शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

ग्रामपंचायतींमध्ये दारुबंदी ठरावाची परीक्षा!

By admin | Updated: May 1, 2017 00:01 IST

ग्रामपंचायतींमध्ये दारुबंदी ठरावाची परीक्षा!

सातारा : जिल्ह्यातील सुमारे १५०० ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी ग्रामसभा होणार असून, अनेक ग्रामपंचायतीत दारूबंदीचे ठराव घेण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. त्यासाठी गावोगावी जागृती सुरू असून ठराव पारित करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या ग्रामसभेकडे प्रशासनाचेही लक्ष असणार आहे. तसेच काही ठिकाणी ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायतीला निवेदन देऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात यावा, अशीही मागणी केली आहे. गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभेतील ठरावावरच गावचे राजकारण, विकास ठरत असतो. त्यामुळे ग्रामसभेत वाद, मारहाणीचे प्रकारही घडत असल्याचे दिसून येते. आता दि. १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष आहे. जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती दारूबंदीचे ठराव होणार याकडे प्रशासनाचेही लक्ष राहणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींना ग्रामस्थांनी निवेदन देऊन १ मे रोजीच्या ग्रामसभेत दारू व्यवसायाला ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे सुचविण्यात आले आहे. तसेच हा विषय विषयपत्रिकेवर घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सातारा तालुक्यातील वडूथ ग्रामपंचायतीलाही ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. सरपंचांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीत सर्व प्रकारच्या दारू व्यवसायाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. संबंधित विषय १ मे रोजीच्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात यावा. ग्रामपंचायत हद्दीत यापुढे कायमस्वरुपी दारूबंदीचा ठराव करण्यातचा ठराव घ्यावा. यापूर्वी दिलेल्या आणि अद्यापही सुरू न झालेल्या सर्व प्रकारच्या दारू विक्री दुकानांचे ना हरकत रद्द करण्यात यावे. तसेच या निवेदनात पुढे म्हटले आहे की, वडूथ गावाला धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, ऐतिहासिक तसेच देशसेवेचा वारसा आहे. गावात निरोगी आणि निर्व्यसनी आयुष्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. व्यसनामुळे चांगली गोष्ट होत नाही. कुटुंबालाही त्याची झळ बसते. अशामुळे ग्रामपंचायत हद्दीत दारू दुकानांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या निवेदनावर मदन साबळे, अजित साबळे, छाया साबळे, पूनम साबळे, प्रियांका साबळे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी) खटावमध्ये ग्रामसभा ठरावांकडे लक्षखटाव तालुक्यातील १३९ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी होणाऱ्या ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या दारूबंदी ठरावाकडे तालुक्यातील महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. तर तालुक्यात वडूज नगरपंचायत एकमेव असल्याकारणाने येथील काही सदस्यांनी सह्यांचे लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहे. गावोगावी होणाऱ्या ग्रामसभेत बहुतांशी महिला उपस्थित राहणार असून, ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के आरक्षण असल्याने महिलांचे मनोबल वाढले आहे. तर हा ठराव होऊ नयेत, यासाठी दारू विक्रेत्यांची धावपळ सुरू आहे. वडूजमधील काही नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या जागेत कोठेही दारूविक्री करण्यासाठी परवानगी देऊ नये, असे निवेदन दिले आहे.दारुबंदीची ओळख जपण्यासाठी जागरुक...दि. १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनानिमत्त होणाऱ्या ग्रामसभेत जावळी तालुक्यात दारू दुकानांना परवाने देऊ नयेत, असा ठराव करण्यात येणार आहे. तालुक्यातील सुमारे १२५ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, २००८ पासून संपूर्ण जावळी तालुका दारू दुकानमुक्त आहे. एकही दारूचे दुकान नसलेला जिल्ह्यातील एकमेव व राज्यात दारूमुक्तीचा दिशादर्शक तालुका म्हणून जावळीची ओळख आहे. ही ओळख कायम राहण्यासाठी जावळीतील नागरिक जागरुक आहेत. नुकतेच शासनाने महामार्गाच्या ५०० मीटर परिसरात केलेल्या दारूदुकान बंदीमुळे दारू दुकानदार ग्रामपंचायत क्षेत्रात दुकाने सुरू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर या ग्रामसभेत गावात नवीन दारू दुकांनाना परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या संमतीने करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.