शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पिकांनी टाकली मान; शेतकरी हतबल !

By admin | Updated: August 19, 2015 21:29 IST

खंडाळा तालुका : पावसाची ओढ संपेना, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर दशरथ ननावरे - खंडाळा

हजारो रुपयांचं मातीआड झालेलं बियाणं, डोक्यावर पांढरफटकं आभाळं, कुठं-कुठं उगवलेली पिकंही कोमजली जाऊ लागलीत. पावसानं दिलेली ओढ. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला असून, आता पुढचे दिवस कसे जाणार? हीच चिंता लागून राहिलेला शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्रन्दिवस कुटुंब, जनावरं कशी जगवावीत हाच घोर जिवाला लागल्याने खंडाळा तालुक्यातील शेतकरी कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरव्ही जून महिन्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे जूनअखेरपर्यंत बहुतांशी पिकांची पेरणी पूर्ण होते. यावर्षीही शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचे बियाणे मातीआड केले; परंतु वरुणराजाने पुरती पाठ फिरवल्याने अद्यापही पावसाचा मागमूस नाही. तालुक्यातील अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचा वर्षभराचे आर्थिक नियोजन खरीप हंगामावर अवलंबून असते. मात्र पावसाअभावी हे सर्वच नियोजन कोलमडून पडले आहे. तालुक्याचा बागायती भागात बाजरी पीक कसेबसे तग धरून आहे. मात्र, इतर पिके जगण्याची शाश्वती कमी आहे. पश्चिम भागातील भातपिकाचे क्षेत्र लागवड झालेल्यापैकी ६० टक्के क्षेत्र कोमेजून गेले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. तालुक्यात खरीप हंगामासाठी १८,३८४ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असते. यावर्षी १४,६१९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. भात, बाजरी, मका, घेवडा, वाटाणा, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन इतर गळित व कडधान्ये या पिकांचा समावेश असतो. या संपूर्ण क्षेत्रासाठी लाखो रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. मशागतीसाठीही लाखांवर खर्च केला आहे. खंडाळा तालुक्यातील खरीप हंगामासाठी पिकावर उपलब्ध क्षेत्र व त्यापैकी लागवड झालेले क्षेत्र खालीलप्रमाणे : पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) भात ११७६ ५५४ घेवडा ४८३ ४२६ बाजरी १२६०३ १००४४ वाटाणा २८७ १४१ मका ५७९ ४५६ तूर २२ २२ तृणधान्ये १२९ ११ उडीद १८१ १५४ भुईमूग १२२५ १०७१ मूग ३३० २८८ सोयाबीन १०६९ ११४० इतर कडधान्ये २०१ २४० इतर गळीत ९९ ७२ खंडाळा तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. भात पिकांची अवस्था नुकसानकारक असून, जवळपास ६० टक्के भात लागवड वाया जाण्याच्या स्थितीत आहे. बागायती भागात बाजरी पिके अजूनतरी व्यवस्थित असली तरी इतर पिकांची स्थिती गंभीर आहे. पाऊस पडला नाही तर मोठे नुकसान संभवते. - शिवाजी मांगले, कृषी अधिकारी, खंडाळा पावसाअभावी आमची पिके धोक्यात आहेत. यावर्षी उत्पन्न मिळेल असे वाटत नाही. जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या मोठी आहे. माणसं कशीबी जगवू; पण जनावरांच्या पोटाचं काय? असा घोर लागला आहे. शासनाने चाऱ्याचा प्रश्नावर मार्ग काढावा. - लक्ष्मणराव धायगुडे, शेतकरी