शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वाहनांना आता जीपीएसचा लगाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST

सातारा: शासकीय वाहनांचा खासगी कामासाठी वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता सर्वच वाहनांना जीपीएस बसविण्याच्या हालचाली ...

सातारा: शासकीय वाहनांचा खासगी कामासाठी वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता सर्वच वाहनांना जीपीएस बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे आता अधिकाऱ्यांना भाजी मंडई अन् मुलांना शाळेत सोडण्याला साहजिकच चाप बसणार आहे.

शासकीय वाहनांचा अनेकदा खासगी वापर होत असतो. काही अधिकारी घरातील कामे, लग्नसमारंभ अशांसाठी या वाहनांचा वापर करतात तर काहीजण मुलांना शाळेत सोडण्यासाठी तर काही जण चक्क भाजी मंडई आणण्यासाठी शासकीय वाहनाचा वापर करत असतात. अशा खासगी कामांमुळे शासनाचा लाखो रुपये खर्च होत असल्याचे समोर आले आहे. काही अधिकारी प्रामाणिकपणे केवळ ऑफीस ते घर यासाठीच वाहनाचा वापरतात. पण हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्व शासकीय वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यावेळी हे वाहन नेमके कोठे जातेय, हे समजत होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर पुन्हा जीपीएस यंत्रणा काढण्यात आली. त्यानंतर मात्र, प्रवासाचा खर्च अधिक वाढू लागला. त्यामुळे आता यावर पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वच शासकीय वाहनांना जीपीएस बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाहनांची संख्या आणि जीपीएसचा खर्च काढण्याचे काम सुरू असून, लवकरच शासकीय वाहनांना ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

शासकीय वाहनांचा खासगी वापर होऊ नये तसेच किलोमीटर वाढवून सांगू नये, आर्थिक अपरातफर होऊ नये, यासाठी जीपीएस यंत्रणा गरजेची असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. गत वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे शासकीय वाहनांचा खासगी वापर फारसा झाला नसल्याचे समोर आले आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वी लग्नसमारंभ, मुलांना शाळेत सोडणे, यासाठीही शासकीय वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. पण याची अधिकृत आकडेवारी समोर येत नाही. खासगी कामांसाठी शासकीय वाहनांचा वापर केला जातो, एवढीच माहिती सर्वश्रूत आहे. पण यावर कोणी पुढे येऊन बोलण्याचे धाडस करत नव्हते. आता जीपीएसद्वारेच यावर नियंत्रण आणले जाणार आहे. महाराष्ट्रातील बहुदा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

चौकट :

प्रस्ताव होणार तयार....

जिल्ह्यातील वाहनांची एकूण संख्या, जीपीएसला लागणारा खर्च, मेंटेनस, महिन्याकाठी कसा आढावा घ्यावा, अशी सर्व माहिती तयार करून येत्या काही दिवसात प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

चौकट : जीपीएस काय दाखविणार

जीपीएस यंत्रणा बसविल्यानंतर पोर्टलवर डेली रुटमॅप दिसतो. १ ते ३० तारखेपर्यंत सर्व रेकॉर्ड होते. त्यानंतर महिन्याला हे रेकॉर्ड तपासले जाते. रुट मॅपमुळे शासकीय गाडी नेमकी कुठे फिरली, किती किलोमीटर, हे इत्थंभूत समजणार आहे. त्यामुळे नक्कीच गैरप्रकाराला आळा बसणार आहे.