शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’ योजनेच्या पाण्यासाठी घेराओ

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

मालगावमध्ये आंदोलन : शेतकरी अचानकपणे रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ

मालगाव : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाखा अभियंत्याला घेराओ घालत मालगाव (ता. मिरज) येथील संतप्त शेतकऱ्यांनी भर उन्हात मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. शेतकऱ्यांनी अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. दीड तास रस्ता रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलिसांनीच शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी केल्याने बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडून वीस दिवस झाले तरी बेकायदेशीर पाणी उपशामुळे गेट क्र. १३, १४ व १५ वरील शेतकऱ्यांना योजनेच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने ते आक्रमक झाले आहेत. पाठपुरावा करूनही अधिकारी बेकायदेशीर पाणी उपशाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ४ रोजी मालगाव बंदचा व पंढरपूर रस्ता रोकोचा इशारा दिला होता. तहसीलदार, ग्रामीण पोलीस ठाणे व म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले होते. याची दक्षता घेऊन कळंबी शाखा कालव्याचे अधिकारी निकम हे मालगाव ग्रामपंचायतीत आले असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराओ घालून धारेवर धरले. पैसे घेऊन एका शेतकऱ्याला अनेकवेळा पाणी देता, त्यामुळे आम्हाला योजनेचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. अधिकारी निकम यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकरी संतप्त झाले. पाणी जोपर्यंत मिळत नाही, तो तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयातून सोडणार नाही, प्रसंगी डांबून ठेवण्याच्या निर्णयापर्यंतही टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याबाबत कोणतीच उपाय योजना होत नसल्याने माजी सरपंच प्रदीप सावंत, सरपंच महावीर रुकडे व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शंभरहून अधिक शेतकरी भर उन्हात रस्त्यावर उतरले व त्यांनी मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने मिरज ग्रामीण पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अचानकपणे घेतलेल्या आंदोलनाला हरकत घेतली. मात्र शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलिसांनीच अधिकारी निकम व शेतकऱ्यांत मध्यस्थी केली.त्यानंतर कळंबी शाखा कालव्यावरील होणारा बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरूकरण्यात आल्या. (वार्ताहर)