शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’साठी शासन अपयशी : शिंदे

By admin | Updated: January 5, 2015 00:41 IST

राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य

पुसेगाव : ‘शेतकरी व सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याची स्वप्ने दाखवून केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत आले. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत व ऊस, दूध उत्पादकांसह शेती मालाला दर देण्यात युती शासन अपयशी ठरले आहे, कुठे गेले अच्छे दिन,‘ असा सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. बुध, ता. खटाव येथील नूतन ग्रामविकास, अंतर्गत रस्ता डांबरीकरण भूमिपूजन व बसस्थानक लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, सतीश फडतरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, सरपंच मंगल खवळे, उद्योजक विनायकराव काळे, प्रल्हाद चव्हाण, माजी सरपंच राजेंद्र कचरे, संभाजी घाटगे, सुधीर जगदाळे, नितीन गाडे, विजय सूर्यवंशी, विजय महामुलकर, समीर सय्यद, अशोक शेडगे, गणेश मेळावणे, चंद्रकांत तांदूळवाडकर, हिंंदुराव चव्हाण, फडतरवाडीचे उपसरपंच जगदाळे, पांगरखेलचे ज्ञानेश्वर जगताप, सोसायटीचे अध्यक्ष कृष्णचंद्र जगदाळे, रवी चव्हाण आदी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, ‘आघाडी शासनाच्या काळातही अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व दुष्काळाचे प्रश्न अतिशय तीव्र होते; पण आघाडी शासन शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे असल्यामुळे ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना तातडीने मदत केली होती. याशिवाय तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन चांगलाच दिलासा दिला होता. याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कृषी क्षेत्राला चांगले दिवस आणल्यामुळे शेतकरी चांगलाच समाधानी होता.’ (वार्ताहर)