शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन

By admin | Updated: August 18, 2015 22:35 IST

पृथ्वीराज चव्हाण : मोदी सरकारकडून जनतेची केवळ निराशाच

कऱ्हाड : भ्रष्टाचारी अन् बोगस पदवीधारक मंत्र्यांबाबत सरकारमधील कोणीच बोलायला तयार नाही, तर दुष्काळ अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य आणि कें द्रातील सरकार उदासिन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी शिक्षण क्षेत्रात येत असलेल्या भगवीकरणाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली.यावेळी एनएसयआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण आदि उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, भाजप सरकारकडून अनेक विकासाच्या, योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. भाजपकडून गंगा नदी शुद्धीकरण केली जात आहे. तर मग कृष्णा आणि यमुना नदी का शुद्ध केल्या जात नाहीत. भाजप सरकारकडून भावनिक राजकारण केले जात आहे.राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न, फळबाग- कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर संकट आले आहे. शेतकऱ्यांच्या संकटाबाबत मात्र केंद्र सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या नाहीत. अजूनही दुष्काळी भागात राज्य सरकारकडून जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. दिवसेंदिवस जलाशयांची स्थिती बिकट होत चालली आहे. मात्र, सरकारकडून ठोस पावले उचलली नाही.शेतकऱ्यांवर आलेले दुहेरी संकट दूर करण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी अधिवेशनात सरकाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत तसेच अनेक मागण्यांबाबत बुधवारी मुंबई येथे मंत्रालयावर एनएसयुआय मोर्चा काढणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री अन् राज्यातील शिक्षणमंत्रीही बोगस डिग्रीचेमोदी सरकार केंद्रातील मंत्रिमंडळातही बोगस मंत्री आहेत, तसेच राज्यातील शिक्षणमंत्रीही बोगस डिग्रीचे असल्याने याबाबत आश्चर्यच वाटते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, ‘मी शिक्षण घेतलेल्या विद्यापीठात आजही पैसे भरूनही प्रवेश मिळत नाही. त्यांनी ज्या विद्यापीठात शिक्षण घेतले आहे, त्या विद्यालयाला डिग्री देण्याचा अधिकार नाही.’पुरंदरेंना पुरस्कारासाठी सरकारने विवेकबुद्धी वापरावीशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी सद्सदविवेकबुद्धी वापरणे गरजेचे असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा निर्मितीत लोकसंख्या महत्त्वाचीयुती सरकार हे २२ जिल्ह्यांची निर्मिती करणार असल्याचे समजले, त्याबाबत घोषणाही करण्यात आल्या. मात्र, जिल्ह्याची घोषणा व निर्मिती करण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत. जिल्हा विभाजन करताना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या तसेच तेथील विकास या गोष्टी महत्वाच्या असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.