शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

पिकांनी टाकली मान; शेतकरी हतबल !

By admin | Updated: August 19, 2015 21:29 IST

खंडाळा तालुका : पावसाची ओढ संपेना, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर दशरथ ननावरे - खंडाळा

हजारो रुपयांचं मातीआड झालेलं बियाणं, डोक्यावर पांढरफटकं आभाळं, कुठं-कुठं उगवलेली पिकंही कोमजली जाऊ लागलीत. पावसानं दिलेली ओढ. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला असून, आता पुढचे दिवस कसे जाणार? हीच चिंता लागून राहिलेला शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्रन्दिवस कुटुंब, जनावरं कशी जगवावीत हाच घोर जिवाला लागल्याने खंडाळा तालुक्यातील शेतकरी कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरव्ही जून महिन्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे जूनअखेरपर्यंत बहुतांशी पिकांची पेरणी पूर्ण होते. यावर्षीही शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचे बियाणे मातीआड केले; परंतु वरुणराजाने पुरती पाठ फिरवल्याने अद्यापही पावसाचा मागमूस नाही. तालुक्यातील अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचा वर्षभराचे आर्थिक नियोजन खरीप हंगामावर अवलंबून असते. मात्र पावसाअभावी हे सर्वच नियोजन कोलमडून पडले आहे. तालुक्याचा बागायती भागात बाजरी पीक कसेबसे तग धरून आहे. मात्र, इतर पिके जगण्याची शाश्वती कमी आहे. पश्चिम भागातील भातपिकाचे क्षेत्र लागवड झालेल्यापैकी ६० टक्के क्षेत्र कोमेजून गेले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. तालुक्यात खरीप हंगामासाठी १८,३८४ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असते. यावर्षी १४,६१९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. भात, बाजरी, मका, घेवडा, वाटाणा, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन इतर गळित व कडधान्ये या पिकांचा समावेश असतो. या संपूर्ण क्षेत्रासाठी लाखो रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. मशागतीसाठीही लाखांवर खर्च केला आहे. खंडाळा तालुक्यातील खरीप हंगामासाठी पिकावर उपलब्ध क्षेत्र व त्यापैकी लागवड झालेले क्षेत्र खालीलप्रमाणे : पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र पिके उपलब्ध क्षेत्र लागवड क्षेत्र (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) (हेक्टर) भात ११७६ ५५४ घेवडा ४८३ ४२६ बाजरी १२६०३ १००४४ वाटाणा २८७ १४१ मका ५७९ ४५६ तूर २२ २२ तृणधान्ये १२९ ११ उडीद १८१ १५४ भुईमूग १२२५ १०७१ मूग ३३० २८८ सोयाबीन १०६९ ११४० इतर कडधान्ये २०१ २४० इतर गळीत ९९ ७२ खंडाळा तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. भात पिकांची अवस्था नुकसानकारक असून, जवळपास ६० टक्के भात लागवड वाया जाण्याच्या स्थितीत आहे. बागायती भागात बाजरी पिके अजूनतरी व्यवस्थित असली तरी इतर पिकांची स्थिती गंभीर आहे. पाऊस पडला नाही तर मोठे नुकसान संभवते. - शिवाजी मांगले, कृषी अधिकारी, खंडाळा पावसाअभावी आमची पिके धोक्यात आहेत. यावर्षी उत्पन्न मिळेल असे वाटत नाही. जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या मोठी आहे. माणसं कशीबी जगवू; पण जनावरांच्या पोटाचं काय? असा घोर लागला आहे. शासनाने चाऱ्याचा प्रश्नावर मार्ग काढावा. - लक्ष्मणराव धायगुडे, शेतकरी