शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

‘शुभमंगल’वर महागाईचे ‘अशुभ’ सावट

By admin | Updated: April 15, 2015 23:58 IST

दरवाढीचा निर्णय : मंगल कार्यालय व्यवसाय होणार अधिक खर्चिक

सातारा : वाढता वाढता वाढे, अशी अवस्था महागाईची झाल्यामुळे आता सर्वच ठिकाणी त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याला अपवाद मंगलकार्य व्यावसायिकही नाहीत. गेल्या काही दिवसांत बाजारात असलेली आर्थिक तेजीचा फटका या व्यावसायिकांनीही बसला आहे. त्यामुळे या हंगामात त्यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. त्यानुसार प्रत्येकाने दहा टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सातारा शुभमंगल कार्य व्यावसायिक विकास संस्था यांची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, तसेच मंगल कार्यालयाचे मालक, आचारी व मंडप व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी सभासदांनी व्यावसायिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या समस्या, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, तसेच दरवाढ आदी विषयांवर चर्चा करून सध्याच्या महागाईच्या काळात ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने विविध उपाय सुचविले व सध्या अस्तित्वात असणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मंगल कार्य व्यावसायिकांनाही अनिवार्यपणे दरवाढ करावी लागत आहे. गेल्या तीन वर्षांत कोणतीही दरवाढ झाली नसल्यामुळे यावेळी त्यांनी सरसकट दहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.दरवाढीच्या विषयावर सर्व सभासदांनी एकमत झाल्यावर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. तसेच दरवाढीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी दर पत्रकाप्रमाणे दर घ्यावेत व अंमलबजावणी करावी, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. संस्थेच्या सर्व सभासदांनी तसेच व्यावसायिकांनी संस्थेने काढलेले नवीन वाढीव दर पत्रक घेऊन जावे, असे आवाहनही करण्यात आले. (प्रतिनिधी)अशी झाली दरवाढखुर्ची ५१०ताट (शेकडा)१५०२००आचारी७००१५००सहायक१००३५०व्यावसायिक सिलिंडर६००१२००मंडप ५७(प्रति स्क्वे. फू.) मदतनिसांचा तुटवडा..मंगल कार्य व्यावसायिकांना सध्या कुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. पूर्वी शंभर रुपये हजेरी या दराने येणारे युवक आता तीनशे रुपये आकारू लागले आहेत. जेवण वाढणे एवढ्या एका कामासाठी एका मुलाला तीनशे द्यावे लागतात. अशी किमान दहा मुले घ्यावी लागतात. अलीकडे मात्र तीनशे रुपये देऊनही मुलं मिळत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या नात्यातील लोकांना सोबत घेऊन हे काम करावे लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून बाजारातील परिस्थिती आणि वस्तूंचे दर लक्षात घेता शुभमंगल कार्य व्यावसायिकांना जेमतेम उत्पन्न मिळत आहे. लग्नसराईत जर उत्पन्न नाही मिळाले तर पुढे वर्षभर या व्यावसायिकांना हालाखीत काढावे लागते. त्यामुळे या दरवाढीला ग्राहकांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा.- उदय गुजर, अध्यक्ष शुभमंगल लग्न कार्यात निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा अधिकचा खर्च होतो. त्यात आता मंगल कार्यालय व्यावसायिकांनी केलेली दरवाढ त्रासाची ठरणार आहे. आता या वाढीव खर्चासाठीही लग्नाच्या बजेटमध्ये तरतूद करावी लागणार हे स्पष्ट आहे.- सयाजी कदम, सातारा