शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

‘अच्छे दिन’साठी शासन अपयशी : शिंदे

By admin | Updated: January 5, 2015 00:41 IST

राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य

पुसेगाव : ‘शेतकरी व सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याची स्वप्ने दाखवून केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत आले. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत व ऊस, दूध उत्पादकांसह शेती मालाला दर देण्यात युती शासन अपयशी ठरले आहे, कुठे गेले अच्छे दिन,‘ असा सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. बुध, ता. खटाव येथील नूतन ग्रामविकास, अंतर्गत रस्ता डांबरीकरण भूमिपूजन व बसस्थानक लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, सतीश फडतरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, सरपंच मंगल खवळे, उद्योजक विनायकराव काळे, प्रल्हाद चव्हाण, माजी सरपंच राजेंद्र कचरे, संभाजी घाटगे, सुधीर जगदाळे, नितीन गाडे, विजय सूर्यवंशी, विजय महामुलकर, समीर सय्यद, अशोक शेडगे, गणेश मेळावणे, चंद्रकांत तांदूळवाडकर, हिंंदुराव चव्हाण, फडतरवाडीचे उपसरपंच जगदाळे, पांगरखेलचे ज्ञानेश्वर जगताप, सोसायटीचे अध्यक्ष कृष्णचंद्र जगदाळे, रवी चव्हाण आदी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, ‘आघाडी शासनाच्या काळातही अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व दुष्काळाचे प्रश्न अतिशय तीव्र होते; पण आघाडी शासन शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे असल्यामुळे ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना तातडीने मदत केली होती. याशिवाय तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन चांगलाच दिलासा दिला होता. याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कृषी क्षेत्राला चांगले दिवस आणल्यामुळे शेतकरी चांगलाच समाधानी होता.’ (वार्ताहर)