शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रासरूट इनोव्हेटर : वन्यप्राण्याकडून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याची नाविन्यपूर्ण कल्पना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:12 IST

अहोरात्र काबाडकष्ट करून फुलविलेल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्याकडून होणारे नुकसान टाळणे महत्त्वाचे असते.

- संतोष धुमाळ (पिंपोडे बु. जि. सातारा)

अहोरात्र काबाडकष्ट करून फुलविलेल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्याकडून होणारे नुकसान टाळणे महत्त्वाचे असते. हे ओळखूनच सातारा जिल्ह्यातील सोनके (ता. कोरेगाव) येथील फत्तेसिंग धुमाळ या शेतकऱ्याने नैसर्गिक पंखा तयार केला आहे. वाऱ्यावर फिरणाऱ्या या पंख्याच्या आवाजामुळे वन्य प्राण्याकडून होणारा उपद्रव थांबला आहे.  

सोनके या गावातील प्रयोगशील शेतकरी फत्तेसिंग धुमाळ यांनी आपल्या कोरडवाहू शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. दुष्काळावर मात करीत त्यांनी आपल्या शेतीत ऊस, घेवडा व वाटाणा अशी कसदार पिके घेत फळबागही विकसित केली आहे. परंतु नैसर्गिक संकटांचा सामना करतानाच पाण्याआभावी डोंगराळ भागातील रानडुकरे, साळिंदर तसेच कोल्हे असे वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधात शिवारात फिरतात. मोर, बगळे, साळुंखी हे पक्षी पिकांचे नुकसान करतात.

हे लक्षात आल्याने त्यांनी कल्पक बुद्धी वापरून आधुनिक पद्धतीचा पंखा बनविला आहे. ज्यामुळे ऊस पिकाचे नुकसान करीत असलेली रानडुकरे तसेच वाटाणा, घेवडा, भुईमूग या पिकांचे नुकसान करणारे पक्षी घाबरत आहेत. हा पंखा वाऱ्याच्या वेगाने फिरल्यानंतर त्यावर बसविलेल्या तबकडीवर जोडलेल्या एका काठीद्वारे आवाजाची निर्मिती होते. त्यामुळे येणारे प्राणी व पक्षी घाबरतात. परिणामी पिकांची हानी टळून पयार्याने पिकांचे संरक्षण होते.

या उपकरणासाठी त्यांना किरकोळ खर्च आला आहे. एका नादुरुस्त पंख्याच्या पात्याला बेअरिंगच्या साह्याने लोखंडी रॉड बसविला आहे. या रॉडच्या मागील बाजूस वेल्डिंगच्या साह्याने आणखी एक रॉड बसवून त्याच्या दोन्ही बाजूस साधारणत: दोन साखळ्या जोडल्या आहेत. त्याच्या खालच्या बाजूला एक तबकडी जोडली असून, वाऱ्याच्या साह्याने पात्यासह लोखंडी रॉड फिरल्यानंतर त्यावरील साखळ्या तबकडीवर आदळून आवाज होतो. त्यामुळे प्राणी- पक्षी घाबरतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी