शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

गोपूजला पाणी, मेथी, उसावर केमिकलचा थर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे डांबर प्रकल्प चालू असून, त्यातून निघणारे केमिकल, धूर यामुळे जवळ असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला ...

औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे डांबर प्रकल्प चालू असून, त्यातून निघणारे केमिकल, धूर यामुळे जवळ असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ऊस व मेथी, कांदा पिकावर केमिकलचा थर साचल्याने त्याचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करून पिकांची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर सोमवार, दि. ५ रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा येथील विकास घाडगे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, माझी जमीन गोपूज येथील गट नं ८१३ मध्ये आहे. यामध्ये मेथी, ऊस, कांदा अशी पिके केली आहेत. माझ्या घराच्या पश्चिमेस राजपथ इन्फ्रा या कंपनीचे रस्त्याचे काम सुरू असून, डांबर प्रकल्प सुरू आहे, त्यातून बाहेर निघणाऱ्या केमिकलमुळे शेतीवर काळा थर साचला आहे, विहिरीतील पाणी रसायनयुक्त झाले आहे. हातातोंडाला आलेली मेथी आता विक्रीयोग्य राहिली नाही. माझी आजी उषाताई पंढरीनाथ माने यांना डांबराच्या धुळीमुळे दम्याचा त्रास सुरू झाला आहे. भारतीय संविधानाच्या कलम २१ प्रमाणे आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प हलविण्याबाबत व नुकसान भरपाईची विनंती केली असता ते धमकीची भाषा करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प सुरक्षित ठिकाणी हलवून नुकसानभरपाई मिळावी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा कुटुंबीयांसह सोमवार, दि. ५ जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.

३०औंध०१/०२/०३

फोटो:-१)गोपूजनजीकच्या याच डांबर प्रकल्पामधून प्रदूषण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर काळा थर जमा झाला आहे. २)डांबर प्रकल्पामधून पडणाऱ्या केमिकलमुळे मेथीवर काळा थर आला आहे.