदेशीर पाणी उपशामुळे गेट क्र. १३, १४ व १५ वरील शेतकऱ्यांना योजनेच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने ते आक्रमक झाले आहेत. पाठपुरावा करूनही अधिकारी बेकायदेशीर पाणी उपशाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ४ रोजी मालगाव बंदचा व पंढरपूर रस्ता रोकोचा इशारा दिला होता. तहसीलदार, ग्रामीण पोलीस ठाणे व म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले होते. याची दक्षता घेऊन कळंबी शाखा कालव्याचे अधिकारी निकम हे मालगाव ग्रामपंचायतीत आले असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराओ घालून धारेवर धरले. पैसे घेऊन एका शेतकऱ्याला अनेकवेळा पाणी देता, त्यामुळे आम्हाला योजनेचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. अधिकारी निकम यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकरी संतप्त झाले. पाणी जोपर्यंत मिळत नाही, तो तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयातून सोडणार नाही, प्रसंगी डांबून ठेवण्याच्या निर्णयापर्यंतही टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याबाबत कोणतीच उपाय योजना होत नसल्याने माजी सरपंच प्रदीप सावंत, सरपंच महावीर रुकडे व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शंभरहून अधिक शेतकरी भर उन्हात रस्त्यावर उतरले व त्यांनी मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने मिरज ग्रामीण पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अचानकपणे घेतलेल्या आंदोलनाला हरकत घेतली. मात्र शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलिसांनीच अधिकारी निकम व शेतकऱ्यांत मध्यस्थी केली.त्यानंतर कळंबी शाखा कालव्यावरील होणारा बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरूकरण्यात आल्या. (वार्ताहर)